शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-महाविद्यालयच बंद असल्याने मिळेना प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

सातारा : ‘गाव तिथं एसटी’ अन् ‘प्रवाशी हेच दैवत’ हे ब्रीदवाक्य घेऊन उत्पन्नापेक्षा प्रवाशांच्या सेवेला महत्व देऊन एसटीने ...

सातारा : ‘गाव तिथं एसटी’ अन् ‘प्रवाशी हेच दैवत’ हे ब्रीदवाक्य घेऊन उत्पन्नापेक्षा प्रवाशांच्या सेवेला महत्व देऊन एसटीने सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्यांतील दुर्गम वाड्या वस्त्या, जावळी खोऱ्यातील गावागावत जाळं विणलं आहे. पण कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये अजूनही बंद असल्याने हक्काचे प्रवासी घरात आहेत. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटीने उत्पन्न मिळविण्यासाठी पुणे, मुंबई आदी मोठ्या शहरांमध्ये धाव घेतली आहे.

एसटीचे मुख्य उत्पन्नाचे साधन हे विद्यार्थी वाहतूक आहे. कोरोनापूर्वी विद्यार्थ्यांची गरज भागविताना एसटीची दमछाक होत होती. मात्र आता सर्वच विद्यार्थी घरात बसून आहेत. त्यातच कोरोनाचा धोका असल्याने लोक शहरात जाण्यास धजावत नाहीत.

चौकट

शहरात येण्यासाठी ‘टमटम’ किंवा खासगी वाहने

सातारा तसेच प्रमुख शहरात ग्रामीण भागातून येण्यासाठी एसटी नसल्याने टमटम किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मिळेल त्या गाड्यांना हात करुन थांबविले जाते. यामध्ये अनेकदा ट्रक, टॅँकरचाही समावेश असतो.

कोट

सातारा आगारातून सध्या राज्यातील प्रमुख शहरात वाहतूक सुरू असली तरी सोमवार, दि. १९ पासून तालुक्यातील ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे होणारी गैरसोय दूर होणार आहे.

- रेश्मा गाडेकर

आगार व्यवस्थापक, सातारा.

सातारा तालुक्यातील धावडशीला पूर्वी सकाळी सहापासून दहापर्यंत एसटी यायची. मात्र आता एकही गाडी येत नसल्याने साताऱ्याला येण्यासाठी मिळेल त्या वाहनाला हात करण्याची वेळ आमच्यावर येत आहे.

- सागर पवार, प्रवासी.

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन दररोज शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. पण त्या साताऱ्यातील पंधरा वीस किलोमीटर अंतरातील लहान गावांमध्ये राहत नाहीत. त्यावर उपाय निघणे गरजेचे आहे.

- स्वप्निल शिंगटे, प्रवासी

बावीस हजारांचा रोजचा प्रवास पण ग्रामीणशिवाय

सातारा आगारातून पुणे, मुंबई, बोरिवली आदी भागात एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत.

सातारा आगारातून दररोज सरासरी बावीस हजार किलोमीटरच्या फेऱ्या सुरू आहेत.

ग्रामीण प्रवाशांना याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे एसटी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.