शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

सातारा :  धरणे भरली पण गतवर्षीपेक्षा १२ टीएमसी साठा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 13:56 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी धुवाँधार पाऊस बरसल्याने वेळेत धरणे भरली. तर दुसरीकडे नियोजनानुसार धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. मात्र, सप्टेंबर महिन्यात अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने पाणीपातळी वाढली नाही.

ठळक मुद्दे धरणे भरली पण गतवर्षीपेक्षा १२ टीएमसी साठा कमीसहा धरणांमध्ये १३४ टीएमसी इतका साठा

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी धुवाँधार पाऊस बरसल्याने वेळेत धरणे भरली. तर दुसरीकडे नियोजनानुसार धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. मात्र, सप्टेंबर महिन्यात अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने पाणीपातळी वाढली नाही. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा प्रमुख सहा धरणात १२ टीएमसीने साठा कमी आहे. सध्या या सहा धरणांमध्ये १३४ तर गतवर्षी १४६.२४ टीएमसी इतका साठा होता.सातारा जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या प्रारंभी पावसाने सुरूवात केली. पूर्व भागासह पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील पेरणी वेळेत झाली. मात्र, पश्चिम भाग वगळता पूर्व भागात अपवाद वगळता पाऊस झालाच नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी कमी पडले. याचा सर्वाधिक फटका माण तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला. शेतकºयांच्या पदरी कमी उत्पादन आले. तर पश्चिम भागात जुलै आणि आॅगस्ट महिन्यात धुवाँधार पाऊस झाला. त्यामुळे कोयनेसह, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आदी धरणे वेळेत भरली. त्यातच सतत पाऊस असल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले. असे असलेतरी सध्या मात्र, या धरणात पाणीसाठा कमी आहे. याला कारण म्हणजे सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर