शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

पवनचक्कीच्या डीपीमध्ये शॉर्टसर्किट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:41 IST

मायणी : हिवरवाडी (ता. खटाव) येथील देशमुख मळ्यातील अजित देशमुख यांच्या अडीच एकर क्षेत्रातील आंबा बागेला पवनचक्कीच्या डीपीत झालेल्या ...

मायणी : हिवरवाडी (ता. खटाव) येथील देशमुख मळ्यातील अजित देशमुख यांच्या अडीच एकर क्षेत्रातील आंबा बागेला पवनचक्कीच्या डीपीत झालेल्या शॉर्टसर्किटमुळे साठ आंब्याची झाडे जळाली. त्यामुळे सुमारेे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत आंबा बागायतदार हिंदुराव जगताप यांच्याकडून मिळालेली अधिक माहिती की, सन २००५ मध्ये आमचा मुलगा अजित जगताप याने सुमारे अडीच एकर क्षेत्रामध्ये केशर, हापूस व बदाम अशा विविध जातीच्या आंब्याची सुमारे १५० झाडांची लागण केली होती. सुमारे पंधरा वर्षांपूर्वीची ही आंब्याची झाडे असून, गतवर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व सर्वत्र लाॅकडाऊन असतानाही आम्हाला आठ ते दहा लाख रुपये या आंब्याच्या झाडापासून उत्पन्न मिळाले होते. पुढील महिन्यांमध्ये हा आंबा विक्री योग्य होणार होता, त्यातच परवा शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास येथील बागेच्या वरील बाजूस असलेल्या पवनचक्कीच्या डीपीमध्ये शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण डीपी जळाला, तसेच डीपी जळत असताना डीपीशेजारील वाळलेल्या गवताने पडून गवताने पेट घेतला व मोठ्या प्रमाणात आग लागल्याने ती आग बागेच्या दिशेने आली आणि बागेतील गवताने पेट घेतला.

बागेतील झाडांना आग लागल्याचे पाहून त्यांनी आरडाओरडा केला व आसपासच्या लोकांना बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, केशर, बदाम, हापूस आंब्याची बागेतील साठ झाडे जळून खाक झाली आहेत, तर आंब्याची ९० झाडे वाचविण्यात यश आले. जळीत झाडांची कृषी अधिकारी एस.व्ही. जगताप, तलाठी जी. एन. पिसे, सरपंच सविता जगदाळे, पोलीस पाटील ज्योती माने, किरण देशमुख व कार्यालयातील अधिकारी यांनी पंचनामा केला असल्याचेही जगताप यांनी सांगितले.

(चौकट)

नुकसान भरपाईची मागणी

२००५ पासून अतिशय कष्टाने आंब्याची बाग उभा केली आहे. दुष्काळात प्रत्येक वेळी विकत पाणी घेऊन ती आंब्याची बाग जगविण्यासाठी आम्ही धडपड केली. बागेतील साठ झाडे जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी.

- जयहिंद जगताप, आंबा बागायतदार, हिवरवाडी.

०६मायणी

हिवरवाडी येथील जळालेल्या आंब्याच्या बागेचा पंचनामा करताना कृषी अधिकारी एस.व्ही. जगताप, तलाठी, सरपंच,पोलीस पाटील उपस्थित होते. (छाया : संदीप कुंभार)