शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

सातारा : वीज जाताच काळजात होते धस्स...! शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 13:42 IST

वीज वितरण कंपनीने वर्ये फिडरवर रोज साडेचार तासांचे अघोषित भारनियम सुरु केले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात परिक्षेचा काळ असतानाही वीज बंद केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शेतातील उभी पिकेही करपू लागली असून वीज जाताच लोकांच्या काळजात धस्स होत आहे.

ठळक मुद्देवीज जाताच काळजात होते धस्स...! शेतकरी चिंताग्रस्त वर्ये, धावडशी परिसरात अघोषित भारनियमन

सातारा : वीज वितरण कंपनीने वर्ये फिडरवर रोज साडेचार तासांचे अघोषित भारनियमन सुरु केले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात परिक्षेचा काळ असतानाही वीज बंद केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शेतातील उभी पिकेही करपू लागली असून वीज जाताच लोकांच्या काळजात धस्स होत आहे.जिल्ह्यात कुठेही भारनियमन घोषित केलेले नाही. तरी देखील काही भागांत जाणीवपूर्वक वीज घालविण्याचे प्रकार होत आहेत. ह्यवर्ये फिडरची वीज गळती जास्त आहे, असे कारण पुढे करुन भारनियमनचा आसूड ओढला जात आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून रामनगर, वर्ये, पानमळेवाडी, सैदापूर, कोंडवे, नेले, किडगाव, धावडशी, पिंंपळवाडी, म्हसवे या गावांत रोज सकाळी ८ ते दुपारी २.३0 असे साडेचार तासांचे भारनियमन सुरु आहे.

या परिसरात शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. वेण्णा नदी याच परिसरातून वाहत असल्याने शेतीमध्ये बागायती पिके तसेच ऊसाची लागणही मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे. या पिकांना पाणी लागते. पाण्याविना पिके करपू लागली आहेत. भारनियमनामुळे पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे.दरम्यान, उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने उकाड्यापासून बचावासाठी पंखे, एअर कुलरचा वापर केला जातो, यासाठी वीज लागते. मात्र वीजच नसल्याने ही यंत्रणा बंद पडून लोकांचे हाल होताना दिसत आहेत.

मुलांच्या परीक्षेचा कालावधी सुरु आहे, त्यातच या परिसरातील बहुतांश गावांच्या यात्रा सध्या सुरु असल्याने वीज महत्त्वाची ठरते. मात्र याचा विचार भारनियमन करताना केलेला दिसत नाही. हॉटेल व्यावसायिकांचे फ्रिज बंद राहत असल्याने पाणी, कोल्ड्रिंक्स थंड ठेवण्यासाठी व्यावसायिक बर्फाच्या लाद्या विकत आणताना दिसत आहेत.वेळेत बिले भरणाºयांवरही अन्यायवर्ये फिडरच्या माध्यमातून ज्यांना वीज मिळते, त्यापैकी बहुतांश ग्राहक हे वेळेत वीज बिल भरतात, मग वीज गळतीचे पाप त्यांच्या माथी मारण्याचे कारस्थान का खेळले जात आहे?, तसेच इथली वीज वाचवून दुसरीकडे तिचा वापर केला जात आहे का?, असे प्रश्न वीज ग्राहकांना पडले आहेत.

एका विहिरीवरुन वार लावून पाणी घ्यावे लागते. साहजिकच अनेक शेतकरी एकाच विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असतात. रोज साडेचार तास सक्तीने वीज जात असल्याने पिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत.- संभाजी पवार,शेतकरी

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण