शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

साताऱ्याचा पारा चाळीशीकडे सरकला, उकाड्यामुळे नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 14:25 IST

साताऱ्याच्या पाऱ्याने चाळीशीकडे वाटचाल सुरू केली असून, बुधवारी शहराचे कमाल तापमान ३९.२ तर किमान २०.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे.

ठळक मुद्दे साताऱ्याचा पारा चाळीशीकडे सरकला, उकाड्यामुळे नागरिक हैराणयंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद

सातारा : साताऱ्याच्या पाऱ्याने चाळीशीकडे वाटचाल सुरू केली असून, बुधवारी शहराचे कमाल तापमान ३९.२ तर किमान २०.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे.गेल्या पाच दिवसांपासून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख मार्ग व बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. नागरिक सूर्यास्तानंतरच खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत.ढगाळ वातावरण व जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळतो न मिळतो तोच बुधवारी पारा पुन्हा चाळीशीच्या उंबरठ्यावर येऊन स्थिरावला. बुधवारी हवामान विभागाच्या वतीने कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले असून, यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे. यापूर्वी सोमवार, दि. २५ मार्च रोजी पारा ३९.१ अंशांवर स्थिरावला होता. उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी विविध प्रकारचे गॉगल्स, टोप्या, सनकोटसह शीतपेयांना मागणी वाढली आहे.उष्माघात ठरू शकतो घातकउष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात होय. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी उन्हात फिरताना अथवा काम करताना योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

 

गेल्या पाच दिवसांतील तापमानदिनांक                तापमान                    कमाल    किमान२३ मार्च          ३७.८    १६.६२४ मार्च          ३८.६    १९.४२५ मार्च         ३९.१    २३.१२६ मार्च         ३८.७    २२.३२७ मार्च        ३९.२    २०.१अशी घ्याल स्वत:ची काळजी

  1. दररोज आठ ते सहा ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे.
  2. नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लिंबूपाणी घ्यावे.
  3. शक्यतो उन्हात बाहेर फिरणे टाळावे.
  4. फिरताना सोबत शक्यतो छत्री बाळगावी.
  5. ताजी फळे व फळभाज्यांचे अधिक सेवन करावे.
  6. मसालेदार, तेलकट व तिखट पदार्थ खाऊ नये.
  7. आहारात टरबूज, अननस, गाजर, काकडी यांचा समावेश असावा.
टॅग्स :TemperatureतापमानSatara areaसातारा परिसर