शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

सातारचं पालकमंत्रिपद पुन्हा परजिल्ह्याला!

By admin | Updated: November 12, 2014 22:51 IST

‘पाटण’चा विषय संपला : आता लक्ष ‘माण’कडे

सातारा : शेवटच्या टप्प्यापर्यंत शिवसेना आणि भाजपचे जुळून न आल्याने दोघांच्याही दिशा आता वेगळ्या झाल्या आहेत. त्यामुळे सेनेमुळे शंभूराज देसाई यांना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती ती फोलच ठरली आहे. दरम्यान, भाजपच्या साथीला गेलेले ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देऊन पालकमंत्रिपद देतील, अशी आशा सातारकरांना आहे. नाहीतर पुन्हा एकदा पालकमंत्रिपद परजिल्ह्यात जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री असतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखेखाली जिल्ह्याचे सर्व निर्णय होत असतात. त्यामुळे पालकमंत्रिपदाला मोठे महत्त्व असते. मागील २० वर्षांचा विचार करता जिल्ह्यातील फक्त दोघांनाच पालकमंत्रिपदाचा मान मिळाला आहे. बाकीचे तीन पालकमंत्री बाहेरील जिल्ह्यातीलच होते. १९९५ ला शिवसेना-भाजप युतीची सत्ता राज्यात आली. त्यावेळी या नव्या सरकारला काही अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे आमदार हर्षवर्धन पाटील यांचाही समावेश होता. त्यावेळी पाटील यांना सातारचे पालकमंत्रिपद दिले होते. ते जवळपास साडेचार वर्षे पालकमंत्रिपदावर होते. त्यानंतर १९९९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेवर आले. त्यावेळी अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रिपद आले. २००४ च्या निवडणुकीत पुन्हा आघाडी शासनाची सत्ता आली व सातारच्या पालकमंत्रिपदाची धुरा तत्कालीन ऊर्जामंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. साधारणपणे दीड ते दोन वर्षांचा कार्यकाळ वळसे-पाटील यांना मिळाला. त्यानंतर जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे पालकमंत्रिपद आले. म्हणजे १९९५ ते २००५ पर्यंत इतर जिल्ह्यातील मंत्र्यांनी सातारचे पालकमंत्रिपद भूषविले. १० वर्षांनंतर हे पद जिल्ह्याकडे आले. २००९ मध्ये विधानसभ निवडणुकीनंतरही सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रामराजेंकडेच ठेवण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०१३च्या मध्यावर पक्षात फेरबदल केला. त्यामुळे १९९५ पासून मंत्री असणाऱ्या रामराजेंचे पालकमंत्रिपद गेले. त्यांची नियुक्ती राज्य नियोजन मंडळाच्या कार्याध्यक्षपदावर करण्यात आली. रामराजेंनंतर कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना एक वर्षाहून अधिक काळ मिळाला.आता राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे सातारचे पालकमंत्री होणार कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचा एकही आमदार जिल्ह्यात नाही. त्यातच सेनेबरोबर भाजपची युती झाली असती तर कदाचित पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या रूपाने जिल्ह्यात पालकमंत्रिपद मिळाले असते पण ती शक्यता आता पूर्ण मावळली आहे. आता राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्याकडेच लक्ष लागले आहे. ‘रासप’ भाजपबरोबर आहे. त्यामुळे जानकर यांना मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद देण्याची चर्चा सुरू आहे. जानकरांना मंत्रिपद मिळाले तर त्यांच्याकडे पालकमंत्रिपदाची धुरा येऊ शकते. जानकर हे माण तालुक्यातील पळसावडे येथील आहेत. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यात पालकमंत्रिपद राहू शकते. जानकर यांची मंत्रिपदी वर्णी न लागल्यास सुमारे नऊ वर्षांनंतर पुन्हा पालकमंत्रिपद दुसऱ्या जिल्ह्याकडे जाणार आहे. (प्रतिनिधी)तिघेही पुणे जिल्ह्यातील...१९९५ पासून सातारा जिल्ह्याला प्रथम तीन पालकमंत्री लाभले. ते तिघेही पुणे जिल्ह्यातील होते. युती शासनाच्या काळात इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, बारामतीचे अजित पवार आणि आंबेगावचे दिलीप वळसे-पाटील. यंदाही हा मान कोल्हापूर किंवा पुणे जिल्ह्यातील एखाद्या मंत्र्याकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.