शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

आयुष्यमान भारत ई-कार्ड नोंदणीत राज्यात सातारा अग्रेसर

By नितीन काळेल | Updated: October 31, 2023 18:42 IST

सातारा : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि एकत्रित आयुष्यमान भारत योजनेत सातारा जिल्ह्यामधील २७ रुग्णालयांचा समावेश असून यामध्ये ...

सातारा : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि एकत्रित आयुष्यमान भारत योजनेत सातारा जिल्ह्यामधील २७ रुग्णालयांचा समावेश असून यामध्ये १३५६ प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात येत आहेत. तर लाभार्थी कुटुंबांना वर्षाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. या आयुष्यमान भारत ई-कार्ड नोंदणीत सातारा राज्यात अग्रेसर असून यामुळे जिल्ह्याचा डंका पुन्हा वाजला आहे.सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येतात. या दोन्ही योजनेमध्ये १७ लाख ६२ हजार ९०० लाभार्थ्यांचा समावेश आहे. तर त्यापैकी ८ लाख २ हजार ८५९ इतके लाभार्थी आयुष्यमान भारत तसेच महात्मा ज्योतिराव फुले योजनेत ९ लाख ६० हजार ४१ लाभाऱ्थी आहेत. त्यापैकी आजअखेर ३ लाख ५ हजार ८४६ लाभार्थ्यांना ई -कार्डचे वाटप करण्यात आले आहे.उर्वरित लाभार्थ्यांची ई-कार्ड नोंदणी आणि वितरण प्रशासनामार्फत शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायत कार्यालयामधील आपले सरकार सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र, आशा सेविका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, परिचारिका, उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यामार्फत युध्द्पातळीवर देण्याची कार्यवाही सुरु आहे.राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार सातारा जिल्हा आयुष्यमान भारत दैनंदिन ई -कार्ड नोंदणीमध्ये मागील सहा दिवसांत राज्यात अग्रेसर ठरला आहे. यासाठी अधिकाऱ्यांची धडपड महत्वाची ठरली आहे. तसेच यापुढेही नोंदणी काम वेगाने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • मागील ३० दिवसांतील लाभार्थी नोंदणी - १,३९,०३५
  • मागील ७ दिवसांत झालेल्या लाभार्थ्यांची नोंदणी - ८८,८४६

मागील ६ दिवसांत नोंदीचा तपशील२५ ऑक्टोबर - ९,६७८२६ आॅक्टोबर - ९,१६६२७ आॅक्टोबर - १६,७८०२८ आॅक्टोबर - २१,६७१२९ आॅक्टोबर - १२,८५२३० आॅक्टोबर - १६,८११

सातारा जिल्हा आयुष्यमान भारत ई-कार्ड नोंदणीमध्ये मागील सहा दिवसांत राज्यात अग्रेसर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात ई-कार्ड नोंदणीची प्रक्रियाही युध्दपातळीवर सुरु आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक, परिचारिका, आशासेविकांकडे आधार कार्ड घेऊन जावे. यामध्ये पात्र असल्यास प्रशासनामार्फत आयोजित शिबिरात नोंदणी करावी. तसेच लाभार्थींनी स्वत: ॲन्ड्राईड मोबाईलमध्ये आयुष्यमान भारत ॲप घेऊन त्याद्वारे नोंदणी करुन ई-कार्ड काढून घ्यावे.- ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरayushman bharatआयुष्मान भारत