शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

किल्ले सदाशिवगडावर साकारणार शिवसृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:21 IST

कऱ्हाड : आगामी काळात छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास भावी पिढीसमोर उभा रहावा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी; तसेच सदाशिवगडाच्या ...

कऱ्हाड : आगामी काळात छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास भावी पिढीसमोर उभा रहावा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी; तसेच सदाशिवगडाच्या ऐतिहासिक वैभवात भर पडावी, विभागाला पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर वनपर्यटन योजनेतून ‘शिवसृष्टी'' प्रकल्प साकारण्यात यावा, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडेे निवेदनाद्वारे केली. प्रकल्पासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना मागणी पत्र नुकतेच देण्यात आले. यावेळी सहय़ाद्री साखर करखान्याचे संचालक रामदास पवार, राजमाचीचे सरपंच शिवाजीराव डुबल, वनवासमाचीचे सरपंच महादेव माने, हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यदव, बाबरमाचीचे उपसरपंच राहुल जांभळे, ॲड. चंद्रकांत कदम, ॲड. दादासाहेब जाधव, प्रल्हादराव डुबल, शंकरराव कदम, माणिकराव माने, विश्वासराव सुर्वे, विश्वासराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. हजारमाची, राजमाची, वनवासमाची, बाबरमाची व विरवडे गावचे सरपंच व पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांच्या मागणी पत्रावर सह्या आहेत.

किल्ले सदाशिवगडाचे ऐतिहासिक महत्त्व वृद्धिंगत व्हावे, यासाठी वन विभागाच्या वनपर्यटन योजनेत गडाचा समावेश व्हावा, वनपर्यटन योजनेतून गडावर शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात यावा, या प्रकल्पाअंतर्गत गडाची तटबंदी, बुरूज व प्रवेशव्दाराची निर्मिती करण्यात यावी, तसेच शिवरायांच्या जन्मकाळापासून राज्याभिषेकापर्यंतचे इतिहासातील प्रमुख प्रसंग शिल्प व चित्ररूपात साकारण्यात यावेत, जेणेकरून शिवसृष्टी पाहिल्यानंतर शिवप्रेमी, गडप्रेमी व नवीन पिढीसमोर छत्रपती शिवरायांचा इतिहास उभा राहील. गडावर शिवसृष्टी प्रकल्प साकारल्यास राज्यासह परराज्यातून शिवप्रेमी व पर्यटक किल्ले सदाशिवगडाला भेट देतील. यामुळे सदाशिवगड विभागातील पर्यटन वाढीस मदत होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

चौकट

रस्त्याच्या सर्व्हेचे काम पूर्णत्वाकडे

गडावर प्राचीन सदाशिवाचे मंदिर आहे. मात्र गडाच्या पायथ्याला राहणाऱ्या हजारो शिवभक्तांना प्रकृतीच्या कारणामुळे सदाशिवाच्या दर्शनापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे सदाशिवगडावर रस्ता करावा, अशी मागणी गतवर्षी पाच गावांनी केली होती. याची दखल घेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचनांनुसार रस्ते विकास मंडळाने संपूर्ण गडाचा ड्रोनव्दारे सर्व्हे केला असून, राजमाची व बाबरमाची बाजूकडून रस्त्यांची आखणी केली आहे. शासनाच्या निकषानुसार सोपा व सुरक्षित रस्त्याची शासनाच्यावतीने निवड करण्यात येणार आहे.