शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

सातारकर म्हणे... ‘लिफ्ट’ नको, चालतच जाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:47 IST

जगदीश कोष्टी। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बहुतांश शासकीय कार्यालये, रुग्णालयांमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ज्येष्ठ ...

जगदीश कोष्टी।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : बहुतांश शासकीय कार्यालये, रुग्णालयांमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, विकलांग मंडळींनाही विनासायास एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाता येऊ लागले; पण व्यवस्थित निगा राखली जात नसल्याने मध्येच अडकून राहणे, अचानक खाली कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ‘लिफ्ट नको’ म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे.सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषदेमधील लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने मध्येच थांबणे, त्यामध्ये नागरिक अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी एका खासगी रुग्णालयामध्ये तर कहरच झाला. लिफ्टचे नियंत्रण सुटल्याने ती खाली कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. यामुळे लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.वाढती लोकसंख्या अन् शहरीकरणामुळे साताºयात बहुमजली इमारतींचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या नियमावलीनुसार तीनहून अधिक मजल्यांच्या इमारतींमध्ये लिफ्टची सक्ती केली आहे. बांधकाम व्यावसायिकही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिल्या जाणाºया सुविधांमध्ये लिफ्ट दाखवितात.बांधकाम करत असतानाच जिन्याच्या शेजारीच लिफ्टसाठी डक ठेवला जातो. त्यामुळे आज ना उद्या लिफ्ट येईल, याचा विचार करून अनेक ठिकाणी फ्लॅटची विक्री होते; पण कित्येक वर्षे लिफ्ट बसत नाही. अशा रिकाम्या जागेतून लहान मुले पडण्याचा धोका सर्वाधिकअसतो.विशेष म्हणजे, लिफ्टची जबाबदारी दिलेल्या कंपनीचे कर्मचारीही याबाबत बिनधास्त असल्याचे पाहायला मिळतात. फ्लॅटधारकांशी वाद घालतील; पण अपघात घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्याबाबत उदासिनता दाखवितात.शासकीय कार्यालये, दवाखान्यांमध्ये लिफ्ट चालविण्यासाठी कर्मचारीअसतो. त्यांना योग्य ते प्रशिक्षण असल्यामुळे लिफ्ट अडकलीच तर आतील नागरिकांना ते धीर देऊशकतात. योग्य त्या ठिकाणी निरोप देऊन मदत मागावू शकतात; पण खासगी इमारतीत अशा घटना खडल्यास महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांमध्ये भीतीचेवातावरण निर्माण होते. त्यामुळे लिफ्ट नको रे बाबा... चालत गेलेलं बरं म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे. लिफ्टच्या देखभालीसाठी एखाद्या कंपनीला करार केला जातो. कामाचा करार होईपर्यंत सर्वचजण गोडगोड बोलतात पण त्यानंतर कोणीही फिरत नसल्याचा अनुभव अनेकदा येत असतो.अत्याधुनिक उपकरणांचा अभावअनेक ठिकाणी केवळ लिफ्ट असते; परंतु बॅटरी बॅकअप नसल्याने वीज गेल्याबरोबरच त्या जागेवर थांबतात. तसेच एखाद्याकडून दरवाजा सुरू राहिलाच तर सूचना करणारी यंत्रणा असते; पण ती बसवलेलीच नसते. एखाद्या मजल्यावर लिफ्ट अर्धवट उघडी असल्यास ती खाली किंवा वर जात नाही. अत्याधुनिक यंत्रणाच नसल्याने वापरण्यात अडथळे येतात.