शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

शेतीतील विज्ञान आता नव्याने मांडावे लागेल - देवेंद्र फडणवीस 

By दीपक शिंदे | Updated: January 17, 2024 16:35 IST

कऱ्हाड येथे कृष्णा कृषी महोत्सवाचे शानदार उद्घाटन

कऱ्हाड : अलीकडच्या काळात काही पैलवान इंजेक्शन घेऊन मोठे होतात; पण ते दीर्घकाळ टिकत नाहीत. त्याप्रमाणेच उत्पादन वाढीच्या नावाखाली रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून वाढवलेली पिके सुद्धा आता फार काळ चालणार नाहीत. आम्हाला विषमुक्त शेतीचाच विचार करावा लागेल. पुन्हा एकदा शेतीचे विज्ञान नव्याने मांडावे लागेल असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.कऱ्हाड येथे दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या कृष्णा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माथाडीचे नेते नरेंद्र पाटील, डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हा अध्यक्ष मनोज घोरपडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, विनायक भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, रामकृष्ण वेताळ, संग्राम बर्गे आदींची प्रमुख उपस्थिती होती.फडणवीस म्हणाले, या देशातले पहिले शास्त्रज्ञ हे शेतकरीच आहेत. त्यांनी गरजेनुसार वेगवेगळे प्रयोग केले, नवनवीन उत्पादने घेतली. पण अलीकडच्या काळात उत्पादकता वाढीच्या नावाखाली केमिकल खतांचा होणारा भरमसाठ वापर हा भविष्य काळात परवडणारा नाही. म्हणून आम्हाला नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा विचार करावा लागेल.आज प्रत्येक ठिकाणी क्षारपड जमिनीचे क्षेत्र वाढत चालले आहे. म्हणूनच खतांचा आणि पाण्याचा वापर कसा करायचा? ते समजून घेतले पाहिजे. पिकाला आवश्यक तेवढेच पाणी व खत दिले पाहिजे. आपल्याकडे कृषी क्षेत्रासाठी वातावरण पूरक आहे. पण आधुनिक शेती व्यवस्थापनामुळे ज्या देशात पाण्याचे प्रमाण कमी आहे ते देश शेतीमध्ये आपल्यापेक्षा अधिक प्रगत दिसतात. त्याचा आपल्यालाच विचार करावा लागेल. कृषी व उद्योग क्षेत्राने हातात हात घालून काम केल्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती नाही हे कृष्णा उद्योग समूहाने जाणले. म्हणूनच आज कृषी व औद्योगिक प्रदर्शन आकाराला आले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल असा आशावादही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक व स्वागत डॉ. अतुल भोसले यांनी केले. आभार गजेंद्र पाटील यांनी मांनले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस