शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोयना प्रकल्पग्रस्तांचा शासनाच्या नावाने ‘शिमगा’ : आंदोलनस्थळीच होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 22:44 IST

कोयनानगर : कोयना प्रकल्पग्रस्त आता करो या मरो या भूमिकेत असून, गुरुवारी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळीच होळीचा सण साजरा केला.

कोयनानगर : कोयना प्रकल्पग्रस्त आता करो या मरो या भूमिकेत असून, गुरुवारी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळीच होळीचा सण साजरा केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या नावाने अक्षरश: ‘शिमगा’ करीत बोंब ठोकली.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाकडे जिल्हाधिकारी अथवा तहसीलदारांनीही पाहिलेले नाही. त्यांनी या आंदोलनाची कसलीच दखल घेतली नाही. शासनाकडून होत असलेली अवहेलना आणि राज्यकर्त्यांकडून होणारे वेळकाढू धोरण यामुळे गेल्या ६४ वर्षांत येथील जनता वैतागून गेली आहे. प्रकल्पग्रस्तांनी सुरुवातीला सातारा आणि नंतर कोयनानगर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. धरणग्रस्त हजारोच्या संख्येने या आंदोलनास बसले आहेत. मुख्यमंत्र्यांना नदीकाठी गाण्याच्या तालावर नाचायला वेळ आहे; पण आम्हा प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मुंबईहून आलेले चाकरमानीही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

कोयना प्रकल्पाचे सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता कुमार पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. मागण्यांचे प्रस्ताव त्वरित शासनस्तरावर पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी डॉ. भारत पाटणकर यांच्यासह आंदोलकांनी आंदोलनस्थळी होळी साजरी केली. तसेच शासनाच्या नावाने ‘बोंब’ ठोकली. यावेळी महिलांनी होळीची गाणी म्हटली. ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा,’ ‘धरण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,’ यासारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. होळीचे सर्व कार्यक्रम आंदोलकांनी विधिवत आंदोलनस्थळी साजरे केले. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे हरिश्चंद्र दळवी, विठ्ठल सपकाळ, संजय लाड, परशुराम शिर्के , सीताराम पवार, चैतन्य दळवी, महेश शेलार, सचिन कदम, दाजी पाटील, श्रीपती माने, डी. डी. कदम, शिवाजी साळुंखे, संभाजी चाळके यांच्यासह हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.‘द्रुष्ट प्रवृत्ती नष्ट करा’ म्हणत पेटवली होळीदेशभर होळीचा सण उत्साहात साजरा होत असताना ज्यांच्या त्यागाने शहर व गावे उजळून निघाली त्या प्रकल्पग्रस्तांना मात्र हा सण आंदोलनस्थळी साजरा करावा लागला. त्यांची होळी कोयनामाईच्या काठावर भाकरीच्या शोधासाठी व फाटलेला संसार जोडण्यासाठी साजरी झाली. धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्त यांच्या जीवनात अंधकार, दु:ख, दारिद्र्य निर्माण करणाºया द्रुष्ट प्रवृत्ती या होळीत जाळून नष्ट करा, अशा आशयाची मागणी करत आंदोलनस्थळी होळी पेटवण्यात आली.कोयनानगर, ता. पाटण येथे प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळीच होळी पेटवून शासनाच्या नावाने शिमगा केला.