शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

सातारा : ऐन दिवाळीत खर्डा-भाकर खाऊन शासनाचा निषेध, पुसेसावळीत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 17:28 IST

खटाव तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून घोषित व्हावा, यासाठी पुसेसावळीसह परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी साडेवाजता वाजता येथील दत्तचौकामध्ये रास्तारोको आंदोलन केले.

ठळक मुद्देऐन दिवाळीत खर्डा-भाकर खाऊन शासनाचा निषेध, पुसेसावळीत रास्ता रोकोखटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

पुसेसावळी : खटाव तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून घोषित व्हावा, यासाठी पुसेसावळीसह परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी साडेवाजता वाजता येथील दत्तचौकामध्ये रास्तारोको आंदोलन केले.

हे आंदोलन सुमारे एक तास सुरु होते, यावेळी पुसेसावळी, राजाचे कुर्ले, पारगाव, चोराडे गोरेगाव, वडगाव, कळंबी, वडी, लाडेगाव, उंचीठाणे, रहाटणी यासह परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होते. तसेच आंदोलनावेळी शेतकऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांनीही खर्डा-भाकरी खाऊन दिवाळी साजरी केली.यावेळी शासनाच्याविरोधात घोषणा देत खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली. शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत खटाव तालुक्याचा समावेश न केल्यामुळे शेतकरी जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार होती मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळी यादीत खटाव तालुक्याचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते.शासनाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत देखील खटावचा समावेश न झाल्यामुळे हुतात्म्यांच्या भूमीची चेष्टा केली गेली आहे. त्यामुळे सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी शांततेच्या व लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलनकरण्यात आले. यावेळी आंदोलन स्थळी आलेले वडूजचे नायब तहसीलदार सुधाकर धायिजे यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी गावोगावचे राजकीय, सामाजिक शेतकरी संघटना आदी क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते, शेतकरी वर्ग उपस्थित होते. या आंदोलनांवेळी औंध पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक सुनील जाधव व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

जोपर्यंत दुष्काळ जाहीर होत नाही, तोपर्यंत या भागात मंत्र्यांना फिरु देणार नाही. दुष्काळ जाहीर न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांत बहिष्कार टाकावा, लोकप्रतिनिधिंनी शेतकऱ्यांच्या मुलभूत सुविधांकडे लक्ष दयावे.- सचिन नलवडे,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

प्रशासन व पदाधिकारी यांनी आणेवारी देताना लक्ष देण्याची गरज होती; परंतु याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तरी शासनाने फेरसर्वेक्षण करुन तालुक्याचा दुष्काळी यादीमध्ये सामावेश करावा, अन्यथाजनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.- मानसिंगराव माळवे,माजी समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद, सातारा

टॅग्स :GovernmentसरकारSatara areaसातारा परिसर