शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सातारा : पवारांचे ऐकून घ्यायला आम्ही दूधखुळे नाही : लक्ष्मण माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 17:30 IST

पवारांचे ऐकून निर्णय घ्यायला आम्ही दुधखुळे नाही. अनेक निर्णयांमध्ये पवार आमचा सल्ला घेतात. आम्ही नाही तर पवारच आमचे ऐकतात. त्यांच्या सल्ल्याने वंचित आघाडीची वाटचाल सुरु असल्याची चर्चा फोल आहे, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन महाआघाडीचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी केले.

ठळक मुद्देपवारांचे ऐकून घ्यायला आम्ही दूधखुळे नाही : लक्ष्मण माने काँग्रेस आघाडीशी बोलणी फिस्कटली तर ४८ जागी लढणार

सातारा : पवारांचे ऐकून निर्णय घ्यायला आम्ही दुधखुळे नाही. अनेक निर्णयांमध्ये पवार आमचा सल्ला घेतात. आम्ही नाही तर पवारच आमचे ऐकतात. त्यांच्या सल्ल्याने वंचित आघाडीची वाटचाल सुरु असल्याची चर्चा फोल आहे, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन महाआघाडीचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी केले.येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माने म्हणाले, जातीयवादी पक्षांना बाजूला सारुन आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी व डाव्या विचारांच्या पक्षांशी मैत्रीसाठी हात पुढे केले आहेत. जून महिन्यांपासून आम्हाला चर्चेला बोलावले जाईल, याच्या प्रतीक्षेत आहोत.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष याबाबत वेगवेगळी वक्तव्य करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार मात्र मैत्रीसाठी इच्छूक आहेत. आमच्याकडे सोयीस्कर पर्याय येणे आवश्यक आहे. १२ जागांची मागणी आम्ही केलेली आहे. ज्यांना वाटते की आम्हाला नादी लावणे सोपे आहे, त्यांनी हे लक्षात घ्यावे की आता दिवस बदलले आहेत.वंचित आघाडीला कुठल्या जागा हव्यात, याबाबत स्पष्टीकरण करताना माने म्हणाले, ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी व काँग्रेसचे उमेदवार तीन ते चार वेळा पराभूत झाले आहेत, पुन्हा निवडून येण्याची शक्यताही नाही, अशाच जागा आम्ही मागत आहोत. गरीब लोकांनीच भाजपला सत्तेवर आणले आहे. आता हेच लोक भाजपला सत्तेवरुन खाली खेचतील.एमआयएमशी केलेली युती कुठल्याही परिस्थितीत तोडणार नाही, असे स्पष्ट करत माने यांनी आरएसएसवर तोफ डागली. एमआयएम पक्ष हा जातीयवादी म्हणणाऱ्या आरएसएसच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. मुस्लिम, ख्रिश्चन हे भारतीय नागरिक आहेत, हे मानायला आरएसएस तयार नाही, मात्र आम्ही मुस्लिम, मराठा, ओबीसींसह सर्वच वंचितांना सोबत घेणार आहोत, असेही माने यांनी सांगितले.वंचित आघाडी १२ जागांवर ठामकाँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच जे डाव्या विचारसरणीचे पक्ष आहेत, त्यांच्याशी आघाडी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी इच्छूक आहे. आम्ही जून महिन्यात काँग्रेसकडे प्रस्ताव सादर केला होता. १२ जागांची आम्ही मागणी केली आहे, काँग्रेसने जर याबाबत नकार दर्शविला तर आम्ही स्वतंत्रपणे ४८ जागांवर उमेदवार उभे करुन लोकसभा निवडणूक लढवू, असा इशाराही माने यांनी दिला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSatara areaसातारा परिसरPoliticsराजकारण