शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरु पदासाठी सातारचा चौकार!

By admin | Updated: February 27, 2015 00:50 IST

फुलेंचा शैक्षणिक वारसा : शिवाजी, पुणे, मराठवाडा अन् भारती विद्यापीठात उमटविला ठसा

सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिराव फुले अन् सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाच्या माध्यमातून साताऱ्याचे नाव जगभर पोहोचविले आहे. या मार्गावरून सातारा जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. चार विद्यापीठांमधील कुलगुरुपद भूषविण्याची कामगिरी सातारा जिल्ह्यातील चौघांनी केली आहे. शिवाजीराव भोसले, देवदत्त दाभोलकर, उत्तमराव भोईटे अन् अशोक भोईटे यांनी नवनवीन प्रयोग केले आहे.रयत शिक्षण संस्था काढून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा पोहोचविली. या संस्थेचे मुख्यालय सातारा शहरात आहे. स्त्री शिकली तर कुुटुंब शिकतं अन् घरादाराची प्रगती होते. हा विचार घेऊन कटगुण येथील जोतिबा फुले यांनी सर्वात प्रथम पत्नी सावित्रीबार्इंना शिक्षणाचे धडे देऊन महिलांसाठी शाळा सुरू केली. त्यामुळे ‘सावित्रीच्या लेकी’ आज विविध क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करत आहेत. या थोर व्यक्तींच्या कार्यामुळे सातारकरांचा उर भरून येतो. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील चौघांनी विविध विद्यापीठांत कुलगुरुपदी कार्य केल्याने सातारकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील डॉ. अशोक भोईटे यांची बुधवारी शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी २०१२ ते २०१५ या कालावधीत शिवाजी विद्यापीठात प्र. कुलगुरुपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली होती. तत्पूर्वी सातारा येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी असताना त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी नियुक्ती झाली होती.सातारा येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ. देवदत्त दाभोलकर यांनी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची धुरा १९७५ ते ७८ या कालावधीत सांभाळली. आणीबाणीच्या काळात त्यांनी केलेले कार्य उल्लेखणीय होते. फलटण तालुक्याने यामध्ये बाजी मारली आहे. फलटण तालुक्याने राज्याला दोन कुलगुरू दिले आहेत. मूळचे खटाव तालुक्यातील असलेले; पण फलटणमध्ये स्थायिक झालेले ज्यांनी अमोघ वाणीने अख्ख्या महाराष्ट्रावर अधिराज्य गाजविले असे दिवंगत प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी १९८८ ते ९१ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी सांभाळली होती. तर याच तालुक्यातील अरडगाव येथील डॉ. उत्तमराव भोईटे यांना १९९५ ते १९९६ या कालावधीत भारती विद्यापीठात कुलगुरुपदी काम करण्याची संधी मिळाले. (प्रतिनिधी)