शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सेवागिरी महाराजांनी बळ द्यावे

By admin | Updated: January 9, 2016 00:57 IST

गिरीश बापट : राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन; यात्रेकरूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुसेगाव : ‘सरकार, विरोधी पक्ष व विद्यमान सदस्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हल्लाबोल केला तर विविध प्रश्न तातडीने मार्गी लागतील. नैसर्गिक असमतोलामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंताग्रस्त असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी श्री सेवागिरी महाराजांनी बळ द्यावे,’ असे साकडे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी पुसेगाव येथील राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ‘श्रीं’च्या चरणी घातले.यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, विजय जाधव, शुअरशॉट इव्हेंटचे संचालक संदीप गिड्डे, किरण बर्गे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार साळुंखे, बाळासाहेब जाधव, दादासाहेब काळे, चांगदेव बागल, विठ्ठलराव भुजबळ, अरुण जाधव, विशाल बागल आदींची प्रमुख उपस्थिती होती.बापट म्हणाले, ‘शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू मानून शासन शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवत आहे. या योजना यशस्वी करण्याची जबाबदारी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर असते. शेतकरी आणि संबंधित अधिकारी अधिक जागृत असल्यास येणारे दिवस निश्चितच उज्ज्वल असतील. राजकारण हा निवडणुकीपुरता मर्यादित ठेवून इतर वेळी सर्व पक्षांनी सामाजिक बांधिंलकीच्या जाणिवेतून एकत्र येण्याची गरज आहे. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय केला पाहिजे. दिवसेंदिवस निर्सग बदलत आहे. त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. शेतकऱ्यांची कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी व त्याचे कुटुंब सुस्थितीत राहिले तरच शासनव्यवस्था अबाधित राहू शकते. आपत्कालीन परिस्थितीत शासनव्यवस्था चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.’आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘जलयुक्त शिवार’ योजनेचा पायाच खटाव-माणच्या मातीत असून, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने येरळा नदी पुनरुज्जीवनाच्या माध्यमातून प्रभावी काम सुरू केले आहे. शासनाने निधी वाटपाबाबत दुष्काळी व टंचाईग्रस्त तालुक्यांना झुकते माप द्यावे. जिहे-कठापूर योजना खटाव-माणला नवसंजीवनी देणार असल्यामुळे शासनाने तातडीने या योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.’प्रास्ताविकभाषणात डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ‘येरळा नदी पुनरुज्जीवन योजना यशस्वी राबविण्यासाठी शासकीय व अशासकीय निधी मिळवून देण्यासाठी तसेच तीर्थक्षेत्राच्या ‘ब’ वर्गातून येथील देवस्थानला निधीची तरतूद करावी, नेर धरणातील जलसाठापैकी ठराविक साठा रथोत्सव काळासाठी राखीव करण्याची तरतूद करावी.’ यावेळी आ. आनंदराव पाटील यांचेही भाषण झाले.दरम्यान, देवस्थान ट्रस्टच्या वतीने निवडक १२ शेतकऱ्यांना ‘शेतीनिष्ठ’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. तसेच या कृषीप्रदर्शनाचे नेटके नियोजन केल्याबद्दल शुअरशॉट इव्हेंटचे संचालक संदीप गिड्डे यांचा सत्कार करण्यात आला. मोहन गुरव यांनी सूत्रसंचलन केले. (वार्ताहर)... तर माण-खटाव सुजलाम्-सुफलाम् : चव्हाणमाजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊसशेती केली जात असून, यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असतो. या पाण्याची ५० टक्के बचत करण्यासाठी ऊसशेती पूर्णत: ठिबक सिंचनद्वारे केली पाहिजे, यासाठी जनजागृतीबरोबर ठिबक सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांना वेळेत दिले गेले पाहिजे. मुख्यमंत्री असताना जिहे-कठापूर योजनेसाठी मंजूर केलेल्या १६० कोटींपैकी ८० कोटी अदा केले आहेत. उर्वरित रक्कम या शासनाने दिल्यास खटाव-माण हा भाग सुजलाम्-सुफलाम् होईल,’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.‘जिहे-कठापूर’साठी निधीची तरतूद करूमानसिक समाधानासाठी श्रद्धा आवश्यक आहेच; पण त्यापुढे जाऊन शेती व वैज्ञानिक विकासासाठीही विषेश प्रयत्न देवस्थानच्या माध्यमातून झाले पाहिजेत. शासनावर नैसर्गिक संकाटामुळे निधीचा अतिरिक्त ताण असल्याने बजेटशिवाय एक हजार कोटी निधी खर्च झाला आहे. त्यामुळे आगामी काळात खटाव-माण साठी वरदान ठरणाऱ्या जिहे-कठापूर योजनेसाठी निधीची लवकरच तरतूद करू, असे आश्वासन त्यांनी दिले.