शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

बहिणीच्या लग्नापूर्वीच भावंडांचा मृत्यू

By admin | Updated: May 18, 2016 00:11 IST

आदल्यादिवशी अपघात : नारळ आणण्यासाठी नवीन दुचाकीवरून जात असताना अपघात

पुसेसावळी : बहिणीचे लग्न एक दिवसावर येऊन ठेपल्याने नारळ आणण्यासाठी मित्राच्या नवीन गाडीवरून निघालेल्या चुलत भावंडांच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री आठच्या सुमारास झाला. या दुर्घटनेमुळे लग्नघरी शोककळा पसरली आहे. प्रफुल्ल ऊर्फ अमोल सुरेश भोसले, जयदीप जनार्दन भोसले असे ठार झालेल्या चुलत भावंडांची नावे आहेत.घटनास्थळ व भोसले कुटुंबीयांकडून मिळालेली माहिती अशी की, जयदीपच्या बहिणीचे बुधवारी लग्न होते. लग्नाची तयारी झाली होती. विधीसाठी लागणारे नारळ आणण्यासाठी जयदीप (वय २५) व अमोल भोसले (२६) हे मित्राच्या नवीन दुचाकीवरून पुसेसावळीला गेले होते.नारळ खरेदी करून ते परत येताना पुसेसावळी येथील संभाजीनगरजवळ आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुकाकीला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी त्यांना उपचारासाठी कऱ्हाडला हलविले; परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमोल याचा रहिमतपूर येथे गॅरेजचा व्यवसाय होता, तर जयदीप कामानिमित्त दुबईला होता. बहिणाच्या लग्नासाठी तो नागझरी येथे आला होता. या अपघाताची पुसेसावळी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत अद्याप नोंद झाली नव्हती. मंगळवारी सकाळी दोघांचे मृतदेह नागझरीत आणण्यात आले. त्यांच्यावर सकाळी आठच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)