शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

राज्यस्तरीय पथकाकडून जखिणवाडीचे परीक्षण

By admin | Updated: October 30, 2015 23:44 IST

गावात दिवाळी : सडा, रांगोळ्यांनी सजले अंगण; पारंपरिक खेळांचे आकर्षण

मलकापूर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जखिणवाडी गावाने पुणे विभागात दुसरा क्रमांक मिळविल्याने राज्य पातळीवरील स्पर्धेत धडक मारली होती. या अभियानांतर्गत राज्यस्तरीय पथकाने गुरुवारी परीक्षण केले. या राज्यस्तरीय कमिटीचे गावात जंगी स्वागत करण्यात आले, तर सडा रांगोळ्यांनी गावाला सजविल्यामुळे गावात दिवाळीच साजरी झाली. शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात तालुका जिल्हा विभागातील व राज्यस्तरीय पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. जखिणवाडी गावाने शासनाच्या विविध १० पुरस्काराबरोबरच स्वच्छतेचे सातत्य राखत स्वच्छता अभियानात तालुका व जिल्हा पातळीवर प्रथम तर पुणे विभागात दुसरा क्रमांक पटकावत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पातळीवर प्रथम तर पुणे विभागात दुसरा क्रमांक पटकावत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्रता सिध्द केली होती. त्यानुसार राज्यस्तरीय पथकाने गुरुवारी जखिणवाडी गावाचे निरीक्षण केले. गावाने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे सातत्य पाहून समितीने गावातील एकीचे कौतुक केले. बंदीस्त गटार, सौरग्राम, परसबागा, व्यायामशाळा, सांडपाणी व्यवस्थापन, बंदिस्त गटार यासह विविध नाविन्यपूर्ण योजनांची पाहणी केली. या पाहणी पथकात राज्याचे अप्पर सचिव वसंत माने, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीचे अध्यक्ष भास्करराव पेरे, उगम ग्रामविकास संस्थेचे सुशांत पाईकराव, गोपुरी आश्रमशाळेचे न्योगी, प्रवीण पुरो, सतीश कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच महेश गुरव, ग्रामसेवक एन. डी. लोहार, तंटामुक्त अध्यक्ष रामचंद्र पाटील, पी. जी. पाटील यांच्यासह महिला सदस्या व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी) महिलांच्या हाती सत्ता देशाला आदर्श राज्यस्तरीय निरीक्षण पथकाने पहाणी केल्यानंतर येथील मळाईदेवी मंदिरात स्वागत समारंभ घेण्यात आला. यावेळी राज्याचे अप्पर सचिव वसंत माने म्हणाले, ‘सर्वच्या सर्व महिलांना बिनविरोध निवडून देऊन गावाने देशाला आदर्श घालून दिला. हे गाव राज्यातच काय, देशात चमकेल असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.’ ‘आदर्श घेतल्यास इतिहास घडेलजखिणवाडीने स्वच्छता अभियानात सातत्य राखले हे आदर्शवत आहे. पण राज्यात इतर गावांनीही असाच आदर्श घेऊन स्वच्छता राखल्यास इतिहास घडेल. प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात केल्यास शासनाला अभियानच राबवावे लागणार नाही.’ असे मत राज्याचे अभियानाचे अध्यक्ष भास्करराव पेरे यांनी व्यक्त केले.