शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचा आदर्श जगाने घ्यावा! : योगगुरू रविशंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:14 IST

सातारा : ‘देशाचे आरोग्य जपायचे असेल तर गावा-गावांत सेंद्रिय शेतीची लागवड झाली पाहिजे. यासाठी साताºयाने पुढाकार घ्यावा अन् त्याचा आदर्श जगासमोर ठेवावा,

ठळक मुद्दे युवाचार्य संमेलनाला राज्यातील साधकांची उपस्थिती

सातारा : ‘देशाचे आरोग्य जपायचे असेल तर गावा-गावांत सेंद्रिय शेतीची लागवड झाली पाहिजे. यासाठी साताºयाने पुढाकार घ्यावा अन् त्याचा आदर्श जगासमोर ठेवावा, कारण येथे खूप तारे आहेत म्हणून या शहराचे नाव सातारा आहे,’ अशी भावनिक साद आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते योगगुरू रविशंकर यांनी दिली.

सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावरील संमेलनात बुधवारी सायंकाळी योग व उद्योग तसेच कौशल्य विकासातून राष्ट्राच्या निर्मितीबाबत युवा साधकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांनी सुरुवातीला सातारा जिल्ह्यातील जलयुक्त शिवार मोहिमेचे मनापासून कौतुक केले. अनेक सामाजिक उपक्रमांत साताºयाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. सेंद्रिय शेतीतही या जिल्ह्याने आपली खासियत दाखवावी, असेही आवाहन यावेळी केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘हुंडा देणार नाही अन् घेणारही नाही, अशी शपथ प्रत्येक युवक आणि युवतींनी घेतली पाहिजे. देशाच्या विकासासाठी शक्ती, भक्ती आणि युक्ती गरजेची आहे. राजकारण आणि जातीच्या नावाखाली गावागावांत संग्राम सुरू आहे. गाव पातळीवर निवडणुका झाल्या की राजकारणही संपले पाहिजे. सातारा शूरांचा जिल्हा आहे. इथल्या मातीत यश आहे. जलयुक्त शिवारात साताºयाने केलेले काम अवघ्या राज्यासाठी दिशादर्शक आहे. सेंद्रिय शेती आणि विषमुक्त अन्न या दोन बाबींसाठीही साताºयाने प्रयत्नशील राहावे.’

युवा योग अन् उद्योग याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘तरुणांनी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने देशाची उन्नती करावी. योग आयुष्य कुशलतेने जगण्याचं तंत्र सांगतं तर उद्योग जीवन सुखकर करतं. उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने देशाची उन्नती करण्याची संधी तरुणाईने घ्यावी. हिंसारहित समाज निर्माण करण्यासाठी या दोन्ही बाबी आवश्यक आहेत.’या कार्यक्रमात काहीजणांनी उत्स्फूर्तपणे विचारलेल्या प्रश्नांना गुरुजींनी यथोचित उत्तरे दिली. दरम्यान, रविशंकर यांना त्यांच्या अनुयायांनी माणदेशी घोंगडे, शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून दिली.अनुयायांच्या अश्रूंना वाट मोकळी...तांत्रिक अडचणींमुळे रविशंकर यांचे सकाळच्या सत्रातील काही कार्यक्रम रद्द करावे लागले. दुपारी चार वाजता त्यांचे कार्यक्रमस्थळी हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर सभामंडपात एकच उत्साह संचारला. ‘जय जय शिव शंभो’च्या जयघोषात त्यांचे मंचावर स्वागत करण्यात आले. साक्षात गुरुदेव यांना पाहण्याचा आनंद अनेकांनी अश्रूंकरवी व्यक्त केला. युवाचार्य संमेलन झाल्यानंतरही परस्परांना अलिंगन देऊन अनुयायांनी आनांदाश्रूंना वाट करून दिली. कार्यक्रमासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून साधक आले होते.