शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

सातारा @ 4० अंश सेल्सिअस...

By admin | Updated: April 2, 2016 00:03 IST

सोसवेना उन्हाच्या झळा : उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्री अन् मिळेल त्या साधनांचा वापर

सातारा : एप्रिल महिना आत्ताशी सुरू झाला नाही तोच, सूर्यनारायण आग ओकायला लागले आहेत. शुक्रवारी सातारा शहरातील तापमान ४० अंश सेल्सीअसच्या घरात पोहोचला आहे. उन्हाच्या चटक्यापासून बचाव करण्यासाठी मिळेल त्या वस्तूंचा आधार घ्यावा लागत आहे.जिल्ह्यातील सर्वच ॠतू तीव्र स्वरूपाचे असतात. सर्वसाधारणपणे मे महिन्यातील उन्हाळा असह्य असतो. मात्र, परिसरातील डोंगरी प्रदेश, विमुल वनसंपदा असल्याने गार झुळूक येत असते. त्यामुळे कडक उन्हातही फारसा फरक पडत नाही. यंदा मात्र, एप्रिलमध्येच उन्हाचा पारा उसळी मारत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ३५ ते ३८ अंश सेल्सीअसच्या घरात असायचा. शुक्रवारी मात्र कहरच झाला. ३९.५ अंश सेल्सीअसची पातळी ओलांडली आहे.कडक उन्हामुळे सावलीत बसले तरी उन्हाच्या झळा बसत आहेत. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या रुग्णालयांमध्ये वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे त्रासलेल्या जीवाला शांत करण्यासाठी शहरातील रसवंतीगृह, आयस्क्रिम पार्लरमध्ये गर्दी होऊ लागली आहे. तसेच माठातील पाणी, फ्रीजमधील पाण्याचा वापर केला जात आहे. दरम्यान, उन्हातून आल्यानंतर लगेच अति थंड पाणी पिण्याचे शक्यतो टाळावे, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत. (प्रतिनिधी)अंघोळीचा टपउन्हाच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी शहरात आलेले लोक मिळेल त्या साधनांचा वापर करत आहेत. दुकानातून आंघोळीसाठी बांथरूममध्ये बसायला वापरला जाणारा टप चक्क डोक्यावर ठेवून एक काका निघाले होते. तर टीव्हीचा रिकामा पुट्टा डोक्याला अडवा लावून एक काका निघाले होते. महिला तसेच तरुणी घरातून बाहेर पडतानाच छत्र्या घेऊन जातात. तसेच चेहऱ्याला रुमाल, स्टोल, ओढणींच्या साह्याने झाकून घेत असतात. कापडी टोप्या बाजारात आलेल्या असल्या तरी वाल्यापासून बनविलेल्या टोप्या वापरण्यावर भर दिला जात आहे. त्या नैसर्गिकपणे गारवा देत आहेत.