शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आयुष्यमान भारत ई-कार्ड नोंदणीत राज्यात सातारा अग्रेसर

By नितीन काळेल | Updated: October 31, 2023 18:42 IST

सातारा : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि एकत्रित आयुष्यमान भारत योजनेत सातारा जिल्ह्यामधील २७ रुग्णालयांचा समावेश असून यामध्ये ...

सातारा : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि एकत्रित आयुष्यमान भारत योजनेत सातारा जिल्ह्यामधील २७ रुग्णालयांचा समावेश असून यामध्ये १३५६ प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात येत आहेत. तर लाभार्थी कुटुंबांना वर्षाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. या आयुष्यमान भारत ई-कार्ड नोंदणीत सातारा राज्यात अग्रेसर असून यामुळे जिल्ह्याचा डंका पुन्हा वाजला आहे.सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येतात. या दोन्ही योजनेमध्ये १७ लाख ६२ हजार ९०० लाभार्थ्यांचा समावेश आहे. तर त्यापैकी ८ लाख २ हजार ८५९ इतके लाभार्थी आयुष्यमान भारत तसेच महात्मा ज्योतिराव फुले योजनेत ९ लाख ६० हजार ४१ लाभाऱ्थी आहेत. त्यापैकी आजअखेर ३ लाख ५ हजार ८४६ लाभार्थ्यांना ई -कार्डचे वाटप करण्यात आले आहे.उर्वरित लाभार्थ्यांची ई-कार्ड नोंदणी आणि वितरण प्रशासनामार्फत शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायत कार्यालयामधील आपले सरकार सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र, आशा सेविका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, परिचारिका, उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यामार्फत युध्द्पातळीवर देण्याची कार्यवाही सुरु आहे.राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार सातारा जिल्हा आयुष्यमान भारत दैनंदिन ई -कार्ड नोंदणीमध्ये मागील सहा दिवसांत राज्यात अग्रेसर ठरला आहे. यासाठी अधिकाऱ्यांची धडपड महत्वाची ठरली आहे. तसेच यापुढेही नोंदणी काम वेगाने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • मागील ३० दिवसांतील लाभार्थी नोंदणी - १,३९,०३५
  • मागील ७ दिवसांत झालेल्या लाभार्थ्यांची नोंदणी - ८८,८४६

मागील ६ दिवसांत नोंदीचा तपशील२५ ऑक्टोबर - ९,६७८२६ आॅक्टोबर - ९,१६६२७ आॅक्टोबर - १६,७८०२८ आॅक्टोबर - २१,६७१२९ आॅक्टोबर - १२,८५२३० आॅक्टोबर - १६,८११

सातारा जिल्हा आयुष्यमान भारत ई-कार्ड नोंदणीमध्ये मागील सहा दिवसांत राज्यात अग्रेसर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात ई-कार्ड नोंदणीची प्रक्रियाही युध्दपातळीवर सुरु आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक, परिचारिका, आशासेविकांकडे आधार कार्ड घेऊन जावे. यामध्ये पात्र असल्यास प्रशासनामार्फत आयोजित शिबिरात नोंदणी करावी. तसेच लाभार्थींनी स्वत: ॲन्ड्राईड मोबाईलमध्ये आयुष्यमान भारत ॲप घेऊन त्याद्वारे नोंदणी करुन ई-कार्ड काढून घ्यावे.- ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरayushman bharatआयुष्मान भारत