शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

हौशींची ‘सोशल’गिरी काळविटांच्या मुळावर!

By admin | Updated: March 31, 2017 23:03 IST

सदाशिवगडावर शिकाऱ्यांचा डोळा : छायाचित्र ‘सोशल मीडिया’वरून ‘व्हायरल’; काळविटांच्या जिवाला धोका

कऱ्हाड : गतकाही दिवसांपासून सदाशिवगडाच्या मागील बाजूस सातत्याने तीन-चार काळविटांचे वास्तव्य आढळून आले आहे. काही अती हौशी लोकांनी काळविटांची छायाचित्रे सोशल मीडियावरून शेअर केल्यामुळे परिसरातील शिकारी आपल्या सावजांचा माग काढू लागले आहेत. या परिसरात वन विभागाचे कर्मचारी क्वचितच येत असल्यामुळे सदाशिवगडावर मुक्तपणे संचार करणाऱ्या काळविटांचा जीव धोक्यात आहे.सदाशिवगडावरील महादेवाच्या मंदिरामुळे या ठिकाणी तालुक्यातील भाविकांची नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. याशिवाय कऱ्हाड शहरासह परिसरातून दररोज पहाटे तसेच सायंकाळच्या वेळी शेकडो नागरिक व्यायाम म्हणून सदाशिवगडावर चढाई करीत असतात. स्थानिक ग्रामस्थ तसेच नियमितपणे चढाई करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी लोकसहभागातून सदाशिवगडावर पायऱ्या, वृक्षारोपण, सीसीटीव्ही कॅमेरे, वृक्षारोपण यासह अनेक सुविधा तयार करण्यात आल्या आहे. सदाशिवगडावरील टेंभू प्रकल्पाच्या मागील बाजूचा डोंगर अगदी सांगली जिल्ह्यातील सागरेश्वरपर्यंत विस्तारत गेला आहे. परंतु या ठिकाणी लोकांचे फारसे वास्तव्य नसल्यामुळे वनसंपदेबरोबरच वन्यजीवही आढळून येत असतात. सदाशिवगडाच्या मागील पठारावरून सागरेश्वर अभयारण्याचे अंतर सुमारे ३० ते ३५ किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे इतके दूर अंतर कापून सदाशिवगडावर काळविटे किंवा हरणे अपवादानेच येतात; परंतु हे सर्व अंतर झाडाझुडपांचेच असल्यामुळे काळविटांसाठी चाऱ्याच्या शोधासाठी सदाशिवगडापर्यंत पोहोचणे कठीण नाही. त्यामुळेच गेल्या महिन्यापासून सदाशिवगडावर सातत्याने ३ ते ४ काळविटांचा वावर आढळून आला आहे. निसर्गसंपदेने बहरलेल्या सदाशिवगडावर काळविटांचे आगमन ही सुखद बाब असली तरी या ठिकाणी ते अजिबात सुरक्षित नाहीत, हे निश्चित. काही हौशी लोकांनी सदाशिवगडावर दिसलेल्या काळविटांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे चांगल्या सावजांच्या शोधात असणारे शिकारीही सावध झाले आहेत. परिणामी काहीजणांनी काळविटांचा मागही काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काळविटांचे प्राण धोक्यात आले आहेत.सदाशिवगडावरील मागच्या दुर्गम डोंगरपठारावर शिकाऱ्यांकडून नियमितपणे प्राण्यांच्या शिकारी सुरू असतात. परंतु याठिकाणी वन विभागाचे कर्मचारी अजिबात फिरकत नसल्यामुळे आतापर्यंत एकाही शिकाऱ्यावर कारवाई झाल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे निर्ढावलेल्या शिकाऱ्यांनी आता काळविटांना टार्गेट बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दुर्र्मीळ वन्यजीवांना संरक्षण देण्यासाठी वन विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)