शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

‘धोम-बलकवडी’च्या पाण्यात घोटाळा-: धरण बचाव समितीचा कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:13 IST

सातारा : धोम-बलकवडी धरणाच्या प्रकल्प मंजुरीमध्ये बेकायदा बदल करून जलसंपदा विभागाने रब्बी हंगामासाठी पाणी सोडले आहे, हे पाणी सोडण्यात ...

ठळक मुद्देअधिकाऱ्यांविरोधात तक्रार

सातारा : धोम-बलकवडी धरणाच्या प्रकल्प मंजुरीमध्ये बेकायदा बदल करून जलसंपदा विभागाने रब्बी हंगामासाठी पाणी सोडले आहे, हे पाणी सोडण्यात मोठा घोटाळा करण्यात आला असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करत धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे सोमवारी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

धोम धरणाच्या वरच्या बाजूला धोम-बलकवडी हे धरण बांधण्यात आले. भोर, खंडाळा, फलटण या तीन तालुक्यांतील १८ हजार १०० हेक्टर क्षेत्रासाठी केवळ खरीप हंगामात पाण्याची सोय होण्यासाठी धोम बलकवडी धरणाची निर्मिती करण्यात आली. हे स्पष्ट असताना देखील जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी बेकायदा केंद्रीय जल आयोगाची व कृष्णा पाणी वाटप लवाद यांची परवानगी न घेता महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन आठमाही पीक रचना मंजूर केल्याबाबत भासवून रब्बी हंगामाकरिता पाणी सोडण्याचे बेकायदा कृत्य केले आहे. धोम बलकवडी धरणातून २.७० टीएमसीपेक्षा जास्त पाणी वापरले आहे.

ही वस्तुस्थिती असताना अधिकाºयांनी डीपीआरमधील तरतुदींचा भंग करून बेकायदा धोम-बलकवडी कालव्यात २.७0 टीएमसी पेक्षा जास्त पाणी धोम-बलकवडी धरणातून सोडले. याउलट धोम धरणातून लाभ क्षेत्रातील सातारा, कोरेगाव, जावळी, वाई तालुक्यांतील शेतीसाठी पाणी सोडले नाही. शेतीचे पाणी कमी पडल्याने तसेच ते वेळेत न सोडल्याने शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

याप्रकरणी संबंधित अधिकाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चंद्रकांत बर्गे, माणिकराव भोसले, हणमंत जगदाळे, रणजित फाळके, राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे, अर्जुन भोसले, उत्तम बर्गे, महादेव भोसले, शिवाजीराव माने, युवराज बर्गे, प्रताप बर्गे, जगदीश पवार, नंदकुमार माने, संतोष नलावडे यांनी सहभाग घेतला. दरम्यान, याप्रकरणी संबंधित अधिकाºयांविरोधात गुन्हे दाखल करण्याबाबत कोरेगाव व रहिमतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचेही समितीतर्फे दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्गधोम-बलवकडी धरणातून मंजूर डीपीआरनुसार २.७५ टीएमसी पाणी सोडण्याची मर्यादा आहे. सन २०१३ ते आजअखेर मंजूर डीपीआरचा भंग करून ३ टीएमसीपेक्षा ज्यादा पाण्याचा विसर्ग कालव्यात करण्यात आला, असा आरोपही संघर्ष समितीने केला आहे.

 

टॅग्स :DamधरणSatara areaसातारा परिसर