शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोयना प्रकल्पग्रस्तांचा शासनाच्या नावाने ‘शिमगा’ : आंदोलनस्थळीच होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 22:44 IST

कोयनानगर : कोयना प्रकल्पग्रस्त आता करो या मरो या भूमिकेत असून, गुरुवारी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळीच होळीचा सण साजरा केला.

कोयनानगर : कोयना प्रकल्पग्रस्त आता करो या मरो या भूमिकेत असून, गुरुवारी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळीच होळीचा सण साजरा केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या नावाने अक्षरश: ‘शिमगा’ करीत बोंब ठोकली.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाकडे जिल्हाधिकारी अथवा तहसीलदारांनीही पाहिलेले नाही. त्यांनी या आंदोलनाची कसलीच दखल घेतली नाही. शासनाकडून होत असलेली अवहेलना आणि राज्यकर्त्यांकडून होणारे वेळकाढू धोरण यामुळे गेल्या ६४ वर्षांत येथील जनता वैतागून गेली आहे. प्रकल्पग्रस्तांनी सुरुवातीला सातारा आणि नंतर कोयनानगर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. धरणग्रस्त हजारोच्या संख्येने या आंदोलनास बसले आहेत. मुख्यमंत्र्यांना नदीकाठी गाण्याच्या तालावर नाचायला वेळ आहे; पण आम्हा प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मुंबईहून आलेले चाकरमानीही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

कोयना प्रकल्पाचे सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता कुमार पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. मागण्यांचे प्रस्ताव त्वरित शासनस्तरावर पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी डॉ. भारत पाटणकर यांच्यासह आंदोलकांनी आंदोलनस्थळी होळी साजरी केली. तसेच शासनाच्या नावाने ‘बोंब’ ठोकली. यावेळी महिलांनी होळीची गाणी म्हटली. ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा,’ ‘धरण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,’ यासारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. होळीचे सर्व कार्यक्रम आंदोलकांनी विधिवत आंदोलनस्थळी साजरे केले. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे हरिश्चंद्र दळवी, विठ्ठल सपकाळ, संजय लाड, परशुराम शिर्के , सीताराम पवार, चैतन्य दळवी, महेश शेलार, सचिन कदम, दाजी पाटील, श्रीपती माने, डी. डी. कदम, शिवाजी साळुंखे, संभाजी चाळके यांच्यासह हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.‘द्रुष्ट प्रवृत्ती नष्ट करा’ म्हणत पेटवली होळीदेशभर होळीचा सण उत्साहात साजरा होत असताना ज्यांच्या त्यागाने शहर व गावे उजळून निघाली त्या प्रकल्पग्रस्तांना मात्र हा सण आंदोलनस्थळी साजरा करावा लागला. त्यांची होळी कोयनामाईच्या काठावर भाकरीच्या शोधासाठी व फाटलेला संसार जोडण्यासाठी साजरी झाली. धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्त यांच्या जीवनात अंधकार, दु:ख, दारिद्र्य निर्माण करणाºया द्रुष्ट प्रवृत्ती या होळीत जाळून नष्ट करा, अशा आशयाची मागणी करत आंदोलनस्थळी होळी पेटवण्यात आली.कोयनानगर, ता. पाटण येथे प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळीच होळी पेटवून शासनाच्या नावाने शिमगा केला.