शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कडक लॉकडाऊनच्या भीतीमुळे सातारकर रस्त्यावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:36 IST

सातारा : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य शासन कडक लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता असल्याने सातारकर मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर ...

सातारा : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य शासन कडक लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता असल्याने सातारकर मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. यामुळे भाजी मंडई, तसेच किराणा दुकानातही गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचेच दिसून येत आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळपर्यंत दुकानात खरेदीसाठी गर्दी होती.

मागील एक वर्षापासून कोरोना महामारीचे संकट आहे. पहिल्या लाटेत जवळपास सहा महिने लॉकडाऊन होते. तेव्हा कुठे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाले. कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर सर्वांनाच दिलासा मिळाला. त्यानंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केल्यानंतर पूर्वीप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले, तर नागरिकांनाही कोरोनाचे सोयरसुतक वाटले नाही. सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमही पायदळी तुडविले गेले. त्यातूनच आताची परिस्थिती उद्भवली आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही बाधित मोठ्या संख्येने सापडू लागले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने मागील आठवड्यापासून काही निर्बंध घातले; पण कोरोना रुग्ण काही केल्या कमी होईनात. त्यामुळे कडक लॉकडाऊनचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत. यामुळे कदाचित येत्या एक-दोन दिवसांत लॉकडाऊन जाहीर होईल. यामुळे सातारकर खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले आहेत.

जिल्ह्यात शनिवार आणि रविवारच्या वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला; पण सोमवारी सातारकर, तसेच जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. विशेष करून किराणा दुकान आणि मंडईत भाज्या खरेदीसाठी गर्दी दिसून आली. सातारा शहरात तर सकाळी १० वाजल्यापासून नागरिक रस्त्यावर आले होते. वाहनेही मोठ्या संख्येने रस्त्यावर होती. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबल्याचे चित्र दिसून आले. शहरातील राजवाडा येथील भाजी मंडईत तर खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती. असेच चित्र किराणा दुकानात दिसून आले. रात्री उशिरापर्यंत गर्दी होती.

मंगळवारीही सातारकर खरेदीसाठी बाहेर पडले. कदाचित दोन दिवसांत लॉकडाऊन जाहीर झाले तर अडचण नको म्हणून अनेकांनी किराणा दुकानातून महिनाभर पुरेल एवढे साहित्य खरेदी केले, तर काहींनी पुढे समस्या नको म्हणून मेडिकलमधून आगाऊ औषधी घेतली. एकंदरीतच कडक लॉकडाऊनच्या भीतीमुळे सातारकर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत; पण सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही, हेही यानिमित्ताने दिसून येत आहे.

चौकट :

पावसातही खरेदीसाठी नागरिक थांबून...

सातारा शहरात मंगळवारी पावणे पाचच्या सुमारास वळवाचा पाऊस सुरू झाला. तरीही नागरिक दुकान, तसेच निवारा असेल तेथे थांबून होते. पावसाची उघडीप होताच पुन्हा दुकानात खरेदीसाठी गेले.

कोट :

कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य शासन कडक निर्बंध लावण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत लॉकडाऊनचे चित्र स्पष्ट होईल, असे वाटते. त्यामुळे काही दिवस तरी घराबाहेर पडता येणार नाही. यासाठी महिनाभर पुरेल एवढे किराणा सामान, तसेच गरजेच्या वस्तूही खरेदी केल्या आहेत.

- रामचंद्र पवार, नागरिक

फोटो दि.१३सातारा गर्दी...

फोटो ओळ : सातारा शहरात नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर वाहतूक ठप्प होण्याचा प्रकारही घडत आहे. (छाया : नितीन काळेल)

.....................................................