शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी संभाजीराजेंची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

सातारा : मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खासदार संभाजीराजे येत्या २७ मे रोजी आपली भूमिका स्पष्ट ...

सातारा : मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खासदार संभाजीराजे येत्या २७ मे रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांनी साताऱ्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी भेट घेऊन चर्चा केली.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजप करीत आहे, तर सरकारने पूर्ण प्रयत्न केले तरीही सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केले. आता केंद्र सरकारनेच आरक्षणाबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय ठरत असल्याने खासदार संभाजीराजे यांनी मात्र स्वतंत्र भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते. पक्षीय चौकटी झुगारून त्यांनी आता हालचाली सुरू केलेल्या आहेत. मराठा समाज हा पिचलेला आहे. मोजक्या लोकांकडे संपत्ती, साम्राज्य असले तरीदेखील बहुसंख्येने लोक मोलमजुरी करून जगत आहेत, त्यांच्यापुढे भविष्याचा प्रश्न उभा आहे. तसेच मुलांना शिक्षण कसे द्यायचे? त्यांना नोकऱ्या लागतील का? असे अनेक प्रश्‍न त्यांना सतावत आहे. यापूर्वीची आरक्षणे दिली आहेत, त्यांचा फेर सर्व्हे करावा, आर्थिक निकष लावावा किंवा मराठ्यांना ईबीसी सवलतीप्रमाणे सरसकट आरक्षणाचा लाभ द्यावा, अशा पद्धतीच्या मागण्या पुढे येत आहेत.

या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यातील समन्वयकांशी संवाद सुरू ठेवलेला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आगामी कोणती भूमिका घ्यायची याबाबतचा निर्णय ते २७ मे रोजी जाहीर करणार आहेत. त्याआधी ते राज्यभर जाऊन मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी अशी सविस्तर चर्चा करणार आहेत, तसेच त्यांची मतेदेखील जाणून घेणार आहेत.

यावेळी राज्य समन्वयक विवेकानंद बाबर, बंडू कदम, उमेश शिर्के, संदीप नवघणे यांच्याशी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने पुढील भूमिकेबाबत संभाजीराजेंनी सविस्तर चर्चा केली.

आरक्षण वाढवून मिळण्यासाठीच प्रयत्न..

राज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्ग यांच्यामध्येच ५० टक्के आरक्षण विभागलेले आहे, तर भटक्या-विमुक्तांना राज्य सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवून दोन टक्के आरक्षण दिलेले आहे. केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा ७२ टक्क्यांवर करावी, अशी मागणी संभाजीराजे करणार असल्याची शक्यता कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

फोटो ओळ : सातारा येथे खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चाच्या सातारा शहरातील समन्वयकांशी चर्चा केली.