शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

शिवमूर्तीच्या साक्षीनं उजळला अजिंक्यतारा!

By admin | Updated: November 24, 2015 00:27 IST

किल्ल्यावर दीपोत्सव : तरुण सातारकरांनी तटबंदीवर केल्या शंभर मशाली अन् दोनशे पणत्या प्रज्वलित

सातारा : साताऱ्याला वैभवशाली ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इतिहासाच्या अनेक खुणा शहर परिसरात आजही दिसतात. ज्या पाहताक्षणी ऊर अभिमानानं भरून येतो. शौर्याची साक्ष देत शेकडो वर्षे भक्कमपणे उभा असलेला अजिंक्यतारा किल्ला तर साताऱ्याचं भूषण आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनित झालेला हा किल्ला सोमवारी रात्री तरुण सातारकरांच्या दीपोत्सवानं उजळून गेला. निर्मिती सोशल ग्रुपच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून तुळशी विवाहाच्या पहिल्या दिवशी अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून दीपोत्सव साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्याचे नियोजन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले. सोमवारी सकाळी अकरा वाजता गु्रपच्या कार्यकर्त्यांनी अजिंक्यतारा किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी व परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर या सोहळ्यासाठी प्रवेशद्वारासमोर ठेवलेल्या छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. सायंकाळी मशाल आणि पणत्या प्रज्वलित करण्याची तयारी पूर्ण झाली; एवढ्यात पाऊस सुरू झाला. मात्र, नाउमेद न होता कार्यकर्त्यांनी प्रवेशव्दाराजवळील जोत्यात आसरा घेऊन मशाली पेटविण्यास सुरूवात केली. या मशालींच्या लखलखत्या प्रकाशात उजळून गेलेल्या शिवमूर्तीचे दर्शन घेताना सारेच कायकर्ते भारावून गेले.यंदा ग्रुपने प्लास्टिक हटाव मोहिमेतही सक्रिय सहभाग घेतला असून स्वच्छता मोहीम तसेच दीपोत्सवासाठी जमलेल्या लोकांना गु्रपच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. ग्रुपचे अध्यक्ष इम्रान मोमीन, उपाध्यक्ष राहुल आग्रवाल यांच्यासह जवळपास शंभर कार्यकर्ते यासाठी प्रयत्न करत असतात. यामध्ये सुशिक्षित आणि नोकरदार मंडळींचाही मोठा सहभाग आहे. अमित काळे आणि अमर बनसोडे मित्र समूहाचेही यासाठी सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)शंभर कार्यकर्त्यांचे किल्ल्यावर श्रमदान--निर्मिती सोशल ग्रुपच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी सोमवारी अजिंक्यतारा किल्ल्यावर श्रमदान करून साफसफाई केली. यामध्ये सुशिक्षितांबरोबरच नोकरदारांचा सहभाग होता. किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी व परिसराची स्वच्छता करण्यात आली. यंदा मोठ्याप्रमाणात सोहळा..गेल्या काही वर्षांपासून तरुण सातारकर एकत्र येऊन साताऱ्याच्या उज्ज्वल इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहेत. अजिंक्यतारा किल्ल्यावर होणारा दीपोत्सव त्याचाच भाग आहे. मात्र, दरवर्षीपेक्षा यंदा हा दीपोत्सव मोठ्या प्रमाणावर करण्याचा निर्णय घेऊन शंभर कार्यकर्त्यांनी शंभर मशाली तयार करून त्या किल्ल्यावर पेटविल्या. तर तटबंदीवर दोनशे पणत्याही प्रज्वलित करण्यात आल्या आहेत. यासाठी दहा किलो तेल लागले.