शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवमूर्तीच्या साक्षीनं उजळला अजिंक्यतारा!

By admin | Updated: November 24, 2015 00:27 IST

किल्ल्यावर दीपोत्सव : तरुण सातारकरांनी तटबंदीवर केल्या शंभर मशाली अन् दोनशे पणत्या प्रज्वलित

सातारा : साताऱ्याला वैभवशाली ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इतिहासाच्या अनेक खुणा शहर परिसरात आजही दिसतात. ज्या पाहताक्षणी ऊर अभिमानानं भरून येतो. शौर्याची साक्ष देत शेकडो वर्षे भक्कमपणे उभा असलेला अजिंक्यतारा किल्ला तर साताऱ्याचं भूषण आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनित झालेला हा किल्ला सोमवारी रात्री तरुण सातारकरांच्या दीपोत्सवानं उजळून गेला. निर्मिती सोशल ग्रुपच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून तुळशी विवाहाच्या पहिल्या दिवशी अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून दीपोत्सव साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्याचे नियोजन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले. सोमवारी सकाळी अकरा वाजता गु्रपच्या कार्यकर्त्यांनी अजिंक्यतारा किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी व परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर या सोहळ्यासाठी प्रवेशद्वारासमोर ठेवलेल्या छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. सायंकाळी मशाल आणि पणत्या प्रज्वलित करण्याची तयारी पूर्ण झाली; एवढ्यात पाऊस सुरू झाला. मात्र, नाउमेद न होता कार्यकर्त्यांनी प्रवेशव्दाराजवळील जोत्यात आसरा घेऊन मशाली पेटविण्यास सुरूवात केली. या मशालींच्या लखलखत्या प्रकाशात उजळून गेलेल्या शिवमूर्तीचे दर्शन घेताना सारेच कायकर्ते भारावून गेले.यंदा ग्रुपने प्लास्टिक हटाव मोहिमेतही सक्रिय सहभाग घेतला असून स्वच्छता मोहीम तसेच दीपोत्सवासाठी जमलेल्या लोकांना गु्रपच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. ग्रुपचे अध्यक्ष इम्रान मोमीन, उपाध्यक्ष राहुल आग्रवाल यांच्यासह जवळपास शंभर कार्यकर्ते यासाठी प्रयत्न करत असतात. यामध्ये सुशिक्षित आणि नोकरदार मंडळींचाही मोठा सहभाग आहे. अमित काळे आणि अमर बनसोडे मित्र समूहाचेही यासाठी सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)शंभर कार्यकर्त्यांचे किल्ल्यावर श्रमदान--निर्मिती सोशल ग्रुपच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी सोमवारी अजिंक्यतारा किल्ल्यावर श्रमदान करून साफसफाई केली. यामध्ये सुशिक्षितांबरोबरच नोकरदारांचा सहभाग होता. किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी व परिसराची स्वच्छता करण्यात आली. यंदा मोठ्याप्रमाणात सोहळा..गेल्या काही वर्षांपासून तरुण सातारकर एकत्र येऊन साताऱ्याच्या उज्ज्वल इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहेत. अजिंक्यतारा किल्ल्यावर होणारा दीपोत्सव त्याचाच भाग आहे. मात्र, दरवर्षीपेक्षा यंदा हा दीपोत्सव मोठ्या प्रमाणावर करण्याचा निर्णय घेऊन शंभर कार्यकर्त्यांनी शंभर मशाली तयार करून त्या किल्ल्यावर पेटविल्या. तर तटबंदीवर दोनशे पणत्याही प्रज्वलित करण्यात आल्या आहेत. यासाठी दहा किलो तेल लागले.