शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सातारा : येरळा नदी पात्रातच कचऱ्यांचे ढीग, वडूजमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 14:07 IST

वडूजनगरीचा विस्तार होत असताना कचरा निर्मूलन करताना नगरपंचायतीला अनंत अडचणी येत आहेत. हे वास्तव येरळा नदीच्या पात्रातील घाणीचे ढीग पाहिल्यानंतर स्पष्ट दिसून येते. याबाबत प्रशासन गंभीर असले तरी आजअखेर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देयेरळा नदी पात्रातच कचऱ्यांचे ढीग, वडूजमध्ये संताप प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता

वडूज : वडूजनगरीचा विस्तार होत असताना कचरा निर्मूलन करताना नगरपंचायतीला अनंत अडचणी येत आहेत. हे वास्तव येरळा नदीच्या पात्रातील घाणीचे ढीग पाहिल्यानंतर स्पष्ट दिसून येते. याबाबत प्रशासन गंभीर असले तरी आजअखेर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जलद गतीने वाढत असलेल्या वडूज नगरीतील बसस्थानक परिसर, वाकेश्वर रस्ता आणि नव्याने व झपाट्याने वाढत असलेल्या पेडगाव रस्त्यालगत होणारे टुमदार बंगले या भागातील सांडपाणी व अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर समस्यांनी जखडलेला आहे. तर सांडपाणी मोकळ्या जागेत सोडून परिसरात घाणीचे साम्राज्य होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.वडूजनगरीची विराटनगरी होताना कोणताही नियोजन आराखडा तयार नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घंटागाडी वेळेवर येत असतानाही टाकाऊ कचरा काही प्रमाणांत येरळा नदीच्या पात्रात पडत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचºयाचे ढीग दिसून येत आहेत.तालुक्याचे मुख्यालय असल्याने वडूजनगरीत दाट लोकवस्तीचे प्रमाण वाढत आहे. गावठाणात समावेश असलेल्या भागात गटार व्यवस्था आणि अंतर्गत रस्ते असल्याने काही प्रमाणात सुस्थिती आहे.

मात्र, सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संकुल व दवाखाने असल्यामुळे या नगरीलगत असणारे पेडगाव, वाकेश्वर, सातेवाडी, गणेशवाडी आणि सिद्धेश्वर कुरोली रस्त्यावरील भागात दाट लोकवस्ती होत आहे.

रिकाम्या जागेतील सांडपाण्याची डबकी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत. तर मोकळ्या जागेतून सोयीनुसार रस्ते काढल्याने काहीवेळा वादाचे प्रसंग उद्भवलेले पाहावयास मिळतात. विराटनगरीचा विस्तार झपाट्याने होत असलातरी हे सांडपाणी व स्वंयघोषित रस्ते पुढील पिढीस घातक ठरणार, यात तीळमात्र शंका नाही.मुख्य गावठाणातील सांडपाणी येरळा नदीतच येत असल्याने पात्रात साचणारे पाणी दूषित होऊन आरोग्यास घातक ठरत आहे. तेच पाणी येरळा तलावात जात असल्याने पिण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान