शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

सातारा : निवृत्तीची वय कमी केल्याने २७५ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना घरी जावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 14:31 IST

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना दुसरीकडे मात्र, सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० केले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे २७५ सेविका, मदतनिसांवर एक एप्रिलपासून घरी जाण्याची वेळ आली आहे. शासनाने एका हाताने दिले असून दुसऱ्यांने काढून घेतले आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.

ठळक मुद्देनिवृत्तीची वय कमी केल्याने २७५ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना घरी जावे लागणारसातारा जिल्ह्यातील स्थिती : संतापाची लाट;एका हाताने दिले दुसऱ्याने काढून घेतले

सातारा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना दुसरीकडे मात्र, सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० केले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे २७५ सेविका, मदतनिसांवर एक एप्रिलपासून घरी जाण्याची वेळ आली आहे. शासनाने एका हाताने दिले असून दुसऱ्यांने काढून घेतले आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.लहान मुलांना शिक्षण देण्याचे, त्यांना घडविण्याचे काम अंगणवाडीत होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून या अंगणवाड्या सुरू आहेत. केंद्र आणि राज्य शासन यामधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन देते. अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस इमानइतबारे कमी प्रमाणात मानधन असतानाही काम करत आहेत. परंतु, त्यांच्या अनेक मागण्या आजही शासनदरबारी धुळखात आहेत.

आंदोलन केल्यानंतर अश्वासनाशिवाय त्यांच्या पदरात आतापर्यंत काहीच पडले नाही. त्यामुळेच आजही अवघ्या तुटपुंज्या मानधनावर त्यांना काम करावे लागत आहे. याबद्दल संघटना आक्रमक होत असल्यातरीही शासनदरबारी त्यांना संघर्ष केल्याशिवाय काहीही हाती लागलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा मानधनाचा प्रश्न शासनदरबारी आहे.

गेल्यावर्षी आंदोलन केल्यानंतर राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी होणार असून तसा शासकीय निर्णय काढण्यात आला आहे. या गोष्टीचा आनंद होत असतानाच शासनाने हा आनंद संपविण्याचा घाट घातला आहे. कारण, या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो सेविका आणि मदतनीस यांना एक एप्रिलपासून घरी जावे लागणार आहे.

यामध्ये सातारा जिल्ह्यातील सुमारे २७५ सेविका आणि मदतनीस यांचा समावेश असणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेतील संबंधित विभाग कामाला लागला आहे. येत्या काही दिवसांतच जिल्ह्यातील किती सेविका आणि मदनीस ३१ मार्च रोजी ६० वर्षे पूर्ण करणार आहेत, याची सर्व माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे.

शासनाच्या या नव्या निर्णयाने अंगणवाडी कर्मचारी हवालदिल झाल्या आहेत. कारण कामावर घेताना ६५ वर्षे वयाची अट निवृत्तीची होती. ती कमी झाल्याने आता पुढे काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. दुसरीकडे या अन्यायाबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संघटना सक्रीय झाली आहे. त्यांनी २० मार्चला मुंबईत राज्यव्यापी मोर्चाची हाक दिली आहे. तसेच न्यायालयात जाण्याचा निर्धारही संघटनेने केला आहे.

टॅग्स :GovernmentसरकारSatara areaसातारा परिसर