शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सातारा : निवृत्तीची वय कमी केल्याने २७५ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना घरी जावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 14:31 IST

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना दुसरीकडे मात्र, सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० केले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे २७५ सेविका, मदतनिसांवर एक एप्रिलपासून घरी जाण्याची वेळ आली आहे. शासनाने एका हाताने दिले असून दुसऱ्यांने काढून घेतले आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.

ठळक मुद्देनिवृत्तीची वय कमी केल्याने २७५ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना घरी जावे लागणारसातारा जिल्ह्यातील स्थिती : संतापाची लाट;एका हाताने दिले दुसऱ्याने काढून घेतले

सातारा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना दुसरीकडे मात्र, सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० केले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे २७५ सेविका, मदतनिसांवर एक एप्रिलपासून घरी जाण्याची वेळ आली आहे. शासनाने एका हाताने दिले असून दुसऱ्यांने काढून घेतले आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.लहान मुलांना शिक्षण देण्याचे, त्यांना घडविण्याचे काम अंगणवाडीत होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून या अंगणवाड्या सुरू आहेत. केंद्र आणि राज्य शासन यामधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन देते. अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस इमानइतबारे कमी प्रमाणात मानधन असतानाही काम करत आहेत. परंतु, त्यांच्या अनेक मागण्या आजही शासनदरबारी धुळखात आहेत.

आंदोलन केल्यानंतर अश्वासनाशिवाय त्यांच्या पदरात आतापर्यंत काहीच पडले नाही. त्यामुळेच आजही अवघ्या तुटपुंज्या मानधनावर त्यांना काम करावे लागत आहे. याबद्दल संघटना आक्रमक होत असल्यातरीही शासनदरबारी त्यांना संघर्ष केल्याशिवाय काहीही हाती लागलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा मानधनाचा प्रश्न शासनदरबारी आहे.

गेल्यावर्षी आंदोलन केल्यानंतर राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी होणार असून तसा शासकीय निर्णय काढण्यात आला आहे. या गोष्टीचा आनंद होत असतानाच शासनाने हा आनंद संपविण्याचा घाट घातला आहे. कारण, या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो सेविका आणि मदतनीस यांना एक एप्रिलपासून घरी जावे लागणार आहे.

यामध्ये सातारा जिल्ह्यातील सुमारे २७५ सेविका आणि मदतनीस यांचा समावेश असणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेतील संबंधित विभाग कामाला लागला आहे. येत्या काही दिवसांतच जिल्ह्यातील किती सेविका आणि मदनीस ३१ मार्च रोजी ६० वर्षे पूर्ण करणार आहेत, याची सर्व माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे.

शासनाच्या या नव्या निर्णयाने अंगणवाडी कर्मचारी हवालदिल झाल्या आहेत. कारण कामावर घेताना ६५ वर्षे वयाची अट निवृत्तीची होती. ती कमी झाल्याने आता पुढे काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. दुसरीकडे या अन्यायाबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संघटना सक्रीय झाली आहे. त्यांनी २० मार्चला मुंबईत राज्यव्यापी मोर्चाची हाक दिली आहे. तसेच न्यायालयात जाण्याचा निर्धारही संघटनेने केला आहे.

टॅग्स :GovernmentसरकारSatara areaसातारा परिसर