शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सातारा जिल्ह्यातील आठ तालुक्यात लम्पीचा शिरकाव, कऱ्हाडला धोका वाढला 

By नितीन काळेल | Updated: September 16, 2023 19:05 IST

दुसऱ्या टप्प्यात 'इतक्या' जनावरांचा मृत्यू 

सातारा : जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव आठ तालुक्यात पोहोचला आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्यात धोका अधिक आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत ३५० जनावरे बाधित झाली असून यामधील २६ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. तर लम्पीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने जनावरांना लसीकरण केले आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव सुरू झाला होता. पहिल्या टप्प्यात मार्च महिन्यापर्यंत २० हजारांहून अधिक जनावरांना लम्पीने गाठले होते. तर १ हजार ४८० हून अधिक पशुधनाचा मृत्यू झाला होता. या काळात बळीराजा पुरता कोलमडून पडला होता. मात्र, एप्रिलपासून लम्पीचा आजार कमी होत गेला. पण, आॅगस्ट महिन्यापासून लम्पीचा जिल्ह्यातील प्रादूर्भाव वाढत चालला आहे. याचा अऱ्थ लम्पी संकटाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी धोका वाढला आहे. लाख मोलाचे जनावर बळी पडले तर भरपाई कशी करणार अशी चिंता लागली आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम वेगाने पूर्णत्वास आणली आहे.लम्पी चर्मरोगाचा दुसरा टप्पा जिल्ह्यात सुरू झालेला आहे. फलटण तालुक्यातून प्रादुर्भावाला सुरुवात झाली. आता आठ तालुक्यात लम्पी पोहोचला आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्यात अधिक प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५० जनावरांना लम्पी झाला. त्यातील २४५ पशुधन हे कऱ्हाडमधीलच आहे. तर दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत २६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यातील २१ पशुधन हे कऱ्हाडमधील बळी गेलेले आहे. तर यानंतर कोरेगाव, वाई, फलटण तालुक्यात बाधित जनावरे असून प्रमाण कमी आहे. तर जावळी पाटण आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यांत लम्पी बाधित जनावरे अजुनतरी आढळून आलेली नाहीत. तर लम्पीने फलटण, वाई, खटाव या तालुक्यातील प्रत्येकी एका जनावराचा मृत्यू झालेला आहे.

साडे तीन लाख जनावरांना लसीचा डोस...लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव हा गोवर्गीय पशुधनालाच होत आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने गाय, बैल आणि वासरे यांना लसीकरण करण्यासाठी वेगाने पावले उचलली. ३ लाख ५२ हजार जनावरांना हे लसीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत ३ लाख ४९ हजार ३६५ जनावरांना लसीचा डोस देण्यात आलेला आहे.

१० बैलांचा मृत्यू...लम्पीच्या दुसऱ्या टप्प्यात ९ संकरित गायींचा मृत्यू झाला आहे. तसेच १० बैलांचाही बळी गेला आहे. एका बैलाची किंमत ५० हजारांपासून पुढे असते. त्यातच बैलापासून शेतीची कामे केली जातात. आता हे पशुधनच लम्पीत मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांत चिंता निर्माण होऊ लागली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग