शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घामाच्या धारानंतर बरसल्या जलधारा! : माण तालुक्यात वळवाची हजेरी; वॉटर कपच्या कामाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 20:26 IST

सातारा : गेल्या दीड महिन्यापासून माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात वॉटर कप स्पर्धेचं तुफान आलं असून उन्हातही हजारो लोक घाम गाळत आहेत. आता या घामाच्या धारानंतर शुक्रवारी सायंकाळी माणमध्ये वळवाच्या पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे माळरानंही पाणीदार होत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या तीन वर्षांपासून राज्यात अभिनेता अमिर ...

ठळक मुद्देश्रमदानामुळे माळरानावर साठले पाणी

सातारा : गेल्या दीड महिन्यापासून माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात वॉटर कप स्पर्धेचं तुफान आलं असून उन्हातही हजारो लोक घाम गाळत आहेत. आता या घामाच्या धारानंतर शुक्रवारी सायंकाळी माणमध्ये वळवाच्या पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे माळरानंही पाणीदार होत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या तीन वर्षांपासून राज्यात अभिनेता अमिर खान यांच्या पाणी फौंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमुळे राज्यातील अनेक गावं पाणीदार झाली आहेत. सातारा जिल्ह्यातही माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यात तर या वॉटर कप स्पर्धेचं तुफान आलं आहे.

यंदाच्या तिसऱ्यावर्षी या तीन तालुक्यातील दिडशेच्यावर गावे सहभागी झाली आहेत. ८ एप्रिलपासून या गावांत वॉटर कप स्पर्धे अंतर्गत श्रमदान सुरू आहे. दररोज हजारो लोक गाव पाणीदार करण्यासाठी काम करत आहेत. तसेच अनेक संस्थांनी आर्थिक मदत दिली आहे. काहींनी पोकलेन, जेसीबीसारख्या मशिनरी देऊ केल्या आहेत. त्यामुळे जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात उभे राहिले आहे.

हे कामच या गावांना पाणीदार करुन जाणार आहे.गेल्या दीड महिन्यापासून कडाक्याच्या उन्हात घामांनी न्हाऊन निघाल्यानंतर आता वरुणराजानेही जलाभिषेक करण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी सायंकाळनंतर माण तालुक्यातील अनेक गावांत वळवाचा पाऊस झाला. वरकुटे मलवडी, बनगरवाडी, चिलारवाडी, शेनवडी, कुकुडवाड या गावांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या पावसाचे पाणी जलसंधारणासाठी काम झालेल्या ठिकाणी साठले आहे. माळरानावरही जागोजागी पाणी अडले आहे. त्यामुळे लोकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वॉटर कप स्पर्धेंतर्गत काम केल्याचे समाधान वाटत आहे, असे आनंदाने ग्रामस्थ सांगत आहेत.पाणीपातळी वाढणार...बनगरवाडी, वरकुटे मलवडी, कुकुडवाड, चिलारवाडीत वॉटर कप स्पर्धेचं काम चांगलं सुरू आहे. या ठिकाणी डीपसीसीटी, नालाबांध, बंधाºयातील गाळ काढणे, ओढा रुंदीकरणाचे काम झाले आहे. शुक्रवारी सायंकाळनंतर झालेल्या वळवाच्या पावसाने पाणी साठले आहे. त्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढणार आहे. उन्हाळ्यात झालेला हा पाऊस उन्हाळी पिकांनाही फायदेशिर ठरणार आहे. तसेच आणखी एखादा पाऊस झाल्यास खरीप हंगामापूर्वीच्या मशागतींना वेग येणार आहे. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा