शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

शिवसेनेची हवा भारी... पण कुठाय कारभारी?

By admin | Updated: May 22, 2014 00:21 IST

कार्यकारिणी निवड थांबली : विधानसभा निवडणुकीआधी तरी जिल्हाध्यक्ष निवडणार का, हा प्रश्नच

 सागर गुजर, सातारा : लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजताच शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सातारा जिल्ह्याची शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त केली होती. विधानसभेच्या तोंडावरही ती निवडण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला गेलेला नसल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक नेतृत्वाविना पोरके असल्याचे चित्र असून, संघटनेच्या पातळीवरही या पक्षात शिथिलता आल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. ही शिथिलता दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. मूळच्या काँगे्रसच्या बालेकिल्ल्यात अण्णा देशपांडे व त्यांच्या मोजक्या शिलेदारांनी शिवसेनेचे अस्तित्व निर्माण केले आणि ते टिकवूनही ठेवले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीआधी पक्षाने आमदार दगडू सकपाळ यांच्याकडे जिल्ह्याचे संपर्कप्रमुखपद दिले. या निर्णयामुळे शिवसेनेचे संघटन वाढायला मदत झाली. मूळचे जावळी तालुक्यातील असणार्‍या दगडू सकपाळ यांनी जिल्ह्यात शिवसेनेचा झंझावात निर्माण केला. शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली मरगळ झटकली गेली होती. याचा फायदा पुढे लोकसभा निवडणुकीत दिसून आला. सेनेने पुरुषोत्तम जाधव यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व सोपवले. जाधवांनीही संघटनाच्या पातळीवर पक्षात चांगले काम केले. पुढे पक्षाने त्यांना लोकसभेचे तिकीट देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपविली. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढवून तब्बल २ लाख ३५ हजार ६८ मते मिळविली. राष्ट्रवादीच्या उदयनराजेंविरोधात त्यांना पराजयाला सामोरे जावे लागले असले, तरी युतीची ताकद यानिमित्ताने राष्ट्रवादीला समजून आली. शिवसेनेचे संघटन वाढावे व स्थानिक नेतृत्वाला संधी मिळावी, या उद्देशाने शिवसेनेने पुढे जिल्हाध्यक्षपदाची तिघांत विभागणी केली. सातारा व वाई मतदारसंघाचे नेतृत्व पुरुषोत्तम जाधव यांच्याकडे देण्यात आले होते. माढा मतदारसंघाची जबाबदारी हणमंत चवरे यांच्याकडे देण्यात आली तर कºहाड उत्तर व दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व संजय मोहिते यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, या तिघांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुरघोड्या वाढल्या. राष्ट्रवादीच्या ताब्यातील सभापती निवासात आराम करत असणार्‍या हणमंत चवरे यांना तर पक्षातीलच एका गटाने डोळ्यांत मिरच्यांची पूड टाकून मारहाण केली होती. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमधील वाढत्या बेबनावामुळे नाराज झालेल्या उध्दव ठाकरेंनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली होती. लोकसभेला सातारची जागा शिवसेनेच्या वाट्याला येत असतानाही ती महायुतीचा घटकपक्ष असणार्‍या रिपाइंला सोडली. या निवडणुकीत सेनेच्या पुरुषोत्तम जाधवांनी बंडखोरी केली तर महायुतीचे उमेदवार अशोक गायकवाड यांना अवघी ७१ हजार मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेत संघटन उरले नव्हते. शिवसेनेची विभागलेली मते शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष या नात्याने पुरुषोत्तम जाधव यांच्या पारड्यात गेली. विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाही शिवसेनेत कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, असे चित्र आहे. योग्य नेतृत्व न मिळाल्यास कार्यकर्ते काँगे्रस किंवा राष्ट्रवादीच्या गळाला लागू शकतील अथवा मोदी लाटेचा परिणाम म्हणून भाजपच्या वळचणीला जातील. कार्यकर्ते भाजपकडे गेले तरी शिवसेनेच्या राजकारणाला त्याचा तोटा होणार नाही; तथापि पक्षसंघटनेच्या बाबतीत शिवसेना अधिक कमकुवत होण्याचीच शक्यता आहे.