शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दुभाजकातील रोपे पाण्याअभावी होरपळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा असलेला हा रस्ता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात चौपदरी करण्यात आला. दुभाजकात वृक्षारोपण केल्याने ...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा असलेला हा रस्ता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात चौपदरी करण्यात आला. दुभाजकात वृक्षारोपण केल्याने हा रस्ता खूपच आकर्षक दिसतो. रात्री समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश या वृक्षांमुळे तोंडावर येत नाही आणि वाहन चालवणे सुकर होत असते. पावसाळ्यात या झाडांना बहर येतो. रस्त्याचे सौंदर्य खुलून दिसते. मात्र, या रोपांची निगा राखण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत.

पावसाळा संपून तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे; मात्र, या तीन महिन्यांत या वृक्षांना कोणीही पाणी पुरवठा केला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने किंवा ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी म्हणून या झाडांना पाणी देण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे सध्या ही रोपे सुकून जाऊ लागली आहेत. लवकरच पाणी न दिल्यास काही दिवसात यातील काही रोपे जळून जातील, अशी भीती निर्माण झाली आहे.

- चौकट

मलकापूरसारखी निगा राखली जावी!

मलकापूर येथे ढेबेवाडी रस्त्याच्या दुभाजकात लावलेल्या रोपांना नियमित पाणी दिले जाते. त्यामुळे या भागातील वृक्ष नेहमीच टवटवीत दिसतात. त्यांची योग्य काळजी घेतली जात असल्याने वेगाने वाढ होत आहे. अशीच निगा राखत व उन्हाळ्यात नियमित पाणी देण्याची सोय करण्याची मागणी विद्यानगरवासीय करीत आहेत.

फोटो : ०५केआरडी०१

कॅप्शन : विद्यानगर येथे रस्त्याच्या दुभाजकातील रोपे पाण्याअभावी होरपळून गेली आहेत. (छाया : संदीप कोरडे)