शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आयुष्यमान भारत ई-कार्ड नोंदणीत राज्यात सातारा अग्रेसर

By नितीन काळेल | Updated: October 31, 2023 18:42 IST

सातारा : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि एकत्रित आयुष्यमान भारत योजनेत सातारा जिल्ह्यामधील २७ रुग्णालयांचा समावेश असून यामध्ये ...

सातारा : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि एकत्रित आयुष्यमान भारत योजनेत सातारा जिल्ह्यामधील २७ रुग्णालयांचा समावेश असून यामध्ये १३५६ प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात येत आहेत. तर लाभार्थी कुटुंबांना वर्षाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. या आयुष्यमान भारत ई-कार्ड नोंदणीत सातारा राज्यात अग्रेसर असून यामुळे जिल्ह्याचा डंका पुन्हा वाजला आहे.सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येतात. या दोन्ही योजनेमध्ये १७ लाख ६२ हजार ९०० लाभार्थ्यांचा समावेश आहे. तर त्यापैकी ८ लाख २ हजार ८५९ इतके लाभार्थी आयुष्यमान भारत तसेच महात्मा ज्योतिराव फुले योजनेत ९ लाख ६० हजार ४१ लाभाऱ्थी आहेत. त्यापैकी आजअखेर ३ लाख ५ हजार ८४६ लाभार्थ्यांना ई -कार्डचे वाटप करण्यात आले आहे.उर्वरित लाभार्थ्यांची ई-कार्ड नोंदणी आणि वितरण प्रशासनामार्फत शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायत कार्यालयामधील आपले सरकार सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र, आशा सेविका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, परिचारिका, उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यामार्फत युध्द्पातळीवर देण्याची कार्यवाही सुरु आहे.राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार सातारा जिल्हा आयुष्यमान भारत दैनंदिन ई -कार्ड नोंदणीमध्ये मागील सहा दिवसांत राज्यात अग्रेसर ठरला आहे. यासाठी अधिकाऱ्यांची धडपड महत्वाची ठरली आहे. तसेच यापुढेही नोंदणी काम वेगाने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • मागील ३० दिवसांतील लाभार्थी नोंदणी - १,३९,०३५
  • मागील ७ दिवसांत झालेल्या लाभार्थ्यांची नोंदणी - ८८,८४६

मागील ६ दिवसांत नोंदीचा तपशील२५ ऑक्टोबर - ९,६७८२६ आॅक्टोबर - ९,१६६२७ आॅक्टोबर - १६,७८०२८ आॅक्टोबर - २१,६७१२९ आॅक्टोबर - १२,८५२३० आॅक्टोबर - १६,८११

सातारा जिल्हा आयुष्यमान भारत ई-कार्ड नोंदणीमध्ये मागील सहा दिवसांत राज्यात अग्रेसर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात ई-कार्ड नोंदणीची प्रक्रियाही युध्दपातळीवर सुरु आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक, परिचारिका, आशासेविकांकडे आधार कार्ड घेऊन जावे. यामध्ये पात्र असल्यास प्रशासनामार्फत आयोजित शिबिरात नोंदणी करावी. तसेच लाभार्थींनी स्वत: ॲन्ड्राईड मोबाईलमध्ये आयुष्यमान भारत ॲप घेऊन त्याद्वारे नोंदणी करुन ई-कार्ड काढून घ्यावे.- ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरayushman bharatआयुष्मान भारत