शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

पोलीस व्हॅनचा सायरन वाजताच दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:37 IST

शिरवळ : कोरोनाला रोखण्यासाठी शिरवळमध्ये शनिवारी सायंकाळी पाचपासून संचारबंदी लागू केली. बाजारपेठेत सर्व व्यवहार सुरळीत सुरू असतानाच सायंकाळी पाच ...

शिरवळ : कोरोनाला रोखण्यासाठी शिरवळमध्ये शनिवारी सायंकाळी पाचपासून संचारबंदी लागू केली. बाजारपेठेत सर्व व्यवहार सुरळीत सुरू असतानाच सायंकाळी पाच वाजता पोलिसांची गाडी सायनर वाजवत फिरू लागली अन् दुकानं बंद होऊ लागली. पाहता पाहता बाजारपेठेत शुकशुकाट जाणवू लागला.

याबाबत माहिती अशी की, सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार बुधवार, दि. ३१ मार्चपर्यंत शिरवळसह लोणंद याठिकाणी दोन टप्प्यामध्ये संचारबंदीची अंमलबजावणी सुरू आहे. दुसरीकडे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिरवळ ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेत अचानकपणाने शिरवळ ग्रामपंचायतीकडून २७ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या आदेशामुळे शिरवळमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेमध्ये तोबा गर्दी केली होती. राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वपूर्ण बाजारपेठ म्हणून शिरवळचा नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडाळ्याच्या तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी मनीषा ओव्हाळ यांनी शिरवळसह लोणंद याठिकाणी दोन टप्प्यामध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, शिरवळ ग्रामपंचायत इमारतीमध्ये शुक्रवारी काही अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक झाली. काही वेळानंतर सोशल मीडियावर शिरवळ ग्रामपंचायतीचा स्वाक्षरी नसलेला व केवळ शिक्का असलेल्या आदेशाची प्रत फिरू लागली. यामध्ये शनिवार दि. २७ मार्च ते मंगळवार दि. ६ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये स्पीकरवरून ग्रामपंचायतीमार्फत दवंडी फिरू लागल्याने शिरवळमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अवघ्या दोन तासांमध्ये शिरवळच्या भाजी मंडईसह बाजारपेठेमध्ये गर्दी झाली होती.

चौकट

शिरवळमध्ये ५४ कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

शिरवळसारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये केवळ ५४ कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याची बैठकीमध्ये माहिती दिली असल्याची माहिती एका ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. त्यामुळे शिरवळ अकरा दिवस बंद ठेवण्याचा मोजक्याच पदाधिकाऱ्यांमध्ये निर्णय घेतल्याने शिरवळमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कोरोना रोगाच्या उपाययोजनेकरिता शिरवळ ग्रामपंचायत याठिकाणी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याचा निरोप ग्रामपंचायत सदस्यांना मिळाला असताना सकाळी दहा वाजताच बैठक मोजक्याच अधिकारी व पदाधिकारी यांनी घेत हा निर्णय थोपवल्याचा आरोप केला आहे.