शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

किल्ले वर्धनगडवर दुसरे दुर्ग संमेलन

By admin | Updated: November 6, 2014 00:03 IST

दि. १५, १६ नोव्हेंबर : निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, नितीन बानुगडे-पाटील, प्रमोद मांडे यांची उपस्थिती

सातारा : येथील शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती आणि राज्यातील विविध १८ संस्थांच्या वतीने महाराष्ट्रातील दुसरे दुर्ग संमेलन खटाव तालुक्यातील किल्ले वर्धनगड येथे दि. १५ व १६ नोव्हेंबरला होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच या संमेलनात निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, नितीन बानुगडे-पाटील, प्रमोद मांडे आदींची उपस्थिती राहणार असल्याचेही सांगण्यात आले.येथील पत्रकार परिषदेत आयोजकांनी ही माहिती दिली. यावेळी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील, कार्यप्रमुख सुदाम गायकवाड, निमंत्रक दीपक प्रभावळकर, प्रा. के.एन. देसाई, अजय जाधवराव, वर्धनगडचे सरपंच अर्जून मोहिते आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील पहिले दुर्ग संमेलन सदाशिवगड येथे झाले होते. दुसरे संमेलन किल्ले वर्धनगडावर होत आहे. दि. १५ व १६ नोव्हेंबरला हे संमेलन होत आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील आहेत. उद्घाटक दुर्ग महर्षी प्रमोद मांडे हे आहेत. त्याचबरोबर आमदार शशिकांत शिंदे व मठाधिपती सुंदरगिरी महाराज हे कार्याध्यक्ष असून, कार्यप्रमुख अर्जुन मोहिते, सुदाम गायकवाड आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, दुर्गप्रेमी प्र. के. घाणेकर, ज्येष्ठ दुर्ग संरक्षक मिलिंद क्षीरसागर, शस्त्रास्त्र संग्राहक व अभ्यासक गिरीशराव जाधव, शिवप्रेमी अभ्यासक अजय जाधवराव, दुर्ग लेखक प्रा. कुलदीप देसाई, पुरातत्वीय संशोधक डॉ. सचिन जोशी, व्याख्याते इंद्रजित सावंत, इंद्रजित देशमुख, चित्रपट लेखक प्रताप गंगावणे आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित राहणार आहेत. संमेलनात सहभागी होणाऱ्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यांनी मोबाइलवरून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. दोन दिवसांच्या या संमेलनात दि. १५ रोजी सकाळ नावनोंदणी व स्वागत असा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर किल्यावर चढाई, दुर्गपूजन, ध्वजपूजन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर उद्घाटन होऊन व्याख्यानाचे कार्यक्रम होणार आहेत. रात्री शाहिरी व मर्दानी खेळ आणि जागर कार्यक्रम होणार आहेत. दि. १६ रोजी सकाळी स्पर्धा होणार असून, त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी चर्चासत्र तर दुपारी संमेलनातील ठराव व सांगता समारंभ होणार आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)साताऱ्यात मोठे दुर्ग वैभव...नव्या पिढीला गड-किल्यांची ओळख व्हावी. येथील समृद्ध इतिहास समजावा. स्वराज निर्माण कसे झाले ते कळावे, यासाठी अशा संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात मोठे दुर्ग वैभव आहे. तेही समोर यावे, यासाठी किल्ले वर्धनगडावर दुसरे दुर्ग संमेलन घेण्यात आले आहे. यापुर्वीचे संमेलन सदाशिवगड येथे झाले होते. यावर्षीच्या संमेलनात राज्यातील सुमारे १८ संस्था सहभागी झाल्या आहेत. दरवर्षी दुर्ग संमेलनाला प्रतिसाद वाढत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नवीन पिढीपुढे यावा यासाठी दुर्ग संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाचे दुसरे दुर्ग संमेलन सातारा जिल्ह्यातील किल्ले वर्धनगडवर होत आहे. ही गोष्ट जिल्ह्याच्यादृष्टीने अभिमानास्पद अशीच आहे. - नितीन बानुगडे-पाटीलछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नवीन पिढीपुढे यावा यासाठी दुर्ग संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाचे दुसरे दुर्ग संमेलन सातारा जिल्ह्यातील किल्ले वर्धनगडवर होत आहे. ही गोष्ट जिल्ह्याच्यादृष्टीने अभिमानास्पद अशीच आहे. - नितीन बानुगडे-पाटील