शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

शिवमूर्तीच्या साक्षीनं उजळला अजिंक्यतारा!

By admin | Updated: November 24, 2015 00:27 IST

किल्ल्यावर दीपोत्सव : तरुण सातारकरांनी तटबंदीवर केल्या शंभर मशाली अन् दोनशे पणत्या प्रज्वलित

सातारा : साताऱ्याला वैभवशाली ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इतिहासाच्या अनेक खुणा शहर परिसरात आजही दिसतात. ज्या पाहताक्षणी ऊर अभिमानानं भरून येतो. शौर्याची साक्ष देत शेकडो वर्षे भक्कमपणे उभा असलेला अजिंक्यतारा किल्ला तर साताऱ्याचं भूषण आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनित झालेला हा किल्ला सोमवारी रात्री तरुण सातारकरांच्या दीपोत्सवानं उजळून गेला. निर्मिती सोशल ग्रुपच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून तुळशी विवाहाच्या पहिल्या दिवशी अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून दीपोत्सव साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्याचे नियोजन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले. सोमवारी सकाळी अकरा वाजता गु्रपच्या कार्यकर्त्यांनी अजिंक्यतारा किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी व परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर या सोहळ्यासाठी प्रवेशद्वारासमोर ठेवलेल्या छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. सायंकाळी मशाल आणि पणत्या प्रज्वलित करण्याची तयारी पूर्ण झाली; एवढ्यात पाऊस सुरू झाला. मात्र, नाउमेद न होता कार्यकर्त्यांनी प्रवेशव्दाराजवळील जोत्यात आसरा घेऊन मशाली पेटविण्यास सुरूवात केली. या मशालींच्या लखलखत्या प्रकाशात उजळून गेलेल्या शिवमूर्तीचे दर्शन घेताना सारेच कायकर्ते भारावून गेले.यंदा ग्रुपने प्लास्टिक हटाव मोहिमेतही सक्रिय सहभाग घेतला असून स्वच्छता मोहीम तसेच दीपोत्सवासाठी जमलेल्या लोकांना गु्रपच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. ग्रुपचे अध्यक्ष इम्रान मोमीन, उपाध्यक्ष राहुल आग्रवाल यांच्यासह जवळपास शंभर कार्यकर्ते यासाठी प्रयत्न करत असतात. यामध्ये सुशिक्षित आणि नोकरदार मंडळींचाही मोठा सहभाग आहे. अमित काळे आणि अमर बनसोडे मित्र समूहाचेही यासाठी सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)शंभर कार्यकर्त्यांचे किल्ल्यावर श्रमदान--निर्मिती सोशल ग्रुपच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी सोमवारी अजिंक्यतारा किल्ल्यावर श्रमदान करून साफसफाई केली. यामध्ये सुशिक्षितांबरोबरच नोकरदारांचा सहभाग होता. किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी व परिसराची स्वच्छता करण्यात आली. यंदा मोठ्याप्रमाणात सोहळा..गेल्या काही वर्षांपासून तरुण सातारकर एकत्र येऊन साताऱ्याच्या उज्ज्वल इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहेत. अजिंक्यतारा किल्ल्यावर होणारा दीपोत्सव त्याचाच भाग आहे. मात्र, दरवर्षीपेक्षा यंदा हा दीपोत्सव मोठ्या प्रमाणावर करण्याचा निर्णय घेऊन शंभर कार्यकर्त्यांनी शंभर मशाली तयार करून त्या किल्ल्यावर पेटविल्या. तर तटबंदीवर दोनशे पणत्याही प्रज्वलित करण्यात आल्या आहेत. यासाठी दहा किलो तेल लागले.