शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

शेतीतील विज्ञान आता नव्याने मांडावे लागेल - देवेंद्र फडणवीस 

By दीपक शिंदे | Updated: January 17, 2024 16:35 IST

कऱ्हाड येथे कृष्णा कृषी महोत्सवाचे शानदार उद्घाटन

कऱ्हाड : अलीकडच्या काळात काही पैलवान इंजेक्शन घेऊन मोठे होतात; पण ते दीर्घकाळ टिकत नाहीत. त्याप्रमाणेच उत्पादन वाढीच्या नावाखाली रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून वाढवलेली पिके सुद्धा आता फार काळ चालणार नाहीत. आम्हाला विषमुक्त शेतीचाच विचार करावा लागेल. पुन्हा एकदा शेतीचे विज्ञान नव्याने मांडावे लागेल असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.कऱ्हाड येथे दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या कृष्णा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माथाडीचे नेते नरेंद्र पाटील, डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हा अध्यक्ष मनोज घोरपडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, विनायक भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, रामकृष्ण वेताळ, संग्राम बर्गे आदींची प्रमुख उपस्थिती होती.फडणवीस म्हणाले, या देशातले पहिले शास्त्रज्ञ हे शेतकरीच आहेत. त्यांनी गरजेनुसार वेगवेगळे प्रयोग केले, नवनवीन उत्पादने घेतली. पण अलीकडच्या काळात उत्पादकता वाढीच्या नावाखाली केमिकल खतांचा होणारा भरमसाठ वापर हा भविष्य काळात परवडणारा नाही. म्हणून आम्हाला नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा विचार करावा लागेल.आज प्रत्येक ठिकाणी क्षारपड जमिनीचे क्षेत्र वाढत चालले आहे. म्हणूनच खतांचा आणि पाण्याचा वापर कसा करायचा? ते समजून घेतले पाहिजे. पिकाला आवश्यक तेवढेच पाणी व खत दिले पाहिजे. आपल्याकडे कृषी क्षेत्रासाठी वातावरण पूरक आहे. पण आधुनिक शेती व्यवस्थापनामुळे ज्या देशात पाण्याचे प्रमाण कमी आहे ते देश शेतीमध्ये आपल्यापेक्षा अधिक प्रगत दिसतात. त्याचा आपल्यालाच विचार करावा लागेल. कृषी व उद्योग क्षेत्राने हातात हात घालून काम केल्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती नाही हे कृष्णा उद्योग समूहाने जाणले. म्हणूनच आज कृषी व औद्योगिक प्रदर्शन आकाराला आले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल असा आशावादही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक व स्वागत डॉ. अतुल भोसले यांनी केले. आभार गजेंद्र पाटील यांनी मांनले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस