शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

साताऱ्याचा आदर्श जगाने घ्यावा! : योगगुरू रविशंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:14 IST

सातारा : ‘देशाचे आरोग्य जपायचे असेल तर गावा-गावांत सेंद्रिय शेतीची लागवड झाली पाहिजे. यासाठी साताºयाने पुढाकार घ्यावा अन् त्याचा आदर्श जगासमोर ठेवावा,

ठळक मुद्दे युवाचार्य संमेलनाला राज्यातील साधकांची उपस्थिती

सातारा : ‘देशाचे आरोग्य जपायचे असेल तर गावा-गावांत सेंद्रिय शेतीची लागवड झाली पाहिजे. यासाठी साताºयाने पुढाकार घ्यावा अन् त्याचा आदर्श जगासमोर ठेवावा, कारण येथे खूप तारे आहेत म्हणून या शहराचे नाव सातारा आहे,’ अशी भावनिक साद आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते योगगुरू रविशंकर यांनी दिली.

सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावरील संमेलनात बुधवारी सायंकाळी योग व उद्योग तसेच कौशल्य विकासातून राष्ट्राच्या निर्मितीबाबत युवा साधकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांनी सुरुवातीला सातारा जिल्ह्यातील जलयुक्त शिवार मोहिमेचे मनापासून कौतुक केले. अनेक सामाजिक उपक्रमांत साताºयाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. सेंद्रिय शेतीतही या जिल्ह्याने आपली खासियत दाखवावी, असेही आवाहन यावेळी केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘हुंडा देणार नाही अन् घेणारही नाही, अशी शपथ प्रत्येक युवक आणि युवतींनी घेतली पाहिजे. देशाच्या विकासासाठी शक्ती, भक्ती आणि युक्ती गरजेची आहे. राजकारण आणि जातीच्या नावाखाली गावागावांत संग्राम सुरू आहे. गाव पातळीवर निवडणुका झाल्या की राजकारणही संपले पाहिजे. सातारा शूरांचा जिल्हा आहे. इथल्या मातीत यश आहे. जलयुक्त शिवारात साताºयाने केलेले काम अवघ्या राज्यासाठी दिशादर्शक आहे. सेंद्रिय शेती आणि विषमुक्त अन्न या दोन बाबींसाठीही साताºयाने प्रयत्नशील राहावे.’

युवा योग अन् उद्योग याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘तरुणांनी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने देशाची उन्नती करावी. योग आयुष्य कुशलतेने जगण्याचं तंत्र सांगतं तर उद्योग जीवन सुखकर करतं. उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने देशाची उन्नती करण्याची संधी तरुणाईने घ्यावी. हिंसारहित समाज निर्माण करण्यासाठी या दोन्ही बाबी आवश्यक आहेत.’या कार्यक्रमात काहीजणांनी उत्स्फूर्तपणे विचारलेल्या प्रश्नांना गुरुजींनी यथोचित उत्तरे दिली. दरम्यान, रविशंकर यांना त्यांच्या अनुयायांनी माणदेशी घोंगडे, शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून दिली.अनुयायांच्या अश्रूंना वाट मोकळी...तांत्रिक अडचणींमुळे रविशंकर यांचे सकाळच्या सत्रातील काही कार्यक्रम रद्द करावे लागले. दुपारी चार वाजता त्यांचे कार्यक्रमस्थळी हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर सभामंडपात एकच उत्साह संचारला. ‘जय जय शिव शंभो’च्या जयघोषात त्यांचे मंचावर स्वागत करण्यात आले. साक्षात गुरुदेव यांना पाहण्याचा आनंद अनेकांनी अश्रूंकरवी व्यक्त केला. युवाचार्य संमेलन झाल्यानंतरही परस्परांना अलिंगन देऊन अनुयायांनी आनांदाश्रूंना वाट करून दिली. कार्यक्रमासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून साधक आले होते.