शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

सातारा : ऐन दिवाळीत खर्डा-भाकर खाऊन शासनाचा निषेध, पुसेसावळीत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 17:28 IST

खटाव तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून घोषित व्हावा, यासाठी पुसेसावळीसह परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी साडेवाजता वाजता येथील दत्तचौकामध्ये रास्तारोको आंदोलन केले.

ठळक मुद्देऐन दिवाळीत खर्डा-भाकर खाऊन शासनाचा निषेध, पुसेसावळीत रास्ता रोकोखटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

पुसेसावळी : खटाव तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून घोषित व्हावा, यासाठी पुसेसावळीसह परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी साडेवाजता वाजता येथील दत्तचौकामध्ये रास्तारोको आंदोलन केले.

हे आंदोलन सुमारे एक तास सुरु होते, यावेळी पुसेसावळी, राजाचे कुर्ले, पारगाव, चोराडे गोरेगाव, वडगाव, कळंबी, वडी, लाडेगाव, उंचीठाणे, रहाटणी यासह परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होते. तसेच आंदोलनावेळी शेतकऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांनीही खर्डा-भाकरी खाऊन दिवाळी साजरी केली.यावेळी शासनाच्याविरोधात घोषणा देत खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली. शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत खटाव तालुक्याचा समावेश न केल्यामुळे शेतकरी जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार होती मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळी यादीत खटाव तालुक्याचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते.शासनाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत देखील खटावचा समावेश न झाल्यामुळे हुतात्म्यांच्या भूमीची चेष्टा केली गेली आहे. त्यामुळे सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी शांततेच्या व लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलनकरण्यात आले. यावेळी आंदोलन स्थळी आलेले वडूजचे नायब तहसीलदार सुधाकर धायिजे यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी गावोगावचे राजकीय, सामाजिक शेतकरी संघटना आदी क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते, शेतकरी वर्ग उपस्थित होते. या आंदोलनांवेळी औंध पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक सुनील जाधव व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

जोपर्यंत दुष्काळ जाहीर होत नाही, तोपर्यंत या भागात मंत्र्यांना फिरु देणार नाही. दुष्काळ जाहीर न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांत बहिष्कार टाकावा, लोकप्रतिनिधिंनी शेतकऱ्यांच्या मुलभूत सुविधांकडे लक्ष दयावे.- सचिन नलवडे,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

प्रशासन व पदाधिकारी यांनी आणेवारी देताना लक्ष देण्याची गरज होती; परंतु याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तरी शासनाने फेरसर्वेक्षण करुन तालुक्याचा दुष्काळी यादीमध्ये सामावेश करावा, अन्यथाजनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.- मानसिंगराव माळवे,माजी समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद, सातारा

टॅग्स :GovernmentसरकारSatara areaसातारा परिसर