शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

सहा तरुणी, एक युवक बेपत्ता

By admin | Updated: December 9, 2014 00:34 IST

पोलीस तपास सुरू : सातारा, वाई तालुक्यातील घटना

सातारा / वाई : वाई तालुक्यातून दोन युवती, एक युवक आणि सातारा तालुक्यातून चार युवतींचे अपहरण झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सातारा तालुक्यातून एकाच दिवशी चार मुली गायब झाल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात झाल्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेली अशी माहिती की, कोंडवे येथून नेहा हिचे अपहरण झाल्याची तक्रार तिचे वडील संपत यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नेहा हिला दि. १७ नोव्हेबंर रोजी राहत्या घरातून कोणीतरी पळवून नेले. याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हवालदार कांबळे करत आहेत.आटाळी येथून अंकिता आणि सोनाली या दोन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार निर्मला यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी घडल्याची माहितीही निर्मल यांनी म्हटले आहे. याचा तपास हवालदार बोरसे करत आहेत. वनगळ येथून दि. १२ नोव्हेंबर रोजी मोनिका हिला राहत्या घरी असताना कोणीतरी फूस लावून तिचे अपहरण केल्याची तक्रार तिची आई रुक्मिणी यांनी दिली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास हवालदार विलास मराडे करत आहेत. दरम्यान, सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकाच दिवशी चार घटनांची नोंद झाल्यामुळे पोलीसही चक्रावले असून परिसरात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)वाई : येथून दोन अल्पवयीन मुली तर एका महाविद्यालयीन युवकांचे अपहरण झाल्यची तक्रारी वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. कणूर, ता़ वाई येथील बाळकृष्ण काटे (वय १७) हा युवक रविवार, दि. ७ रोजी सकाळी कॉलेजला जातो म्हणून घरातून बाहेर पडला. मात्र, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तो घरी न आल्यामुळे त्याच्या आई-वडिलानी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शहाबाग येथील सतरा वर्षीय मुलगी शाळेत जाते म्हणून सांगून गेली ती घरी परतलीच नाही. तिला अभिषेक गाढवे (वय २२, रा. फुलेनगर, वाई) याने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने दिली आहे.दरम्यान, वाई परिसरातील फुलेनगर येथे आणखी एक घटना घडली असून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला शिवा लक्ष्मण गौडमुरे (रा. दक्षिण सोलापूर) याने पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने दिली आहे. दरम्यान, तक्रारदार महिला मुळची उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. या घटनेनंतर संबंधितांनी ठिकठिकाणी शोध घेतला असता त्याचा कोठेही ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, याप्रकरणी अज्ञाताविरोधात वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस उपनिरीक्षक पी. एन. खरात आणि हवालदार जी. एस. भोईटे करत आहेत. (प्रतिनिधी)बाळकृष्ण ज्या दिवशी निघून गेला त्याचदिवशी सांयकाळी सात वाजता सातारा बसस्थानकातील एका पीसीओवरून बाळकृष्ण काटे याच्या वडिलांना फोन आला आणि ‘मी आप्पा बोलत आहे’, असे सांगून कोणीतरी अज्ञातानी फोन कट केला. त्यामुळे त्याचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. हा युवक गेले पंधरा दिवस महाविद्यालयात गेलाच नसल्याचे महाविद्यालयात चौकशी केल्यानंतर समजले.