शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

अंगापूर वंदन येथे ‘राष्ट्रवादी’मध्येच लढत

By admin | Updated: October 30, 2015 23:16 IST

ग्रामपंचायत निवडणूक : ११ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात

संदीप कणसे- अंगापूर वंदन, ता. सातारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ११ जागांसाठी २३ जण रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. सध्या गुप्त बैठका, जेवणावळी व गाठीभेटींना जोर आला आहे.सातारा तालुक्यामध्ये ज्या महत्त्वपूर्ण व मोठ्या ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये अंगापूर वंदन ग्रामपंचायतही आहे. यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीअंतर्गत एवार्जीनाथ ग्रामविकास पॅनेल व एवार्जीनाथ पॅनेल अशी दोन पॅनेल लढत आहेत. पॅनेलकडून प्रत्येकी ११ उमेदवार उभे केले आहेत. एक अपक्षासह एकूण २३ जण रिंगणात आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची होईल, असे मानले जात आहे.या निवडणुकीची मोर्चेबांधणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपापल्या नेत्याकडे उमेदवारी मिळावी म्हणून हट्ट धरला होता. एकूण ४७ जणांनी यासाठी अर्ज दाखल केले होते; परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २३ अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक रंगदार होईल, असे बोलले जात आहे. यामध्ये खुल्या वर्गातून एका अपक्षाचाही निवडून येण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दोन्ही पॅनेलचे उमेदवार निवडताना पॅनेल प्रमुखांना इच्छुक उमेदवारांना समजूत घालताना नाराजीला सामोरे जावे लागत होते. यासाठी वाडा, भावकी, घर, निष्ठा व लोकप्रतिमा याही बाबीचा विचार करावा लागला. तरीही नाराज व निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवार नाराजीतून काय भूमिका घेतात व कोणत्या पॅनेलच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहतात, हेही पाहावे लागणार आहे.दि. १ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत असून, तारीख जवळ येऊ लागली आहे, तशी रंगत वाढू लागली आहे. गुप्त बैठका, जेवणावळी होऊ लागल्या आहेत. उमेदवार व कार्यकर्ते पदयात्रा व घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत. तर महिला उमेदवार हळदी-कुंकु घेऊन घरोघर महिला वर्गाशी संपर्क साधत आहेत. बॅनरबाजीने चौक फुलून गेले आहेत. आरोप-प्रत्यारोप, डाव-प्रतिडाव करून मतदारराजास आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर अपक्ष मात्र मी निवडून येणार, असे सांगत आहे. असे असले तरी लोकशाहीतील मतदारराजा काय करतोय हे मात्र दि. ३ नोव्हेंबरच्या निकालानंतरच समजणार आहे. वरिष्ठ नेते निवडणुकीपासून दूर...अंगापूर वंदनमध्ये दोन्ही पॅनेल खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांचे नेतृत्त्व मानणारी आहेत. परंतु वरिष्ठ नेते मात्र कुठेही सहभागी होताना दिसत नाहीत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील ३३ गावे संवेदनशील असल्याचा अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये अंगापूर वंदनचा समावेश आहे. यामुळे शासकीय यंत्रणासुद्धा लक्ष ठेवून आहे.