शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी संभाजीराजेंची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

सातारा : मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खासदार संभाजीराजे येत्या २७ मे रोजी आपली भूमिका स्पष्ट ...

सातारा : मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खासदार संभाजीराजे येत्या २७ मे रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांनी साताऱ्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी भेट घेऊन चर्चा केली.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजप करीत आहे, तर सरकारने पूर्ण प्रयत्न केले तरीही सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केले. आता केंद्र सरकारनेच आरक्षणाबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय ठरत असल्याने खासदार संभाजीराजे यांनी मात्र स्वतंत्र भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते. पक्षीय चौकटी झुगारून त्यांनी आता हालचाली सुरू केलेल्या आहेत. मराठा समाज हा पिचलेला आहे. मोजक्या लोकांकडे संपत्ती, साम्राज्य असले तरीदेखील बहुसंख्येने लोक मोलमजुरी करून जगत आहेत, त्यांच्यापुढे भविष्याचा प्रश्न उभा आहे. तसेच मुलांना शिक्षण कसे द्यायचे? त्यांना नोकऱ्या लागतील का? असे अनेक प्रश्‍न त्यांना सतावत आहे. यापूर्वीची आरक्षणे दिली आहेत, त्यांचा फेर सर्व्हे करावा, आर्थिक निकष लावावा किंवा मराठ्यांना ईबीसी सवलतीप्रमाणे सरसकट आरक्षणाचा लाभ द्यावा, अशा पद्धतीच्या मागण्या पुढे येत आहेत.

या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यातील समन्वयकांशी संवाद सुरू ठेवलेला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आगामी कोणती भूमिका घ्यायची याबाबतचा निर्णय ते २७ मे रोजी जाहीर करणार आहेत. त्याआधी ते राज्यभर जाऊन मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी अशी सविस्तर चर्चा करणार आहेत, तसेच त्यांची मतेदेखील जाणून घेणार आहेत.

यावेळी राज्य समन्वयक विवेकानंद बाबर, बंडू कदम, उमेश शिर्के, संदीप नवघणे यांच्याशी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने पुढील भूमिकेबाबत संभाजीराजेंनी सविस्तर चर्चा केली.

आरक्षण वाढवून मिळण्यासाठीच प्रयत्न..

राज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्ग यांच्यामध्येच ५० टक्के आरक्षण विभागलेले आहे, तर भटक्या-विमुक्तांना राज्य सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवून दोन टक्के आरक्षण दिलेले आहे. केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा ७२ टक्क्यांवर करावी, अशी मागणी संभाजीराजे करणार असल्याची शक्यता कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

फोटो ओळ : सातारा येथे खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चाच्या सातारा शहरातील समन्वयकांशी चर्चा केली.