शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

कुलगुरु पदासाठी सातारचा चौकार!

By admin | Updated: February 27, 2015 00:50 IST

फुलेंचा शैक्षणिक वारसा : शिवाजी, पुणे, मराठवाडा अन् भारती विद्यापीठात उमटविला ठसा

सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिराव फुले अन् सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाच्या माध्यमातून साताऱ्याचे नाव जगभर पोहोचविले आहे. या मार्गावरून सातारा जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. चार विद्यापीठांमधील कुलगुरुपद भूषविण्याची कामगिरी सातारा जिल्ह्यातील चौघांनी केली आहे. शिवाजीराव भोसले, देवदत्त दाभोलकर, उत्तमराव भोईटे अन् अशोक भोईटे यांनी नवनवीन प्रयोग केले आहे.रयत शिक्षण संस्था काढून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा पोहोचविली. या संस्थेचे मुख्यालय सातारा शहरात आहे. स्त्री शिकली तर कुुटुंब शिकतं अन् घरादाराची प्रगती होते. हा विचार घेऊन कटगुण येथील जोतिबा फुले यांनी सर्वात प्रथम पत्नी सावित्रीबार्इंना शिक्षणाचे धडे देऊन महिलांसाठी शाळा सुरू केली. त्यामुळे ‘सावित्रीच्या लेकी’ आज विविध क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करत आहेत. या थोर व्यक्तींच्या कार्यामुळे सातारकरांचा उर भरून येतो. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील चौघांनी विविध विद्यापीठांत कुलगुरुपदी कार्य केल्याने सातारकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील डॉ. अशोक भोईटे यांची बुधवारी शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी २०१२ ते २०१५ या कालावधीत शिवाजी विद्यापीठात प्र. कुलगुरुपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली होती. तत्पूर्वी सातारा येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी असताना त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी नियुक्ती झाली होती.सातारा येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ. देवदत्त दाभोलकर यांनी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची धुरा १९७५ ते ७८ या कालावधीत सांभाळली. आणीबाणीच्या काळात त्यांनी केलेले कार्य उल्लेखणीय होते. फलटण तालुक्याने यामध्ये बाजी मारली आहे. फलटण तालुक्याने राज्याला दोन कुलगुरू दिले आहेत. मूळचे खटाव तालुक्यातील असलेले; पण फलटणमध्ये स्थायिक झालेले ज्यांनी अमोघ वाणीने अख्ख्या महाराष्ट्रावर अधिराज्य गाजविले असे दिवंगत प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी १९८८ ते ९१ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी सांभाळली होती. तर याच तालुक्यातील अरडगाव येथील डॉ. उत्तमराव भोईटे यांना १९९५ ते १९९६ या कालावधीत भारती विद्यापीठात कुलगुरुपदी काम करण्याची संधी मिळाले. (प्रतिनिधी)