शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा दुरुस्ती... अजून जरा थांबा, अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 11:52 IST

खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सातबारा दुरुस्तीसाठीचा १५५ चा अर्ज गेल्या सहा महिन्यांपूर्वी केला होता. त्या अर्जाची दखल अजून घेतली जात नाही. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांला जाब विचारला असता. तर अजून जरा थांबा, असेच उत्तर मिळत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तहसील प्रशासनाबाबत उदासिनता निर्र्माण होत आहे.

ठळक मुद्दे सातबारा दुरुस्ती... अजून जरा थांबा, अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना उत्तरे तहसील प्रशासनाचा अनेकांना फटका

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सातबारा दुरुस्तीसाठीचा १५५ चा अर्ज गेल्या सहा महिन्यांपूर्वी केला होता. त्या अर्जाची दखल अजून घेतली जात नाही. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांला जाब विचारला असता. तर अजून जरा थांबा, असेच उत्तर मिळत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तहसील प्रशासनाबाबत उदासिनता निर्र्माण होत आहे.खटाव तालुक्यातील चोराडे, वडगाव, निमसोड म्हासुर्णे, गोरेगाव (वांगी), रहाटणी, शेनवडी, कळंबी येथील शेतकऱ्यांना सातबारा दुरुस्तीसाठीचा १५५ चा अर्ज व आॅनलाईन सातबारा काढण्यास वडूज तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.

आॅनलाईन सातबारा दुरुस्तीसाठी १५५ चा अर्ज व नवीन रेशनकार्ड काढण्यास दिलेल्या अर्जदारांनी किती दिवस वडूजवारी करायची, याचा विचार अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत असून, याबाबत वडूज तहसीलदार लक्ष घालणार का ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.त्याचबरोबर सातबारा काढणारे सर्व्हर डाऊन तर कधी नेट बंद, अधिकारी असे कारणे देऊन, याचे आज काम होणार नाही. दोन दिवसांनी या, असे सांगून शेतकऱ्यांना माघारी पाठवले जात आहे. तसेच दोन दिवसांनी आल्यावर त्याच पद्धतीने उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुसतीच मोकळी वडूजवारी करावी लागत आहे.सध्या शासनाने आॅनलाईन सातबारा उतारा असल्याशिवाय कोणताही जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, वारस नोंदी, हक्कसोडपत्र, बँकबोजा, सातबारा दुरुस्ती आदी कामांसाठी आॅनलाईन सातबारा आवश्यक केले. त्यातच आता मार्च एंड चालू असून, सातबाऱ्यांची आवश्यकता असल्यामुळे शेतकऱ्यांला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. बँकांनी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा त्यांच्या दुरुस्ती करण्यास अमाप खर्च येत आहे.तसेच तलाठ्यांनी आॅनलाईन उतारे करताना अनेक चुका केल्यामुळे सातबारा दुरुस्तीसाठी तहसीलदारांना अर्ज करावे लागत असल्यामुळे कामे वेळेवर होत नाहीत. तरी याकडे गांभीर्याने प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांची कोणतीही कामे वेळेत होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना वडूजला मोकळे हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र दिसत आहेत.वडूज तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारूनही आॅनलाईन सातबारा उताऱ्यांची दुरुस्ती केली जात नाही. आॅनलाईन सातबारा भरताना संबंधित अधिकाऱ्यांकंडून चुका झालेल्या आहेत. ही दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना १५५ चा अर्ज तहसीलदाराच्या नावे द्यावा लागत आहे. तरी ही पद्धत बंद करून तलाठ्यांना अधिकार देऊन सातबारा उतारे दुरुस्त करून दिले पाहिजेत. 

टॅग्स :GovernmentसरकारSatara areaसातारा परिसर