शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

रेवंडे खुनात ‘लोकमत’ वृत्त ठरले ‘सुमोटो’ सातारा पोलिसांकडून गुन्हा दाखल : एकाला अटक;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:06 IST

सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या लक्ष्मण बाबूराव माने (वय ४९, रा. रेवंडे, ता. सातारा) यांचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते.

ठळक मुद्देपरस्पर न्यायनिवाडा करणाऱ्या पंचांचा पर्दाफाश

दत्ता यादव ।सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या लक्ष्मण बाबूराव माने (वय ४९, रा. रेवंडे, ता. सातारा) यांचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते.

‘लोकमत’च्या या वृत्ताची दखल घेऊन ‘सुमोटो’द्वारे पोलिसांनी गुरुवारी पहाटे पावणेदोन वाजता खुनाचा गुन्हा दाखल करून एकाला अटकही केली.जितेंद्र हणमंत भोसले (वय ३३, रा. रेवंडे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ‘खूनप्रकरणी गावात समांतर न्यायालय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. या अजब घटनेने समाजमन ढवळून निघाले. अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे ‘लोकमत’ने पंच कमिटीच्या निर्णयाची प्रत सादर केली. त्यावेळी तेही हा अजब न्यायनिवाडा पाहून चकीत झाले.

तक्रारदार नसेल तरी पोलिसांनी या प्रकरणामध्ये ‘सुमोटो’ने तक्रार देणे गरजेचे होते, असे मत व्यक्त करतच त्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. अधीक्षकांनी अधिकाºयांना सुनावल्यानंतर रेवंडे येथे टीम दाखल झाली. त्यानंतर पुढील सुत्रे हालली. त्यानंतर पंच कमिटीचा पर्दाफाश पोलिसांनी केला.

या प्रकरणामध्ये पोलीस हेड कान्स्टेबल हणमंत सावंत यांनी स्वत: तक्रार दिली असून, तक्रारीत म्हटले आहे की, पीडित मुलीचा विनयभंग केल्याच्या कारणावरून लक्ष्मण बाबूराव माने हे दारूच्या नशेत जितेंद्र भोसले याला गावात रस्त्याने येता जाता शिवीगाळ करीत होते. या कारणावरून २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रेवंडे गावातील मुख्य रस्त्यावर जितेंद्र भोसले याने लक्ष्मण माने यांच्या डोक्यात कशाने तरी जखम करून त्यांना ठार मारले.पंच कमिटीने न्यायनिवाड्याची प्रत केली सादरखुनासारख्या गंभीर घटनेचा न्यायनिवाडा चक्क गावात होतो, हे कायद्याला आव्हान देण्यासारखे होते. गुन्हा कबूल करून पंच कमिटी जो निर्णय देईल, तो संशयितांनी मान्य केला होता. या अजब न्यायनिवाड्याची प्रत सुरुवातीलाच ‘लोकमत’ने पोलीस अधीक्षकांकडे सादर केली होतीच; परंतु खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वत: पंच कमिटीच्या सदस्याने मूळ प्रत तपासी अधिकारी प्रदीपकुमार जाधव यांच्याकडे सादर केली. त्यामुळे आता तपासाला गती मिळणार आहे.तिघांचे जबाब पूर्णखून झाल्यानंतर लक्ष्मण माने यांच्यावर तातडीने अत्यंसंस्कार करण्यात आले असून, पुरावा शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिसांनी सध्या बाबूराव माने, रुक्मिणी माने, विनोद भोसले यांचे जबाब घेतले आहेत. पंच कमिटीतील तेरा जणांचे अद्यापही जबाब घेणे बाकी आहे. हे जबाब पूर्ण झाल्यानंतर या खून प्रकरणातील नेमकी माहिती समोर येणार आहे.काय आहे रेवंडी प्रकरण...महाविद्यालयात जाताना एका अल्पवयीन मुलीची तरुणाने छेड काढली होती. त्यानंतर हा प्रकार तिने आपल्या चुलत्याला सांगितला. संबंधित चुलत्याने मुलाला याचा जाब विचारून गावच्या पाराजवळ येऊन शिवीगाळ केली. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी पीडित मुलीचा चुलता रात्री साडेनऊच्या सुमारास ‘दरडी’ नामक भागात मृतावस्थेत आढळून आला होता.या प्रकारानंतर गावकºयांमध्ये खळबळ उडाली. एवढेच नव्हे तर घाईघाईत अत्यंविधीही उरकला गेला. या प्रकाराची माहिती बाहेर पडू नये म्हणून प्रचंड खबरदारी घेऊन तातडीची बैठकही बोलविली गेली. या बैठकीमध्ये दोन्ही कुटुंबांसह काही गावकरी होते. ‘माझ्या मुलीची छेड काढली म्हणून जाब विचारायला गेल्यामुळेच संबंधितांनी माझ्या भावाला मारहाण केली. हेच लोक त्याला जबाबदार आहेत,’ असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी या बैठकीत संबंधितांवर केला होता.या बैठकीमध्ये पंच कमिटी तयार करण्यात आली. या कमिटीने कागदावर अकरा जणांच्या सह्या घेतल्या. त्यामध्ये ‘आमच्यावर केलेला आरोप कबूल असून, या गोष्टीबद्दल ग्रामस्थ जो निर्णय ठरवतील, तो आम्हाला मान्य आहे,’ असे संबंधित संशयितांनी लिहून दिले. खुनासारखा गुन्हा होऊनही पंच कमिटी परस्पर शिक्षा देणारी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता.