शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

सांबरवाडी जलशुद्धिकरण केंद्र गाळमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:40 IST

सातारा : कास योजनेवरील आधारित असलेले सांबरवाडी येथील जलशुद्धिकरण केंद्र गाळमुक्त करण्यात आले. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या केंद्राची स्वच्छता ...

सातारा : कास योजनेवरील आधारित असलेले सांबरवाडी येथील जलशुद्धिकरण केंद्र गाळमुक्त करण्यात आले. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या केंद्राची स्वच्छता करण्यात आली. या कामाची पाहणी करून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पाणीपुुरवठा सभापती सीता हादगे यांनी दिली.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. कासमधून येणारे पाणी सांबरवाडी येथील नऊ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धिकरण केंद्रात शुद्ध केले जाते. वर्षातून एकदा या फिल्टरेशन टँकची स्वच्छता करण्यात येते. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुधीर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप सावंत व त्यांच्या पथकाने गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते. ते काम गुरुवारी पूर्णत्वास आले. पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी फिल्टरेशन टँकची पाहणी केली.

सातारा शहराची हद्दवाढ झाल्यामुळे भविष्यकाळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून कास जलाशयाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण केले जाईल. जलाशयातून पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर माती वाहत येऊन ती जलशुद्धिकरण केंद्रात साचली जाते. मातीचे रूपांतर गाळात होत असते. प्रतिवर्षी मार्च अथवा एप्रिल महिन्यात या केंद्राची स्वच्छता पालिकेच्या माध्यमातून केली जाते. नियमित कामाचा भाग म्हणून ही स्वच्छता करण्यात आली असून, सातारकरांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यास आपण नेहमीच कटिबद्ध राहू, अशी ग्वाही यावेळी पाणीपुवठा सभापती सीता हादगे यांनी दिली.

फोटो : २५ सांबरवाडी

सांबरवाडी येथील जलशुद्धिकरण केंद्रांची पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी पाहणी केली. यावेळी अभियंता सुधीर चव्हाण, संदीप सावंत, आदी उपस्थित होते.