शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : येरळा नदी पात्रातच कचऱ्यांचे ढीग, वडूजमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 14:07 IST

वडूजनगरीचा विस्तार होत असताना कचरा निर्मूलन करताना नगरपंचायतीला अनंत अडचणी येत आहेत. हे वास्तव येरळा नदीच्या पात्रातील घाणीचे ढीग पाहिल्यानंतर स्पष्ट दिसून येते. याबाबत प्रशासन गंभीर असले तरी आजअखेर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देयेरळा नदी पात्रातच कचऱ्यांचे ढीग, वडूजमध्ये संताप प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता

वडूज : वडूजनगरीचा विस्तार होत असताना कचरा निर्मूलन करताना नगरपंचायतीला अनंत अडचणी येत आहेत. हे वास्तव येरळा नदीच्या पात्रातील घाणीचे ढीग पाहिल्यानंतर स्पष्ट दिसून येते. याबाबत प्रशासन गंभीर असले तरी आजअखेर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जलद गतीने वाढत असलेल्या वडूज नगरीतील बसस्थानक परिसर, वाकेश्वर रस्ता आणि नव्याने व झपाट्याने वाढत असलेल्या पेडगाव रस्त्यालगत होणारे टुमदार बंगले या भागातील सांडपाणी व अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर समस्यांनी जखडलेला आहे. तर सांडपाणी मोकळ्या जागेत सोडून परिसरात घाणीचे साम्राज्य होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.वडूजनगरीची विराटनगरी होताना कोणताही नियोजन आराखडा तयार नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घंटागाडी वेळेवर येत असतानाही टाकाऊ कचरा काही प्रमाणांत येरळा नदीच्या पात्रात पडत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचºयाचे ढीग दिसून येत आहेत.तालुक्याचे मुख्यालय असल्याने वडूजनगरीत दाट लोकवस्तीचे प्रमाण वाढत आहे. गावठाणात समावेश असलेल्या भागात गटार व्यवस्था आणि अंतर्गत रस्ते असल्याने काही प्रमाणात सुस्थिती आहे.

मात्र, सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संकुल व दवाखाने असल्यामुळे या नगरीलगत असणारे पेडगाव, वाकेश्वर, सातेवाडी, गणेशवाडी आणि सिद्धेश्वर कुरोली रस्त्यावरील भागात दाट लोकवस्ती होत आहे.

रिकाम्या जागेतील सांडपाण्याची डबकी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत. तर मोकळ्या जागेतून सोयीनुसार रस्ते काढल्याने काहीवेळा वादाचे प्रसंग उद्भवलेले पाहावयास मिळतात. विराटनगरीचा विस्तार झपाट्याने होत असलातरी हे सांडपाणी व स्वंयघोषित रस्ते पुढील पिढीस घातक ठरणार, यात तीळमात्र शंका नाही.मुख्य गावठाणातील सांडपाणी येरळा नदीतच येत असल्याने पात्रात साचणारे पाणी दूषित होऊन आरोग्यास घातक ठरत आहे. तेच पाणी येरळा तलावात जात असल्याने पिण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान