शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

राज्यातील शाळांना लवकरच थकित वेतनेतर अनुदान मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:40 IST

मलकापूर : ‘शाळांच्या वेतनेतर अनुदानाबाबत शिक्षण संस्था महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका, तर सातारा जिल्हा शिक्षण संस्था ...

मलकापूर : ‘शाळांच्या वेतनेतर अनुदानाबाबत शिक्षण संस्था महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका, तर सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाने पाच वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले होते. शिक्षण विभागाने शाळांना प्रचलित आयोगानुसार त्वरित अनुदान द्यावे, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत, असे केंद्रीय मंत्री विजय नवल-पाटील यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील शाळांना लवकरच थकित वेतनेतर अनुदान लवकरच आहे,’ अशी माहिती शिक्षणसंस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी दिली.

थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाने तीन वर्षांपासून खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांना कोरोनाचे कारण पुढे करून एक रुपयाही वेतनेतर अनुदान दिले नव्हते. शिक्षण सचिव, आयुक्त, संचालक, उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना कायद्याप्रमाणे नोटिसा बजावल्या होत्या. महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी ही मागणी वेळोवेळी लावून धरली होती. तसेच जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात वैयक्तिक रिट पिटीशन दाखल केले होते. त्यानुसार शासनाला नोटीस बजावण्याची प्रक्रिया उच्च न्यायालयात झाली होती. तसेच विजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत महामंडळाचे पदाधिकारी अशोकराव थोरात, रवींद्र फडणवीस, विजय गव्हाणे, गणपतराव बालवडकर, एस. पी. जवळकर, वाल्मीक सुरासे, आमदार किरण सरनाईक, सुधीर तांबे, विक्रम काळे यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांसाठी बैठक आयोजित केली होती. तरीही निर्णय झाला नव्हता.

शेवटी महामंडळाने या मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानंतर रवींद्र फडणवीस, नागपूर यांनी न्यायालयात पाठपुरावा करून शासनाने कोर्टाच्या निर्णयाला दिरंगाई केल्यामुळे शिक्षण विभागाच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने शाळांना प्रचलित आयोगानुसार (सातव्या) वेतनेतर अनुदान त्वरित घ्यावे, असे निर्देश खंडपीठाने दिले. याची दखल घेऊन शासनाने वेतनेतर अनुदानासाठी तात्काळ २३७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याचा पहिला हप्ता शिक्षण आयुक्तांकडे त्वरित वर्ग केला आहे. संस्थांच्या लढ्यामुळे आता शाळांना पाच टक्केऐवजी सात ते आठ टक्के वेतनेतर अनुदान मिळणार आहे.

चौकट

गुणवत्ता वाढीसाठी उपयोग

कोरोनात शाळांच्या खर्चाला व गुणवत्तावाढीला ही रक्कम उपयोगी पडणार आहे. यासाठी राज्यातील शिक्षण संस्था व महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षण संस्था महामंडळ, जिल्हा शिक्षण संस्था संघ व शिक्षणक्षेत्रातील अनेकांचे प्रयत्न, चर्चा, आंदोलने, निवेदने याची दखल घेऊन शासनाला वेतनेतर अनुदान देणे भाग पडले. उर्वरित मागण्यांसाठी राज्यातील सर्व संस्थाचालकांनी एकत्रित येऊन संघटित लढा द्यावा, असे आव्हान राज्य सरकार्यवाह आमदार विजय गव्हाणे, उपाध्यक्ष अशोकराव थोरात, वसंत घुईखेडकर, रावसाहेब पाटील, शिवाजीराव माळकर, एस. टी. सुकरे, रामदास पवार, मनोज पाटील, अजित वडगावकर यांनी केले.