शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

सातारा : निवृत्तीची वय कमी केल्याने २७५ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना घरी जावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 14:31 IST

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना दुसरीकडे मात्र, सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० केले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे २७५ सेविका, मदतनिसांवर एक एप्रिलपासून घरी जाण्याची वेळ आली आहे. शासनाने एका हाताने दिले असून दुसऱ्यांने काढून घेतले आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.

ठळक मुद्देनिवृत्तीची वय कमी केल्याने २७५ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना घरी जावे लागणारसातारा जिल्ह्यातील स्थिती : संतापाची लाट;एका हाताने दिले दुसऱ्याने काढून घेतले

सातारा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना दुसरीकडे मात्र, सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० केले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे २७५ सेविका, मदतनिसांवर एक एप्रिलपासून घरी जाण्याची वेळ आली आहे. शासनाने एका हाताने दिले असून दुसऱ्यांने काढून घेतले आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.लहान मुलांना शिक्षण देण्याचे, त्यांना घडविण्याचे काम अंगणवाडीत होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून या अंगणवाड्या सुरू आहेत. केंद्र आणि राज्य शासन यामधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन देते. अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस इमानइतबारे कमी प्रमाणात मानधन असतानाही काम करत आहेत. परंतु, त्यांच्या अनेक मागण्या आजही शासनदरबारी धुळखात आहेत.

आंदोलन केल्यानंतर अश्वासनाशिवाय त्यांच्या पदरात आतापर्यंत काहीच पडले नाही. त्यामुळेच आजही अवघ्या तुटपुंज्या मानधनावर त्यांना काम करावे लागत आहे. याबद्दल संघटना आक्रमक होत असल्यातरीही शासनदरबारी त्यांना संघर्ष केल्याशिवाय काहीही हाती लागलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा मानधनाचा प्रश्न शासनदरबारी आहे.

गेल्यावर्षी आंदोलन केल्यानंतर राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी होणार असून तसा शासकीय निर्णय काढण्यात आला आहे. या गोष्टीचा आनंद होत असतानाच शासनाने हा आनंद संपविण्याचा घाट घातला आहे. कारण, या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो सेविका आणि मदतनीस यांना एक एप्रिलपासून घरी जावे लागणार आहे.

यामध्ये सातारा जिल्ह्यातील सुमारे २७५ सेविका आणि मदतनीस यांचा समावेश असणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेतील संबंधित विभाग कामाला लागला आहे. येत्या काही दिवसांतच जिल्ह्यातील किती सेविका आणि मदनीस ३१ मार्च रोजी ६० वर्षे पूर्ण करणार आहेत, याची सर्व माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे.

शासनाच्या या नव्या निर्णयाने अंगणवाडी कर्मचारी हवालदिल झाल्या आहेत. कारण कामावर घेताना ६५ वर्षे वयाची अट निवृत्तीची होती. ती कमी झाल्याने आता पुढे काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. दुसरीकडे या अन्यायाबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संघटना सक्रीय झाली आहे. त्यांनी २० मार्चला मुंबईत राज्यव्यापी मोर्चाची हाक दिली आहे. तसेच न्यायालयात जाण्याचा निर्धारही संघटनेने केला आहे.

टॅग्स :GovernmentसरकारSatara areaसातारा परिसर