शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

सातबारा दुरुस्ती... अजून जरा थांबा, अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 11:52 IST

खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सातबारा दुरुस्तीसाठीचा १५५ चा अर्ज गेल्या सहा महिन्यांपूर्वी केला होता. त्या अर्जाची दखल अजून घेतली जात नाही. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांला जाब विचारला असता. तर अजून जरा थांबा, असेच उत्तर मिळत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तहसील प्रशासनाबाबत उदासिनता निर्र्माण होत आहे.

ठळक मुद्दे सातबारा दुरुस्ती... अजून जरा थांबा, अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना उत्तरे तहसील प्रशासनाचा अनेकांना फटका

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सातबारा दुरुस्तीसाठीचा १५५ चा अर्ज गेल्या सहा महिन्यांपूर्वी केला होता. त्या अर्जाची दखल अजून घेतली जात नाही. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांला जाब विचारला असता. तर अजून जरा थांबा, असेच उत्तर मिळत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तहसील प्रशासनाबाबत उदासिनता निर्र्माण होत आहे.खटाव तालुक्यातील चोराडे, वडगाव, निमसोड म्हासुर्णे, गोरेगाव (वांगी), रहाटणी, शेनवडी, कळंबी येथील शेतकऱ्यांना सातबारा दुरुस्तीसाठीचा १५५ चा अर्ज व आॅनलाईन सातबारा काढण्यास वडूज तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.

आॅनलाईन सातबारा दुरुस्तीसाठी १५५ चा अर्ज व नवीन रेशनकार्ड काढण्यास दिलेल्या अर्जदारांनी किती दिवस वडूजवारी करायची, याचा विचार अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत असून, याबाबत वडूज तहसीलदार लक्ष घालणार का ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.त्याचबरोबर सातबारा काढणारे सर्व्हर डाऊन तर कधी नेट बंद, अधिकारी असे कारणे देऊन, याचे आज काम होणार नाही. दोन दिवसांनी या, असे सांगून शेतकऱ्यांना माघारी पाठवले जात आहे. तसेच दोन दिवसांनी आल्यावर त्याच पद्धतीने उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुसतीच मोकळी वडूजवारी करावी लागत आहे.सध्या शासनाने आॅनलाईन सातबारा उतारा असल्याशिवाय कोणताही जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, वारस नोंदी, हक्कसोडपत्र, बँकबोजा, सातबारा दुरुस्ती आदी कामांसाठी आॅनलाईन सातबारा आवश्यक केले. त्यातच आता मार्च एंड चालू असून, सातबाऱ्यांची आवश्यकता असल्यामुळे शेतकऱ्यांला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. बँकांनी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा त्यांच्या दुरुस्ती करण्यास अमाप खर्च येत आहे.तसेच तलाठ्यांनी आॅनलाईन उतारे करताना अनेक चुका केल्यामुळे सातबारा दुरुस्तीसाठी तहसीलदारांना अर्ज करावे लागत असल्यामुळे कामे वेळेवर होत नाहीत. तरी याकडे गांभीर्याने प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांची कोणतीही कामे वेळेत होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना वडूजला मोकळे हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र दिसत आहेत.वडूज तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारूनही आॅनलाईन सातबारा उताऱ्यांची दुरुस्ती केली जात नाही. आॅनलाईन सातबारा भरताना संबंधित अधिकाऱ्यांकंडून चुका झालेल्या आहेत. ही दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना १५५ चा अर्ज तहसीलदाराच्या नावे द्यावा लागत आहे. तरी ही पद्धत बंद करून तलाठ्यांना अधिकार देऊन सातबारा उतारे दुरुस्त करून दिले पाहिजेत. 

टॅग्स :GovernmentसरकारSatara areaसातारा परिसर