शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

सातारा : येरळा नदी पात्रातच कचऱ्यांचे ढीग, वडूजमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 14:07 IST

वडूजनगरीचा विस्तार होत असताना कचरा निर्मूलन करताना नगरपंचायतीला अनंत अडचणी येत आहेत. हे वास्तव येरळा नदीच्या पात्रातील घाणीचे ढीग पाहिल्यानंतर स्पष्ट दिसून येते. याबाबत प्रशासन गंभीर असले तरी आजअखेर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देयेरळा नदी पात्रातच कचऱ्यांचे ढीग, वडूजमध्ये संताप प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता

वडूज : वडूजनगरीचा विस्तार होत असताना कचरा निर्मूलन करताना नगरपंचायतीला अनंत अडचणी येत आहेत. हे वास्तव येरळा नदीच्या पात्रातील घाणीचे ढीग पाहिल्यानंतर स्पष्ट दिसून येते. याबाबत प्रशासन गंभीर असले तरी आजअखेर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जलद गतीने वाढत असलेल्या वडूज नगरीतील बसस्थानक परिसर, वाकेश्वर रस्ता आणि नव्याने व झपाट्याने वाढत असलेल्या पेडगाव रस्त्यालगत होणारे टुमदार बंगले या भागातील सांडपाणी व अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर समस्यांनी जखडलेला आहे. तर सांडपाणी मोकळ्या जागेत सोडून परिसरात घाणीचे साम्राज्य होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.वडूजनगरीची विराटनगरी होताना कोणताही नियोजन आराखडा तयार नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घंटागाडी वेळेवर येत असतानाही टाकाऊ कचरा काही प्रमाणांत येरळा नदीच्या पात्रात पडत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचºयाचे ढीग दिसून येत आहेत.तालुक्याचे मुख्यालय असल्याने वडूजनगरीत दाट लोकवस्तीचे प्रमाण वाढत आहे. गावठाणात समावेश असलेल्या भागात गटार व्यवस्था आणि अंतर्गत रस्ते असल्याने काही प्रमाणात सुस्थिती आहे.

मात्र, सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संकुल व दवाखाने असल्यामुळे या नगरीलगत असणारे पेडगाव, वाकेश्वर, सातेवाडी, गणेशवाडी आणि सिद्धेश्वर कुरोली रस्त्यावरील भागात दाट लोकवस्ती होत आहे.

रिकाम्या जागेतील सांडपाण्याची डबकी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत. तर मोकळ्या जागेतून सोयीनुसार रस्ते काढल्याने काहीवेळा वादाचे प्रसंग उद्भवलेले पाहावयास मिळतात. विराटनगरीचा विस्तार झपाट्याने होत असलातरी हे सांडपाणी व स्वंयघोषित रस्ते पुढील पिढीस घातक ठरणार, यात तीळमात्र शंका नाही.मुख्य गावठाणातील सांडपाणी येरळा नदीतच येत असल्याने पात्रात साचणारे पाणी दूषित होऊन आरोग्यास घातक ठरत आहे. तेच पाणी येरळा तलावात जात असल्याने पिण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान