शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

सावली फाउंडेशनने दिले मातंग वस्तीला स्वच्छ पाणी!

By admin | Updated: June 4, 2015 00:03 IST

कातरखटाव येथील घटना : खासगी कूपनलिकेचा मालक विनामूल्य पुरवतोय पिण्याचे पाणी--- गूड न्यूज

विठ्ठल नलवडे - कातरखटाव  -येथील मातंग वस्ती गेल्या तीन महिन्यांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरी जात आहे. वस्तीची अडचण लक्षात घेऊन येथील सावली फाउंडेशनने त्यांच्यासाठी मोफत पाण्याच्या टँकरची सोय केली आहे.कातरखटाव गावात अंतर्गत नळाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. पाणीयोजनेची पाईपलाईन मातंगवस्तीला पहिल्यापासून जोडली गेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिला ठिकठिकाणी पायपीट करत होत्या. पंधरा टक्के अनुदानातील मागासवर्गीयांना शासनाकडून मिळणारे डबे पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी दिले जाणार नाही, असे ग्रामपंचायतीने सांगितले होते. कातरखटावपासून अर्ध्या किलोमीटरवर असणाऱ्या मातंगवस्तीला आतापर्यंत स्थानिक बोअरचा आसरा होता. बोअरच्या पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे मातंग वस्तीवरील महिला व ग्रामंस्थाची पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी तीन महिने त्रेधातिरपीट सुरू आहे. कडक उन्हाळा संपत आल्यानंतर मे महिन्याअखेरीस ग्रामपंचायतीद्वारे शासनाने येरळा धरणातील न फिल्टर केलेला शेवाळलेल्या पाण्याचा टँकर पाठवला. हे पाणी घेण्यास मातंग वस्तीच्या महिला व ग्रामस्थांनी नकार दिला. शेवाळलेले, चिकट, अशुध्द पाणी आम्हाला नको आहे, असे येथील महिलांनी सांगितले.पाणीपट्टी समान लावणारे आणि पाणीपुरवठा करताना आस्था न दाखवणाऱ्या गावाने वर्षातून किती महिने मातंग वस्तीला पाणी पुरवले व पाणीपट्टी कोणा-कोणाची वसूल केली, असा सवाल पोपट मोरे यांनी उपस्थित केला आहे. मातंग वस्तीतील हा प्रकार समजल्यानंतर सावली फाउंडेशनने पुढाकार घेऊन खासगी बोअरचे पाणी सुरू केले. रोज नियमितपणे या वस्तीला विनामोबदला पाण्याचे वाटप केले जात आहे. काही दिवसांपूर्वी येरळा धरणातील शासकीय पाण्याचा टँकर आम्ही मातंग वस्तीला देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी ‘आम्हाला गढूळ पाणी नको आहे. आमची पोरंबाळं आजारी पडतील, टँकर खाली करायचा नाही,’ असे सांगितले. महिला व मातंग वस्तीमधील ग्रांमस्थानी टँकर परत पाठविला. काही शासकीय अडचणीमुळे टँकर उशिरा मिळाला असला तरी वाड्या-वस्त्यानां सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. राजेंद्र बागल, सरपंच, कातरखटाव गेली चार महिने मातंग वस्तीमधील महिला व ग्रामस्थ पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. अशा वेळी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष का? या गंभीर परिस्थितीची जाण ठेवून गावातील खासगी मालक स्वत:च्या बोअरचे पाणी गेली दीड महिन्यापासून मातंग वस्तीला पुरवत आहेत. पाणी न देता गोरगंरीबांकडून पाणीपट्टी वसूल करण्यापुरती ग्रामपंचायत आहे का? मातंग वस्तीला दिलेली ही वागणूक लोकशाहीत अयोग्य आहे.पोपट मोरे, ग्रामस्थ, कातरखटाव व माजी सभापती