शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शेतीतील विज्ञान आता नव्याने मांडावे लागेल - देवेंद्र फडणवीस 

By दीपक शिंदे | Updated: January 17, 2024 16:35 IST

कऱ्हाड येथे कृष्णा कृषी महोत्सवाचे शानदार उद्घाटन

कऱ्हाड : अलीकडच्या काळात काही पैलवान इंजेक्शन घेऊन मोठे होतात; पण ते दीर्घकाळ टिकत नाहीत. त्याप्रमाणेच उत्पादन वाढीच्या नावाखाली रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून वाढवलेली पिके सुद्धा आता फार काळ चालणार नाहीत. आम्हाला विषमुक्त शेतीचाच विचार करावा लागेल. पुन्हा एकदा शेतीचे विज्ञान नव्याने मांडावे लागेल असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.कऱ्हाड येथे दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या कृष्णा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माथाडीचे नेते नरेंद्र पाटील, डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हा अध्यक्ष मनोज घोरपडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, विनायक भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, रामकृष्ण वेताळ, संग्राम बर्गे आदींची प्रमुख उपस्थिती होती.फडणवीस म्हणाले, या देशातले पहिले शास्त्रज्ञ हे शेतकरीच आहेत. त्यांनी गरजेनुसार वेगवेगळे प्रयोग केले, नवनवीन उत्पादने घेतली. पण अलीकडच्या काळात उत्पादकता वाढीच्या नावाखाली केमिकल खतांचा होणारा भरमसाठ वापर हा भविष्य काळात परवडणारा नाही. म्हणून आम्हाला नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा विचार करावा लागेल.आज प्रत्येक ठिकाणी क्षारपड जमिनीचे क्षेत्र वाढत चालले आहे. म्हणूनच खतांचा आणि पाण्याचा वापर कसा करायचा? ते समजून घेतले पाहिजे. पिकाला आवश्यक तेवढेच पाणी व खत दिले पाहिजे. आपल्याकडे कृषी क्षेत्रासाठी वातावरण पूरक आहे. पण आधुनिक शेती व्यवस्थापनामुळे ज्या देशात पाण्याचे प्रमाण कमी आहे ते देश शेतीमध्ये आपल्यापेक्षा अधिक प्रगत दिसतात. त्याचा आपल्यालाच विचार करावा लागेल. कृषी व उद्योग क्षेत्राने हातात हात घालून काम केल्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती नाही हे कृष्णा उद्योग समूहाने जाणले. म्हणूनच आज कृषी व औद्योगिक प्रदर्शन आकाराला आले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल असा आशावादही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक व स्वागत डॉ. अतुल भोसले यांनी केले. आभार गजेंद्र पाटील यांनी मांनले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस