शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

सुस्त प्रशासनाला लहानग्यांची चपराक

By admin | Updated: December 11, 2014 23:52 IST

वाईत अभियान : दुर्गंधी निर्मुलनासाठी नेचर्स फ्रेंडस् ग्रुप सरसावला

वाई : कचरा साचल्याने येणारी दुर्गंधी, मैलामिश्रीत सांडपाण्याने आरोग्यास धोका, नागरिकांच्या तक्रारी हे सर्व काही प्रशासनाने दुलक्षित केले. अखेर लहानग्यांनी हातात झाडू घेऊन प्रशासनाला लाजविले.वाई-पाचगणी रस्त्याशेजारील सायली कुंज इमारतीशेजारील मोकळ्या जागेत कचरा साठल्याने कचरा डेपोचे स्वरुप येऊन मैला मिश्रित व सांडपाणी सोडल्याने परिसरात घाण होऊन दुर्गंधी पसरल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. मुख्य रस्त्यावरून महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता असून हजारो विद्यार्थी या रस्त्याने जा-ये करीत असतात. ज्येष्ठ नागरिकही या रस्त्याने पाचगणी घाटाकडे फिरायला जात असतात. तसेच या परिसरात खासगी क्लासेस आहेत. या सर्वांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. परिसरातील लोकांनी प्रशासनाला निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही, असे ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.नेचर्स फ्रेंडस् गु्रपच्या लहानग्यांना ही बाब लक्षात आल्याने आपल्याच परिसरातील घाणीचे उच्चाटन करण्यासाठी हाती झाडू घेतला व स्वच्छता करायला सुरुवात केली. नेचर्स ग्रुपमध्ये दत्त तसेच सायली कुंजमधील सदस्य असून ते प्रत्येक रविवारी आपल्या परिसरात स्वच्छता अभियान करीत असतात. त्यांनी प्रत्येक रविवारी आपल्या परिसरात स्वच्छता करण्याचा मानस बोलून दाखविला. अभियानात शीतल काळे, सई जेबले, चेतल काळे, रितेश खामकर, ओंकार केंजळे, श्रुती पोवळे, रचना भोसले, आदित्य पोवळे इत्यादी सदस्यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)स्वच्छतेचा संस्कार अगदी लहान वयातच होणे आवश्यक असते. आजच्या नव्या पिढीचे कसे होणार?, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना या मुलांनी चांगलीच चपराक दिली आहे. लहानग्यांना जे कळते, ते मोठ्यांना कळत नाही. या लहानग्यांकडून सर्वांनी स्वच्छतेचे संस्कार शिकावेत, अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.आम्ही स्वच्छ भारत अभियानापासून प्रेरणा घेऊन आपला परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार केला आहे.श्रुती पोवळे (सदस्य, नेचर्स फ्रेंडस् ग्रुप) ल्ल ल्ल ल्लआम्ही ‘लोकमत’मध्ये आलेले वृत्त पािहले व आपल्याच परिसरातून स्वच्छतेला सुरुवात करण्याचे ठरवले. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ केला तरच स्वच्छ भारत होणार आहे.रितेश खामकर,सदस्य नेचर्स फ्रेंडस् ग्रुपवाई येथील नेचर्स फाउंडेशनच्या चिमुकल्यांनी स्वच्छता मोहीम राबविल्याणामुळे एरवी रस्ता चकाचक झाले होते.