शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

बाजार समितीसाठी दुरंगी लढत!

By admin | Updated: July 16, 2015 20:42 IST

कऱ्हाड : निवडणुकीत सत्तांतर होणार का, याकडेच सर्वांचे लक्ष

कऱ्हाड : कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक दुरंगी होण्याचेच संकेत मिळत आहेत. १९ जागेसाठी १२२ अर्ज दाखल झाले असले तरी अंतिम क्षणी ३८ अर्ज राहतील, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे बाजार समितीत पुन्हा सत्तांतर होणार की सत्ता अबाधित राहणार, याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे.सुमारे सहा वर्षांपूर्वी कऱ्हाड तालुक्याच्या राजकारणात गटतट व पक्ष बाजूला ठेवत आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाआघाडी आकाराला आली. बाजार समितीवर प्रदीर्घ काळ उंडाळकरांची असणारी सत्ता उलथवून टाकण्यात या आघाडीला यश आले. त्यानंतर जिल्हा बँकेवर असणारे उंडाळकरांचे वर्चस्वही संपले. तर विधानसभेलाही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.विधानसभेनंतर मात्र तालुक्याच्या राजकारणात उंडाळकर-भोसले नव्या मैत्रिपर्वाला सुरुवात झाली असून, कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत त्याला यशही मिळाले आहे. त्यामुळे या मैत्रिपर्वाला आता बाजार समिती खुणवू लागली आहे. कुठल्याही परिस्थितीत बाजार समितीची सत्ता हस्तगत करायची यासाठी उंडाळकर पितापुत्रांनी फिल्डिंग लावली आहे. तर कारखाना निवडणुकीत हातभार लावलेल्या उंडाळकरांच्या ऋणातून उत्तराई व्हायचं, ही डॉ. अतुल भोसले गटाची मानसिकता आहे. त्यामुळे हे मैत्रिपर्व चांगलेच कामाला लागले आहे. याऊलट सत्ताधारी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखालील आघाडी ही कामाला लागली आहे.माजी मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील यांच्यासह उंडाळकर विरोधकही एकवटले आहेत. त्यांनीही शेवटच्या दिवशी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करून ‘हम भी हैं जोश में’ हे दाखवून दिले आहे. १९ जागेसाठी १२२ अर्ज दाखल आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी ३० जुलै पर्यंत अवधी असल्याने राजकीय आखाडे बांधत आपापल्या पॅनेलचे उमेदवार निश्चित करण्यास अडसर येणार नाही. बाजार समितीची निवडणूक आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी विरुद्ध माजी आमदार विलासराव पाटील व डॉ. अतुल भोसले यांचे संयुक्त पॅनेल यांच्यात होणार, हे निश्चित! यात कोण बाजी मारणार याची सध्या तालुक्याच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा आहे. (प्रतिनिधी)कृषी प्रक्रिया मतदारसंघ रिक्त...कृषी प्रक्रिया मतदार संघासाठी उंब्रजच्या महेशकुमार जगन्नाथ जाधव व मलकापूरच्या मनोहर भास्करराव शिंदे यांचे अर्ज दाखल झाले होते. सर्वच अर्जांची छाननी झाली. यावेळी महेशकुमार जाधव व मनोहर शिंदे यांच्या अर्जामध्ये अनुमोदक नसल्याने ते अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे कृषी प्रक्रिया मतदारसंघ रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे.