शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची हवा भारी... पण कुठाय कारभारी?

By admin | Updated: May 22, 2014 00:21 IST

कार्यकारिणी निवड थांबली : विधानसभा निवडणुकीआधी तरी जिल्हाध्यक्ष निवडणार का, हा प्रश्नच

 सागर गुजर, सातारा : लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजताच शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सातारा जिल्ह्याची शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त केली होती. विधानसभेच्या तोंडावरही ती निवडण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला गेलेला नसल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक नेतृत्वाविना पोरके असल्याचे चित्र असून, संघटनेच्या पातळीवरही या पक्षात शिथिलता आल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. ही शिथिलता दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. मूळच्या काँगे्रसच्या बालेकिल्ल्यात अण्णा देशपांडे व त्यांच्या मोजक्या शिलेदारांनी शिवसेनेचे अस्तित्व निर्माण केले आणि ते टिकवूनही ठेवले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीआधी पक्षाने आमदार दगडू सकपाळ यांच्याकडे जिल्ह्याचे संपर्कप्रमुखपद दिले. या निर्णयामुळे शिवसेनेचे संघटन वाढायला मदत झाली. मूळचे जावळी तालुक्यातील असणार्‍या दगडू सकपाळ यांनी जिल्ह्यात शिवसेनेचा झंझावात निर्माण केला. शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली मरगळ झटकली गेली होती. याचा फायदा पुढे लोकसभा निवडणुकीत दिसून आला. सेनेने पुरुषोत्तम जाधव यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व सोपवले. जाधवांनीही संघटनाच्या पातळीवर पक्षात चांगले काम केले. पुढे पक्षाने त्यांना लोकसभेचे तिकीट देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपविली. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढवून तब्बल २ लाख ३५ हजार ६८ मते मिळविली. राष्ट्रवादीच्या उदयनराजेंविरोधात त्यांना पराजयाला सामोरे जावे लागले असले, तरी युतीची ताकद यानिमित्ताने राष्ट्रवादीला समजून आली. शिवसेनेचे संघटन वाढावे व स्थानिक नेतृत्वाला संधी मिळावी, या उद्देशाने शिवसेनेने पुढे जिल्हाध्यक्षपदाची तिघांत विभागणी केली. सातारा व वाई मतदारसंघाचे नेतृत्व पुरुषोत्तम जाधव यांच्याकडे देण्यात आले होते. माढा मतदारसंघाची जबाबदारी हणमंत चवरे यांच्याकडे देण्यात आली तर कºहाड उत्तर व दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व संजय मोहिते यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, या तिघांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुरघोड्या वाढल्या. राष्ट्रवादीच्या ताब्यातील सभापती निवासात आराम करत असणार्‍या हणमंत चवरे यांना तर पक्षातीलच एका गटाने डोळ्यांत मिरच्यांची पूड टाकून मारहाण केली होती. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमधील वाढत्या बेबनावामुळे नाराज झालेल्या उध्दव ठाकरेंनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली होती. लोकसभेला सातारची जागा शिवसेनेच्या वाट्याला येत असतानाही ती महायुतीचा घटकपक्ष असणार्‍या रिपाइंला सोडली. या निवडणुकीत सेनेच्या पुरुषोत्तम जाधवांनी बंडखोरी केली तर महायुतीचे उमेदवार अशोक गायकवाड यांना अवघी ७१ हजार मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेत संघटन उरले नव्हते. शिवसेनेची विभागलेली मते शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष या नात्याने पुरुषोत्तम जाधव यांच्या पारड्यात गेली. विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाही शिवसेनेत कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, असे चित्र आहे. योग्य नेतृत्व न मिळाल्यास कार्यकर्ते काँगे्रस किंवा राष्ट्रवादीच्या गळाला लागू शकतील अथवा मोदी लाटेचा परिणाम म्हणून भाजपच्या वळचणीला जातील. कार्यकर्ते भाजपकडे गेले तरी शिवसेनेच्या राजकारणाला त्याचा तोटा होणार नाही; तथापि पक्षसंघटनेच्या बाबतीत शिवसेना अधिक कमकुवत होण्याचीच शक्यता आहे.