शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

सांबरवाडी जलशुद्धिकरण केंद्र गाळमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:40 IST

सातारा : कास योजनेवरील आधारित असलेले सांबरवाडी येथील जलशुद्धिकरण केंद्र गाळमुक्त करण्यात आले. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या केंद्राची स्वच्छता ...

सातारा : कास योजनेवरील आधारित असलेले सांबरवाडी येथील जलशुद्धिकरण केंद्र गाळमुक्त करण्यात आले. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या केंद्राची स्वच्छता करण्यात आली. या कामाची पाहणी करून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पाणीपुुरवठा सभापती सीता हादगे यांनी दिली.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. कासमधून येणारे पाणी सांबरवाडी येथील नऊ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धिकरण केंद्रात शुद्ध केले जाते. वर्षातून एकदा या फिल्टरेशन टँकची स्वच्छता करण्यात येते. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुधीर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप सावंत व त्यांच्या पथकाने गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते. ते काम गुरुवारी पूर्णत्वास आले. पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी फिल्टरेशन टँकची पाहणी केली.

सातारा शहराची हद्दवाढ झाल्यामुळे भविष्यकाळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून कास जलाशयाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण केले जाईल. जलाशयातून पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर माती वाहत येऊन ती जलशुद्धिकरण केंद्रात साचली जाते. मातीचे रूपांतर गाळात होत असते. प्रतिवर्षी मार्च अथवा एप्रिल महिन्यात या केंद्राची स्वच्छता पालिकेच्या माध्यमातून केली जाते. नियमित कामाचा भाग म्हणून ही स्वच्छता करण्यात आली असून, सातारकरांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यास आपण नेहमीच कटिबद्ध राहू, अशी ग्वाही यावेळी पाणीपुवठा सभापती सीता हादगे यांनी दिली.

फोटो : २५ सांबरवाडी

सांबरवाडी येथील जलशुद्धिकरण केंद्रांची पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी पाहणी केली. यावेळी अभियंता सुधीर चव्हाण, संदीप सावंत, आदी उपस्थित होते.