शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

किल्ले सदाशिवगडावर साकारणार शिवसृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:21 IST

कऱ्हाड : आगामी काळात छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास भावी पिढीसमोर उभा रहावा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी; तसेच सदाशिवगडाच्या ...

कऱ्हाड : आगामी काळात छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास भावी पिढीसमोर उभा रहावा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी; तसेच सदाशिवगडाच्या ऐतिहासिक वैभवात भर पडावी, विभागाला पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर वनपर्यटन योजनेतून ‘शिवसृष्टी'' प्रकल्प साकारण्यात यावा, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडेे निवेदनाद्वारे केली. प्रकल्पासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना मागणी पत्र नुकतेच देण्यात आले. यावेळी सहय़ाद्री साखर करखान्याचे संचालक रामदास पवार, राजमाचीचे सरपंच शिवाजीराव डुबल, वनवासमाचीचे सरपंच महादेव माने, हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यदव, बाबरमाचीचे उपसरपंच राहुल जांभळे, ॲड. चंद्रकांत कदम, ॲड. दादासाहेब जाधव, प्रल्हादराव डुबल, शंकरराव कदम, माणिकराव माने, विश्वासराव सुर्वे, विश्वासराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. हजारमाची, राजमाची, वनवासमाची, बाबरमाची व विरवडे गावचे सरपंच व पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांच्या मागणी पत्रावर सह्या आहेत.

किल्ले सदाशिवगडाचे ऐतिहासिक महत्त्व वृद्धिंगत व्हावे, यासाठी वन विभागाच्या वनपर्यटन योजनेत गडाचा समावेश व्हावा, वनपर्यटन योजनेतून गडावर शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात यावा, या प्रकल्पाअंतर्गत गडाची तटबंदी, बुरूज व प्रवेशव्दाराची निर्मिती करण्यात यावी, तसेच शिवरायांच्या जन्मकाळापासून राज्याभिषेकापर्यंतचे इतिहासातील प्रमुख प्रसंग शिल्प व चित्ररूपात साकारण्यात यावेत, जेणेकरून शिवसृष्टी पाहिल्यानंतर शिवप्रेमी, गडप्रेमी व नवीन पिढीसमोर छत्रपती शिवरायांचा इतिहास उभा राहील. गडावर शिवसृष्टी प्रकल्प साकारल्यास राज्यासह परराज्यातून शिवप्रेमी व पर्यटक किल्ले सदाशिवगडाला भेट देतील. यामुळे सदाशिवगड विभागातील पर्यटन वाढीस मदत होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

चौकट

रस्त्याच्या सर्व्हेचे काम पूर्णत्वाकडे

गडावर प्राचीन सदाशिवाचे मंदिर आहे. मात्र गडाच्या पायथ्याला राहणाऱ्या हजारो शिवभक्तांना प्रकृतीच्या कारणामुळे सदाशिवाच्या दर्शनापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे सदाशिवगडावर रस्ता करावा, अशी मागणी गतवर्षी पाच गावांनी केली होती. याची दखल घेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचनांनुसार रस्ते विकास मंडळाने संपूर्ण गडाचा ड्रोनव्दारे सर्व्हे केला असून, राजमाची व बाबरमाची बाजूकडून रस्त्यांची आखणी केली आहे. शासनाच्या निकषानुसार सोपा व सुरक्षित रस्त्याची शासनाच्यावतीने निवड करण्यात येणार आहे.