शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अजिंक्यतारा किल्ल्यासाठी सरसावले सातारकर

By admin | Updated: July 5, 2016 00:32 IST

सुचविल्या असंख्य सुधारणा : शिवसृष्टी प्रतिष्ठानकडून स्वागत

सातारा : साताऱ्याची अस्मिता असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठानने पाऊल उचलले आहे. या मोहिमेत सातारकर स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत आहेत. यासाठी अनेक सूचना त्यांच्याकडून येत असून, या सूचनांचे किल्ले अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठानने स्वागत केले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मनात स्वातंत्र्याची महात्त्वाकांक्षा निर्माण केली आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हाच शिवशक्तीचा ऐतिहासिक वारसा आपल्या शाहूनगरीला लाभला आहे. सर्व भरत खंडाची राज्यसूत्रे अजिंक्यताराच्या, सातारच्या तक्तावरून २३ मे १६९८ ते १ सप्टेंबर १८४८ पर्यंत चालत होती. हे ऐतिहासिक वैभव प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या आणि हिंदवी स्वराज्याची साक्ष देत असलेला अजिंक्यतारा किल्ल्याचा इतिहास नव्या पिढीला समाजावा, यासाठी किल्ले अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठानने किल्ल्याचे वैभव जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत सातारकरांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. ‘अजिंक्यतारा व्हावा ऐसा सुंदर...’ या मोहिमेत सातारकर सहभागी होऊ लागले आहेत. अजिंक्यताऱ्याच्या संवर्धनात अपेक्षित बदल, त्यांच्या कल्पना सांगण्यासाठी ते पुढे येत असून, अनेकांनी काही सूचनाही केल्या आहेत. या सूचनांचे स्थापन करण्यात आलेल्या प्रतिष्ठानने स्वागत केले आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या अनुभवाचा, कल्पनांचा फायदा किल्ल्यांच्या संवर्धन प्रक्रियेत होणार आहे. (प्रतिनिधी)अजिंक्यातारा किल्ल्याचे जतन करताना जुन्या भिंती न पाडता पुरातत्व विभागाच्या पद्धतीने संवर्धन करणे गरजेचे आहे. किल्ल्यावरील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची आवश्यकता नसून त्याठिकाणी दगडीच रस्ते करावेत. त्यासाठी ऐतिहासिक वास्तूला धक्का लावण्याची गरज नाही.- प. ना. पोतदार, निवृत्त उपअभिरक्षक, पुरातत्व विभागअजिंक्यातारा हे ऐतिहासिक वैभव प्रेरणादायी आहे. हा इतिहास अंत:करणात उभा राहावा, यासाठी ऐतिहासिक पूर्व वैभवाची स्मृती जिती, जागती, तेवती राहावी, यासाठी अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठान सतत कार्यरत राहणार आहे.- प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण,सदस्य, सातारा जिल्हा हेरिटेज समिती