शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

दहिवडीत ‘श्रमुद’ बेमुदत शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसवड : ‘म्हसवड ( ता. माण ) भागातील सरंजामांच्या जमिनीचे मोठ्या संख्येतील कूळधारक शेतकरी बांधवांचे कुटुंबासमवेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

म्हसवड : ‘म्हसवड ( ता. माण ) भागातील सरंजामांच्या जमिनीचे मोठ्या संख्येतील कूळधारक शेतकरी बांधवांचे कुटुंबासमवेत दहिवडी येथील प्रांत कार्यालयासमोर गुरुवार ( दि. ११) पासुन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले जाणार आहे, ’ अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.

म्हसवड येेथे शेतकरी बांधवांनी आंदोलन पूर्व तयारीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

येथील सरंजामाची सातबारा सदरी बेकायदेशीररीत्या सरकारने नावे ठेवलेली आहेत, ती कायमस्वरुपी काढून टाकून कसेल त्याची जमीन कायद्याअंतर्गत कूळ हक्कात नोंद असलेले शेतकरीच मालक सदरी नोंद करणे यापूर्वीच गरजेचे होते, तसे सरकारने वेळोवेळी लेखी आदेशही महसूल प्रशासनास दिलेले होते. परंतु या सर्वच आदेशाची वेळोवेळी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदेशास केराची टोपली दाखवित आजअखेर सरंजामाचाच मालकी हक्क ठेवीत पूर्वी कूळांचीच मालकी हक्काची १६ आणे आणेवारीची नोंद असताना पुन्हा येथील सरंजामशाहांची आणखी जादा १६ आणेवारीची नोंद करून महसूल खात्याने तब्बल ३२ आण्याचा सातबारा अस्तित्वात ठेवण्याचा प्रताप केलेला आहे.

सरकारने प्रत्येकाचे सातबारा संगणकीय करून यापूर्वी महसूल खात्याकडून जाणीवपूर्वक केल्या गेलेल्या चुका दुरुस्ती करण्याचा उपक्रम राबविलेला असून या उपक्रमांतर्गत म्हसवड परिसरातील सुमारे ९६० कूळधारक कुटुंबाचे सुमारे ४ हजार २०० हून अधिक संख्येने असलेले ३२ आण्याचे सातबारा दुरुस्ती सरंजाम व कूळधारक शेतकरी बांधवांच्या मालकी हक्काच्या वादात अचूकरित्या संगणकीकरण करणे गेली २६ वर्षांपासून रेंगाळलेले आहेत. दरम्यानच्या कालावधीत सन १९१६ डिसेंबरपासून सर्व शासकीय कामाकरिता संगणकीय सातबारा वापराचे आदेश सरकारने जारी करुन पारंपरिक पुस्तकी सातबारा वापरावर बंदी लागल्यामुळे येथील संबंधित शेतकरी बांधव अडचणीत आले आहे.

(चौकट)

जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत ठिय्या..!

या आंदोलनात सहभागी होण्यासाठी म्हसवड शहरासह परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी बांधवांच्या गेल्या तीन-चार दिवसांपासून नियमित बैठका होत असून, सुमारे शंभर टक्के जमीन कूळधारक शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असल्यामुळे हे आंदोलन शेतकरी बांधवांच्या संख्येने ऐतिहासिक असे निश्चितच ठरेल व जोपर्यंत सरकार येथील सरंजामांची प्रत्येक सातबारा उताऱ्यावर नोंदी करून बोगसरीत्या ठेवलेली नावे काढून टाकून प्रत्येक सातबारा कोरा करून आमचीच नावे असलेला दुरुस्त करून हाती दिला जात नाही, तो पर्यंत दहिवडी येथील प्रांत कार्यालयासमोर ठिय्या मांडून आम्ही बसलेले सर्वजण उठणारच नाही, असा ठाम निर्धार येथील शेतकरी बांधवांनी घेतला आहे.