शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दहिवडीत ‘श्रमुद’ बेमुदत शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसवड : ‘म्हसवड ( ता. माण ) भागातील सरंजामांच्या जमिनीचे मोठ्या संख्येतील कूळधारक शेतकरी बांधवांचे कुटुंबासमवेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

म्हसवड : ‘म्हसवड ( ता. माण ) भागातील सरंजामांच्या जमिनीचे मोठ्या संख्येतील कूळधारक शेतकरी बांधवांचे कुटुंबासमवेत दहिवडी येथील प्रांत कार्यालयासमोर गुरुवार ( दि. ११) पासुन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले जाणार आहे, ’ अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.

म्हसवड येेथे शेतकरी बांधवांनी आंदोलन पूर्व तयारीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

येथील सरंजामाची सातबारा सदरी बेकायदेशीररीत्या सरकारने नावे ठेवलेली आहेत, ती कायमस्वरुपी काढून टाकून कसेल त्याची जमीन कायद्याअंतर्गत कूळ हक्कात नोंद असलेले शेतकरीच मालक सदरी नोंद करणे यापूर्वीच गरजेचे होते, तसे सरकारने वेळोवेळी लेखी आदेशही महसूल प्रशासनास दिलेले होते. परंतु या सर्वच आदेशाची वेळोवेळी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदेशास केराची टोपली दाखवित आजअखेर सरंजामाचाच मालकी हक्क ठेवीत पूर्वी कूळांचीच मालकी हक्काची १६ आणे आणेवारीची नोंद असताना पुन्हा येथील सरंजामशाहांची आणखी जादा १६ आणेवारीची नोंद करून महसूल खात्याने तब्बल ३२ आण्याचा सातबारा अस्तित्वात ठेवण्याचा प्रताप केलेला आहे.

सरकारने प्रत्येकाचे सातबारा संगणकीय करून यापूर्वी महसूल खात्याकडून जाणीवपूर्वक केल्या गेलेल्या चुका दुरुस्ती करण्याचा उपक्रम राबविलेला असून या उपक्रमांतर्गत म्हसवड परिसरातील सुमारे ९६० कूळधारक कुटुंबाचे सुमारे ४ हजार २०० हून अधिक संख्येने असलेले ३२ आण्याचे सातबारा दुरुस्ती सरंजाम व कूळधारक शेतकरी बांधवांच्या मालकी हक्काच्या वादात अचूकरित्या संगणकीकरण करणे गेली २६ वर्षांपासून रेंगाळलेले आहेत. दरम्यानच्या कालावधीत सन १९१६ डिसेंबरपासून सर्व शासकीय कामाकरिता संगणकीय सातबारा वापराचे आदेश सरकारने जारी करुन पारंपरिक पुस्तकी सातबारा वापरावर बंदी लागल्यामुळे येथील संबंधित शेतकरी बांधव अडचणीत आले आहे.

(चौकट)

जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत ठिय्या..!

या आंदोलनात सहभागी होण्यासाठी म्हसवड शहरासह परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी बांधवांच्या गेल्या तीन-चार दिवसांपासून नियमित बैठका होत असून, सुमारे शंभर टक्के जमीन कूळधारक शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असल्यामुळे हे आंदोलन शेतकरी बांधवांच्या संख्येने ऐतिहासिक असे निश्चितच ठरेल व जोपर्यंत सरकार येथील सरंजामांची प्रत्येक सातबारा उताऱ्यावर नोंदी करून बोगसरीत्या ठेवलेली नावे काढून टाकून प्रत्येक सातबारा कोरा करून आमचीच नावे असलेला दुरुस्त करून हाती दिला जात नाही, तो पर्यंत दहिवडी येथील प्रांत कार्यालयासमोर ठिय्या मांडून आम्ही बसलेले सर्वजण उठणारच नाही, असा ठाम निर्धार येथील शेतकरी बांधवांनी घेतला आहे.