शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

चाफळच्या तलाठ्याचा सवता सुभा !

By admin | Updated: December 17, 2014 23:03 IST

ग्रामस्थांना अपमानास्पद वागणूक : मंडलाधिकाऱ्यांनी समज देऊनही ‘पहिले पाढे पंचावन्न’

चाफळ : चाफळ, ता. पाटण येथील सजाचे गावकामगार तलाठी सामान्य शेतकरी खातेदारांना दमबाजी करत असून, दाखले मागण्यास गेलेल्या खातेदारास आरेरावीची भाषा वापरत आहेत. सामान्य जनतेला विनयाने सेवा देणे हे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याचे कर्तव्य असताना, हे महाशय सामान्य जनतेला रुबाब दाखवत आहे. चाफळला नुकताच एक नवीन गावकामगार तलाठी दाखल झाला आहे. कार्यभार संभाळल्यापासून त्यांनी आपला सवता सुभा मांडला आहे. अनेक कारणास्तव बहुतेक शेतकऱ्यांना नेहमीच या कार्यालयाकडून दाखल्यांची आवश्यकता भासत असते; पण हे दाखले काढायला या कार्यालयात जायला शेतकरी घाबरू लागला आहे. कारण, हे महाशय विनयाने बोलणे; सोडाच शेतकऱ्यांना मोठ्या आवाजात बोलत कायद्याची भाषा शिकवत आहे. त्यातून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. या तलाठ्याला विभागातील जनता कंटाळली असून, कायद्याचे डोस पाजणाऱ्या या महाशयाला विभागात सध्या अनेक ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यावरील बेकायदा माती, वाळू व दगडांची चोरटी वाहतूक दिसत नाही. सतत सर्वसामान्य जनतेला कायघाचे डोस पाजणारा तलाठी स्वत:चे काम तरी व्यवस्थित करतात का? हे वरिष्टांनी तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या या कार्यालयातून देण्यात येणारे सात बारा खातेउतारा संगणकावरून खातेदारांना तत्काळ देणे बंधनकारक असताना तलाठी खातेदारांना जादा पैसे मोजण्यास लावून खातेदारांच्याच हातात थेट खातेपुस्तक देऊन सरळ त्याची झेराक्स काढण्यास पाठवित आहे. त्यामुळे जेवढे उतारे असतील तेवढी रक्कम शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे. याशिवाय ज्या खाते पुस्तकात शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या नोंदी असतात, त्या नोंदीत कोणी फेरफार केल्यास खातेदाराच्या हातात पुस्तक देणे किती महागात पडू शकते, हे या त्यांना कोण सांगणार? सध्या तलाठी कार्यालयात सातबारा घेताना लिखाण फी म्हणून प्रत्येक उताऱ्यास दहा रुपये प्रमाणे पैसे घेऊन पुन्हा झेराक्सचे अतिरिक्त पैसे सामान्य शेतकऱ्ंयाना मोजायला लावत आहेत. (वार्ताहर)मी यापूर्वी दोनवेळा संबंधित तलाठ्याला समज दिली आहे. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची यापुढे काळजी घेतली जाईल. वेळेत कामे करण्याबाबत संबंधित तलाठ्याला सूचना केली आहे. पुन्हा एकदा याबाबत मी त्यांच्याशी बोलणार आहे.- एस. बी. जाधव, मंडलाधिकारीउत्खनन करणाऱ्यांची ‘चांदी’संबंधित तलाठ्याची नियुक्ती झाल्यापासून परिसरात गौणखनिज व मुरूम उत्खननात वाढ झाली आहे. त्यावर या तलाठ्याचा अंकुश नाही. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत अनभिज्ञ ठेवले जाते. त्यामुळे कारवाई होत नाही. परिणामी, गौणखनिजाचे उत्खनन करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. दिवसाढवळ्या त्यांच्याकडून मुरूम व डबर वाहतूक होत अहे.