शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : राज्यमार्गावरील अतिक्रमणामुळे बाजारपेठेवर परिणाम, मायणीत वाहतुकीच्या कोंडीची समस्या : कातरखटावकरांचा आदर्श घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 15:26 IST

मायणी गावातून सुमारे एक किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जात असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूस मुख्य बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालय, बँका, बसस्थानक व शाळा आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच दोन्ही बाजूस रहिवासी घरे असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतुकीवर व बाजारपेठेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे मायणीकर कातरखटावकरांचा अतिक्रमण काढण्याचा आदर्श घेणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देराज्यमार्गावरील अतिक्रमणामुळे बाजारपेठेवर परिणाममायणीत वाहतुकीच्या कोंडीची समस्या कातरखटावकरांचा आदर्श घेण्याची गरज

मायणी : मायणी गावातून सुमारे एक किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जात असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूस मुख्य बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालय, बँका, बसस्थानक व शाळा आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच दोन्ही बाजूस रहिवासी घरे असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतुकीवर व बाजारपेठेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे मायणीकर कातरखटावकरांचा अतिक्रमण काढण्याचा आदर्श घेणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.शैक्षणिक, पर्यटन, धार्मिक व खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव अशी ओळख असलेल्या या गावात परिसरातील चितळी, कलेढोण, पाचवड, पडळ, धोंडेवाडी, निमसोड व सांगली जिल्ह्यातील माहुली व भिकवडी गावातील व परिसरातील वाड्या वस्त्यातील हजारो ग्रामस्थ रोज व्यापारासाठी व शासकीय कामासाठी येत असतात. प्राथमिक, माध्यमिक, इंग्लिश मीडियम स्कूल व व्यावसायिक शिक्षणासाठी याच भागासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात.

संपूर्ण गावामध्ये दिवसभर वर्दळ असते. मुख्य बाजारपेठेतून व गावातून जाणारा मल्हारपेठ-पंढरपूर हा एकमेव मार्ग असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांची तसेच ग्रामस्थांची वाहने व खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वाहनेही याच मार्गावर लावलेली असतात.चारचाकी व दोनचाकी वाहनांसाठी कुठेही वाहनतळ नाही. त्यामुळे काही वाहनचालक राज्यमार्गाच्याकडेला किंवा बसस्थानक परिसरात वाहने पार्किंग करून खरेदीसाठी व बँक, शासकीय कामांसाठी जात असतात. त्यामुळे बेशिस्त पार्किंग करून गेलेल्या वाहनचालकांमुळे राज्यमार्गावर सतत वाहतुकीची कोंडी तासन्तास होत असते.

त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या बसेस बसस्थानकावर न येता चांदणी चौकातूनच विटा, सांगली, वडूज, दहिवडी, बारामतीकडे जातात. विटा आगाराने आठवडा बाजारदिवशी एसटी बसस्थानकावर येणार नाही, असे पत्रच संबंधितांना दिले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTrafficवाहतूक कोंडी