शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

जनतेची दिशाभूल करणारी जाहिरात सातारा शासनाने केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:48 IST

सातारा : ‘जलयुक्त शिवार योजनेत गतवर्षी माण तालुक्यातील बिदाल गावाचा समावेश नव्हता,

ठळक मुद्देबागांसह भातशेतीही केली जात असल्याचा जावईशोध

सातारा : ‘जलयुक्त शिवार योजनेत गतवर्षी माण तालुक्यातील बिदाल गावाचा समावेश नव्हता, तरी देखील शासनाने हे गाव जलयुक्तच्या योजनेतून पाणीदार झाले आहे, अशी जनतेची दिशाभूल करणारी जाहिरात शासनाने केली आहे. इतकेच करून सरकार थांबले नाही. या गावांत डाळिंबाच्या बागांसह भातशेतीही केली जात असल्याचा जावईशोध लावला आहे,’ असा आरोप काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला.

येथील नियोजन भवनात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक झाली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार शंभूराज देसाई, आमदार आनंदराव पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे उपस्थित होत.

गोरे म्हणाले, ‘जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळ माण तालुका कशा पद्धतीने पाणीयुक्त होतोय, याची जाहिरात केली जात आहे. वास्तविक, तालुक्यातील अनेक गावांत भीषण पाणी टंचाई आहे. गतवर्षी बिदालचा जलयुक्त शिवार योजनेत सहभाग नव्हता. २०१७-१८ च्या यादीत या गावचा जलयुक्त शिवार योजनेत सहभाग घेतला गेला आहे. वास्तविक, या गावातील लोकांनी ८० ते ९० लाख रुपयांची वर्गणी काढून जलयुक्तची कामे केली आहेत.

तालुक्यातील ३९ बंधाºयांना गळती लागलेली आहे. पावसाळ्यात पाऊस होऊनही गळतीमुळे बंधाºयांत पाणीच उरले नाही. या कामाचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करणाºया संस्थेवर कारवाई केली पाहिजे. याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ही चौकशीही अचानक थांबली. गळती झालेल्या बंधाºयांची कामे संबंधित ठेकेदाराने पूर्ण केल्याशिवाय त्याचे डिपॉझिट देऊ नये. कामांची माहिती ५ डिसेंबरच्या बैठकीत मांडावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. .आम्ही, नाही पाणी फाउंडेशनने माहिती दिलीबिदाल गाव गतवर्षीच्या जलयुक्त शिवार योजनेच्या गावांमध्ये समाविष्ट नसताना शासनाने या गावात जलयुक्त योजनेतून कामे झाल्याची जाहिरात केली. हे नाव कुणी दिले, या गावाचं नाव शासनाला कसे कळाले? याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी आमदार गोरे यांनी लावून धरताच ‘आम्ही नाही पाणी फाउंडेशन’ने ही माहिती दिली असावी, असा खुलासा जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे यांनी केला. 

शासनाच्या जाहिरातीत बिदालचे नाव कसे गेले? याचा खुलासा प्रशासनाने केला पाहिजे, यासाठी मी आग्रह धरला. उलट शासनाची मदत न घेता या गावाने ८० ते ९० लाखांची वर्गणी गोळा करून पाणी समृध्दीसाठी प्रयत्न केले आहेत.- जयकुमार गोरे, आमदार

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर