शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

सातारा : वीज जाताच काळजात होते धस्स...! शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 13:42 IST

वीज वितरण कंपनीने वर्ये फिडरवर रोज साडेचार तासांचे अघोषित भारनियम सुरु केले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात परिक्षेचा काळ असतानाही वीज बंद केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शेतातील उभी पिकेही करपू लागली असून वीज जाताच लोकांच्या काळजात धस्स होत आहे.

ठळक मुद्देवीज जाताच काळजात होते धस्स...! शेतकरी चिंताग्रस्त वर्ये, धावडशी परिसरात अघोषित भारनियमन

सातारा : वीज वितरण कंपनीने वर्ये फिडरवर रोज साडेचार तासांचे अघोषित भारनियमन सुरु केले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात परिक्षेचा काळ असतानाही वीज बंद केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शेतातील उभी पिकेही करपू लागली असून वीज जाताच लोकांच्या काळजात धस्स होत आहे.जिल्ह्यात कुठेही भारनियमन घोषित केलेले नाही. तरी देखील काही भागांत जाणीवपूर्वक वीज घालविण्याचे प्रकार होत आहेत. ह्यवर्ये फिडरची वीज गळती जास्त आहे, असे कारण पुढे करुन भारनियमनचा आसूड ओढला जात आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून रामनगर, वर्ये, पानमळेवाडी, सैदापूर, कोंडवे, नेले, किडगाव, धावडशी, पिंंपळवाडी, म्हसवे या गावांत रोज सकाळी ८ ते दुपारी २.३0 असे साडेचार तासांचे भारनियमन सुरु आहे.

या परिसरात शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. वेण्णा नदी याच परिसरातून वाहत असल्याने शेतीमध्ये बागायती पिके तसेच ऊसाची लागणही मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे. या पिकांना पाणी लागते. पाण्याविना पिके करपू लागली आहेत. भारनियमनामुळे पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे.दरम्यान, उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने उकाड्यापासून बचावासाठी पंखे, एअर कुलरचा वापर केला जातो, यासाठी वीज लागते. मात्र वीजच नसल्याने ही यंत्रणा बंद पडून लोकांचे हाल होताना दिसत आहेत.

मुलांच्या परीक्षेचा कालावधी सुरु आहे, त्यातच या परिसरातील बहुतांश गावांच्या यात्रा सध्या सुरु असल्याने वीज महत्त्वाची ठरते. मात्र याचा विचार भारनियमन करताना केलेला दिसत नाही. हॉटेल व्यावसायिकांचे फ्रिज बंद राहत असल्याने पाणी, कोल्ड्रिंक्स थंड ठेवण्यासाठी व्यावसायिक बर्फाच्या लाद्या विकत आणताना दिसत आहेत.वेळेत बिले भरणाºयांवरही अन्यायवर्ये फिडरच्या माध्यमातून ज्यांना वीज मिळते, त्यापैकी बहुतांश ग्राहक हे वेळेत वीज बिल भरतात, मग वीज गळतीचे पाप त्यांच्या माथी मारण्याचे कारस्थान का खेळले जात आहे?, तसेच इथली वीज वाचवून दुसरीकडे तिचा वापर केला जात आहे का?, असे प्रश्न वीज ग्राहकांना पडले आहेत.

एका विहिरीवरुन वार लावून पाणी घ्यावे लागते. साहजिकच अनेक शेतकरी एकाच विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असतात. रोज साडेचार तास सक्तीने वीज जात असल्याने पिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत.- संभाजी पवार,शेतकरी

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण