शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

चाफळच्या तलाठ्याचा सवता सुभा !

By admin | Updated: December 17, 2014 23:03 IST

ग्रामस्थांना अपमानास्पद वागणूक : मंडलाधिकाऱ्यांनी समज देऊनही ‘पहिले पाढे पंचावन्न’

चाफळ : चाफळ, ता. पाटण येथील सजाचे गावकामगार तलाठी सामान्य शेतकरी खातेदारांना दमबाजी करत असून, दाखले मागण्यास गेलेल्या खातेदारास आरेरावीची भाषा वापरत आहेत. सामान्य जनतेला विनयाने सेवा देणे हे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याचे कर्तव्य असताना, हे महाशय सामान्य जनतेला रुबाब दाखवत आहे. चाफळला नुकताच एक नवीन गावकामगार तलाठी दाखल झाला आहे. कार्यभार संभाळल्यापासून त्यांनी आपला सवता सुभा मांडला आहे. अनेक कारणास्तव बहुतेक शेतकऱ्यांना नेहमीच या कार्यालयाकडून दाखल्यांची आवश्यकता भासत असते; पण हे दाखले काढायला या कार्यालयात जायला शेतकरी घाबरू लागला आहे. कारण, हे महाशय विनयाने बोलणे; सोडाच शेतकऱ्यांना मोठ्या आवाजात बोलत कायद्याची भाषा शिकवत आहे. त्यातून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. या तलाठ्याला विभागातील जनता कंटाळली असून, कायद्याचे डोस पाजणाऱ्या या महाशयाला विभागात सध्या अनेक ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यावरील बेकायदा माती, वाळू व दगडांची चोरटी वाहतूक दिसत नाही. सतत सर्वसामान्य जनतेला कायघाचे डोस पाजणारा तलाठी स्वत:चे काम तरी व्यवस्थित करतात का? हे वरिष्टांनी तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या या कार्यालयातून देण्यात येणारे सात बारा खातेउतारा संगणकावरून खातेदारांना तत्काळ देणे बंधनकारक असताना तलाठी खातेदारांना जादा पैसे मोजण्यास लावून खातेदारांच्याच हातात थेट खातेपुस्तक देऊन सरळ त्याची झेराक्स काढण्यास पाठवित आहे. त्यामुळे जेवढे उतारे असतील तेवढी रक्कम शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे. याशिवाय ज्या खाते पुस्तकात शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या नोंदी असतात, त्या नोंदीत कोणी फेरफार केल्यास खातेदाराच्या हातात पुस्तक देणे किती महागात पडू शकते, हे या त्यांना कोण सांगणार? सध्या तलाठी कार्यालयात सातबारा घेताना लिखाण फी म्हणून प्रत्येक उताऱ्यास दहा रुपये प्रमाणे पैसे घेऊन पुन्हा झेराक्सचे अतिरिक्त पैसे सामान्य शेतकऱ्ंयाना मोजायला लावत आहेत. (वार्ताहर)मी यापूर्वी दोनवेळा संबंधित तलाठ्याला समज दिली आहे. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची यापुढे काळजी घेतली जाईल. वेळेत कामे करण्याबाबत संबंधित तलाठ्याला सूचना केली आहे. पुन्हा एकदा याबाबत मी त्यांच्याशी बोलणार आहे.- एस. बी. जाधव, मंडलाधिकारीउत्खनन करणाऱ्यांची ‘चांदी’संबंधित तलाठ्याची नियुक्ती झाल्यापासून परिसरात गौणखनिज व मुरूम उत्खननात वाढ झाली आहे. त्यावर या तलाठ्याचा अंकुश नाही. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत अनभिज्ञ ठेवले जाते. त्यामुळे कारवाई होत नाही. परिणामी, गौणखनिजाचे उत्खनन करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. दिवसाढवळ्या त्यांच्याकडून मुरूम व डबर वाहतूक होत अहे.