शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

‘धोम-बलकवडी’च्या पाण्यात घोटाळा-: धरण बचाव समितीचा कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:13 IST

सातारा : धोम-बलकवडी धरणाच्या प्रकल्प मंजुरीमध्ये बेकायदा बदल करून जलसंपदा विभागाने रब्बी हंगामासाठी पाणी सोडले आहे, हे पाणी सोडण्यात ...

ठळक मुद्देअधिकाऱ्यांविरोधात तक्रार

सातारा : धोम-बलकवडी धरणाच्या प्रकल्प मंजुरीमध्ये बेकायदा बदल करून जलसंपदा विभागाने रब्बी हंगामासाठी पाणी सोडले आहे, हे पाणी सोडण्यात मोठा घोटाळा करण्यात आला असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करत धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे सोमवारी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

धोम धरणाच्या वरच्या बाजूला धोम-बलकवडी हे धरण बांधण्यात आले. भोर, खंडाळा, फलटण या तीन तालुक्यांतील १८ हजार १०० हेक्टर क्षेत्रासाठी केवळ खरीप हंगामात पाण्याची सोय होण्यासाठी धोम बलकवडी धरणाची निर्मिती करण्यात आली. हे स्पष्ट असताना देखील जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी बेकायदा केंद्रीय जल आयोगाची व कृष्णा पाणी वाटप लवाद यांची परवानगी न घेता महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन आठमाही पीक रचना मंजूर केल्याबाबत भासवून रब्बी हंगामाकरिता पाणी सोडण्याचे बेकायदा कृत्य केले आहे. धोम बलकवडी धरणातून २.७० टीएमसीपेक्षा जास्त पाणी वापरले आहे.

ही वस्तुस्थिती असताना अधिकाºयांनी डीपीआरमधील तरतुदींचा भंग करून बेकायदा धोम-बलकवडी कालव्यात २.७0 टीएमसी पेक्षा जास्त पाणी धोम-बलकवडी धरणातून सोडले. याउलट धोम धरणातून लाभ क्षेत्रातील सातारा, कोरेगाव, जावळी, वाई तालुक्यांतील शेतीसाठी पाणी सोडले नाही. शेतीचे पाणी कमी पडल्याने तसेच ते वेळेत न सोडल्याने शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

याप्रकरणी संबंधित अधिकाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चंद्रकांत बर्गे, माणिकराव भोसले, हणमंत जगदाळे, रणजित फाळके, राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे, अर्जुन भोसले, उत्तम बर्गे, महादेव भोसले, शिवाजीराव माने, युवराज बर्गे, प्रताप बर्गे, जगदीश पवार, नंदकुमार माने, संतोष नलावडे यांनी सहभाग घेतला. दरम्यान, याप्रकरणी संबंधित अधिकाºयांविरोधात गुन्हे दाखल करण्याबाबत कोरेगाव व रहिमतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचेही समितीतर्फे दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्गधोम-बलवकडी धरणातून मंजूर डीपीआरनुसार २.७५ टीएमसी पाणी सोडण्याची मर्यादा आहे. सन २०१३ ते आजअखेर मंजूर डीपीआरचा भंग करून ३ टीएमसीपेक्षा ज्यादा पाण्याचा विसर्ग कालव्यात करण्यात आला, असा आरोपही संघर्ष समितीने केला आहे.

 

टॅग्स :DamधरणSatara areaसातारा परिसर