शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

सातारा : रस्त्यातील खड्डे मुजविण्यासाठी चक्क काळी माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 13:22 IST

राज्यात सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेल्या सातारा-लोणंद राज्यमार्गावरील पावसाळ्यात पडलेले मोठमोठे खड्डे मुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता रस्त्याकडेला असलेल्या काळ्या मातीचा वापर केला जात आहे. यामुळे या रस्त्याची आता माती झाली आहे.

ठळक मुद्देरस्त्यातील खड्डे मुजविण्यासाठी चक्क काळी माती, नागरिकांत संताप सातारा-लोणंद राज्यमार्गावर बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याची करामत

वाठार स्टेशन : राज्यात सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेल्या सातारा-लोणंद राज्यमार्गावरील पावसाळ्यात पडलेले मोठमोठे खड्डे मुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता रस्त्याकडेला असलेल्या काळ्या मातीचा वापर केला जात आहे. यामुळे या रस्त्याची आता माती झाली आहे.सातारा-लोणंद पुणे, सातारा-फलटण-बारामती अहमदनगर अशी सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेला टोल फ्री रस्ता पावसाळ्यापूर्वीच खड्ड्यात गेला होता. त्यानंतर सलग नव्वद दिवस पडलेल्या पावसाने असणारा रस्त्याही खड्ड्यात गेला. संपूर्ण रस्ताच सध्या धूळखात पडला आहे. या रस्त्यावर प्रवास करणे म्हणजे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण दिल्यासारखेच आहे.

या रस्त्यावर दुचाकी चालवणं ही आता एक प्रकारची शिक्षा समजली जात आहे. अनेकांनी आता या रस्त्याला कंटाळून पर्यायी मार्ग वापरण्याचाच मार्ग निवडला आहे. त्यातच वाढत्या पेट्रोल-डिझेलमुळे तर या रस्त्यावरील प्रवास अधिकच महाग झाला आहे.

रस्त्यावर पडलेले खड्डे ही या रस्त्याची पहिली समस्या नाही. या रस्त्यावर प्रवास मालवाहतूक करताना कोणत्याही प्रकारचा टोल लागत नाही. क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेली वाहतूकही सोयीस्कररित्या होत असल्याने अनेकांनी या रस्त्याचा मार्ग निवडला आहे.

एक तर या रस्त्यावर सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करावी किंवा या रस्त्याची देखभाल दुरुस्तीसाठी खासगी कंपनीकडे देऊन या कंपनीला टोल आकारण्याची परवानगी द्यावी. या रस्त्यावर टोल नाका सुरू झाला तर या रस्त्यावर सुरु असलेली निमी अवजड वाहतूक कमी होईल व या रस्त्याचे तसेच या रस्त्यावरील असलेल्या नदीवरील पुलाचे आयुष्यमान वाढेल अन्यथा सध्याचा आरळे पूल सावित्री पूल झाल्याशिवाय राहणार नाही, अश्ी भीती वाहनचालक व्यक्त करत आहे. 

या रस्त्यावर असलेली अवजड वाहतूक विचारात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात माती भरण्यापेक्षा चांगल्या पध्दतीने खडी डांबर भरून हे काम करावे.- दत्तात्रय भोईटे,माजी सरपंच तडवळे

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर