शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सातारा जिल्ह्याला कर्जमाफीचे मिळाले २३३ कोटी ६३ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:31 IST

सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ४१७ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

ठळक मुद्देरक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू : १८१ कोटी २९ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यात जमा; जिल्हा उपनिबंधकांची माहितीकर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकºयांना या योजनेत सामावून घेण्यात आले आहे.

सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ४१७ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्याला आजपर्यंत २३३ कोटी ६३ लक्ष ६ हजार ९२८ रुपये प्राप्त झाले असून, यापैकी १८१ कोटी २९ लाख रुपये प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत,’ अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी दिली आहे.

२६ हजार २६४ शेतकºयांचे कर्जमाफ झाले आहे. तसेच ३९ हजार ३३८ शेतकºयांना प्रोत्साहनपर लाभ मिळाला आहे. शेतकºयांसाठी कर्जमाफीची ही योजना कृषी व्यवस्थेला बळ पुरवणारी ठरली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रुपयांपर्यतचे कर्ज माफ करणे, नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकºयांना या योजनेत सामावून घेण्यात आले आहे.

योजनेच्या गतिमान व अचूक कार्यवाहीसाठी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारी जिल्हा सहकारी बँक व विविध राष्ट्रीयकृत बँकांवर कर्जमाफीची रक्कम वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यासाठी नियुक्त कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. आॅनलाईन प्रक्रियेसाठी अद्ययावत यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे देशातील आजवरची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी गतीने होण्यास मदत झाली आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्ह्यात आतापर्यंत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला १५९३०८ शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी २१० कोटी २२ लक्ष ४७ हजार २७५ आणि राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांना ३ हजार ५६५ शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी २३ कोटी ४० लक्ष ५९ हजार ६५३ रुपये असे एकूण २३३ कोटी ६३ लक्ष ६ हजार ९२८ रुपये प्राप्त झाले आहेत. यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ६२ हजार ३७ शेतकरी खातेधारकांच्या खात्यात १५७ कोटी ८८ लक्ष रुपये, राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकेच्या ३ हजार ५६५ शेतकºयांच्या खात्यात २३ कोटी ४० लाख रुपये अशीएकूण १८१ कोटी २९ लक्ष ३१ हजार ४६४ रुपये प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही गतीने सुरू आहे. 

कर्जमाफीसाठी टप्प्या-टप्प्याने ग्रीन लिस्ट व कर्जमाफीची रक्कम प्राप्त होत आहे. आतापर्यंत एकूण तीन ग्रीन यादीनुसार कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यानुसार शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येत आहे.- डॉ. महेश कदम, जिल्हा उपनिबंधक