शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

सातारा, वाईच्या नगराध्यक्षांना तुरुंगात टाकू !

By admin | Updated: April 1, 2015 00:08 IST

रामदास कदम : ‘कृष्णा’ प्रदूषणप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा

मुंबई : राज्यातील २६ महापालिका व २२७ नगरपालिका राज्यातील नद्यांचे ६० टक्के प्रदूषण करतात, अशी धक्कादायक माहिती मंगळवारी विधान परिषदेत देणाऱ्या पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सातारा जिल्ह्यातील सातारा व वाई नगरपालिकेने एक महिन्याच्या अवधीत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता २५ टक्के रक्कम राखून ठेवली नाही, तर या नगरपालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला.आनंदराव पाटील यांनी याबाबत लक्ष्यवेधी सूचना दाखल केली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना पर्यावरणमंत्री कदम म्हणाले की, राज्यातील महापालिका व नगरपालिकांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सोडले पाहिजे. मात्र, गेल्या ४० ते ४५ वर्षांत या दिशेने फारसे प्रयत्न झाले नाहीत. कऱ्हाड नगरपालिकेला सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता ६३ कोटी रुपये मंजूर झाले असून, दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल. मलकापूर नगरपालिकेला ४१ कोटी रुपये मंजूर झाले असून, आठ महिन्यांत तेथील प्रकल्प पूर्ण होईल.पुढील आठवड्यात सातारा व वाई या दोन्ही नगरपालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना आपण बोलावून घेऊ. त्यांनी एक महिन्यात आर्थिक तरतूद करून दिली नाही, तर मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकू. राज्यातील ५० टक्के नगरपालिकांनी २५ टक्के रकमेची तरतूद केली आहे, तर तेवढ्याच नगरपालिकांनी तरतूद करण्याकरिता कालावधी मागितला आहे, असे कदम यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)३० दशलक्ष लिटर पाण्याचे प्रदूषण३० सातारा व वाई नगरपालिकांनी एक महिन्यात आपल्या एकूण निधीपैकी २५ टक्के रक्कम घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया याकरिता राखून ठेवण्याची तयारी दाखवली, तर त्यांना केंद्र सरकारकडून निधी प्राप्त करून देऊ, असे कदम म्हणाले. कृष्णेत नगरपालिकांकडून सध्या ३० दशलक्ष लिटर पाण्याचे प्रदूषण केले जाते.