शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अजिंक्यतारा किल्ल्यासाठी सरसावले सातारकर

By admin | Updated: July 5, 2016 00:32 IST

सुचविल्या असंख्य सुधारणा : शिवसृष्टी प्रतिष्ठानकडून स्वागत

सातारा : साताऱ्याची अस्मिता असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठानने पाऊल उचलले आहे. या मोहिमेत सातारकर स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत आहेत. यासाठी अनेक सूचना त्यांच्याकडून येत असून, या सूचनांचे किल्ले अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठानने स्वागत केले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मनात स्वातंत्र्याची महात्त्वाकांक्षा निर्माण केली आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हाच शिवशक्तीचा ऐतिहासिक वारसा आपल्या शाहूनगरीला लाभला आहे. सर्व भरत खंडाची राज्यसूत्रे अजिंक्यताराच्या, सातारच्या तक्तावरून २३ मे १६९८ ते १ सप्टेंबर १८४८ पर्यंत चालत होती. हे ऐतिहासिक वैभव प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या आणि हिंदवी स्वराज्याची साक्ष देत असलेला अजिंक्यतारा किल्ल्याचा इतिहास नव्या पिढीला समाजावा, यासाठी किल्ले अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठानने किल्ल्याचे वैभव जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत सातारकरांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. ‘अजिंक्यतारा व्हावा ऐसा सुंदर...’ या मोहिमेत सातारकर सहभागी होऊ लागले आहेत. अजिंक्यताऱ्याच्या संवर्धनात अपेक्षित बदल, त्यांच्या कल्पना सांगण्यासाठी ते पुढे येत असून, अनेकांनी काही सूचनाही केल्या आहेत. या सूचनांचे स्थापन करण्यात आलेल्या प्रतिष्ठानने स्वागत केले आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या अनुभवाचा, कल्पनांचा फायदा किल्ल्यांच्या संवर्धन प्रक्रियेत होणार आहे. (प्रतिनिधी)अजिंक्यातारा किल्ल्याचे जतन करताना जुन्या भिंती न पाडता पुरातत्व विभागाच्या पद्धतीने संवर्धन करणे गरजेचे आहे. किल्ल्यावरील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची आवश्यकता नसून त्याठिकाणी दगडीच रस्ते करावेत. त्यासाठी ऐतिहासिक वास्तूला धक्का लावण्याची गरज नाही.- प. ना. पोतदार, निवृत्त उपअभिरक्षक, पुरातत्व विभागअजिंक्यातारा हे ऐतिहासिक वैभव प्रेरणादायी आहे. हा इतिहास अंत:करणात उभा राहावा, यासाठी ऐतिहासिक पूर्व वैभवाची स्मृती जिती, जागती, तेवती राहावी, यासाठी अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठान सतत कार्यरत राहणार आहे.- प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण,सदस्य, सातारा जिल्हा हेरिटेज समिती