शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तळी भरमसाठ; अडथळे सतराशे साठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:47 IST

सातारा : गणेशोत्सवाच्या तोंडावरच विसर्जन तळ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने पालिका प्रशासनापुढे यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. पोलीस प्रमुखांनी ऐतिहासिक रिसालदार तलावाची परवानगी नाकारल्याने तळ्याचा तिढा आणखीनच वाढला आहे. उत्सवाला कमी दिवस राहिल्याने ‘तळी भरमसाठ अन् अडचणी सतराशे साठ’ अशीच अवस्था सध्या पालिकेची झाली आहे. त्यामुळे गणेश मूर्तींचे विसर्जन करायचे कुुठे? ...

सातारा : गणेशोत्सवाच्या तोंडावरच विसर्जन तळ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने पालिका प्रशासनापुढे यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. पोलीस प्रमुखांनी ऐतिहासिक रिसालदार तलावाची परवानगी नाकारल्याने तळ्याचा तिढा आणखीनच वाढला आहे. उत्सवाला कमी दिवस राहिल्याने ‘तळी भरमसाठ अन् अडचणी सतराशे साठ’ अशीच अवस्था सध्या पालिकेची झाली आहे. त्यामुळे गणेश मूर्तींचे विसर्जन करायचे कुुठे? असा प्रश्न गणेशमंडळांना सतावू लागला आहे.पालिकेच्या वतीने दरवर्षी जिल्हा परिषदेच्या प्रतापसिंह शेती फार्म हाऊसच्या जागेत कृत्रिम तळ्याची उभारणी केली जात होती. यात तळ्यात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात होते. यंदा जिल्हा परिषदेने कृत्रिम तळ्यासाठी जागा देण्यास मनाई केली. त्यामुळे पालिकेकडून पुन्हा नव्याने मूर्ती विसर्जनासाठी तळ्याची चाचपणी सुरू झाली. पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागे असलेल्या ऐतिहासिक रिसालदार तलावाची निवडही करण्यात आली. मात्र, पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी तलावात विसर्जनाची परवानगी नाकरल्याने पालिकेची धावाधाव सुरू झाली आहे.सातारा शहरात पूर्वीपासून मंगळवार तळे, मोती तळे, फुटका तलाव आदी ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात होते. जलप्रदूषण व अन्य कारणांमुळे कालांतराने या तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जनासाठी बंदी घालण्यात आली. त्यामुळे पालिकेकडून गोडोली, सदर बझार, हुतात्मा स्मारक, जलतरण तलाव व प्रतापसिंह शेती फार्म हाऊस येथील कृत्रिम तळ्यात मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली. परंतु प्रतापसिंह शेती फार्म हाऊसच्या जागेवर तळे उभारण्यासाठी जिल्हा परिषदेने बंदी घातल्याने पालिकेची धांदल उडाली आहे.ऐतिहासिक मंगळवार तळ्यात घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. मोती तळेही सध्या बंद अवस्थेत आहे. फुटका तलावातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. तसेच कृत्रिम तळेही यंदा खोदण्यात येणार नसल्याने सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन नक्की करायचे कुुठे? असा प्रश्न गणेश मंडळांपुढे उभा राहिला आहे.सातारा शहरात अनेक ऐतिहासिक तळी आहेत. मात्र, या तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जनासाठी बंद घालण्यात आल्याने पालिकेपुढे विसर्जन नक्की करायचे कोठे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेकडून रिसालदार तलावाची पाहणीही करण्यात आली. परंतु शहरातील सर्वात ऐतिहासिक असा हा तलाव आहे. या तलावात यापूर्वी कधीही मूर्तीचे विसर्जन झाले नाही.तशी कोणतीच व्यवस्था या ठिकाणी नाही, असा निर्वाळा देत नूतन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या तलावातही मूर्ती विसर्जन करू नये, असे पालिकेला सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या अडचणींमध्ये अधिकच भर पडली आहे.गणेशोत्सवाला अवघे तेवीस दिवस उरल्याने सध्या तरी नव्या कृत्रिम तळ्यासाठी जागेची पाहणी करणे, तळ्याचे खोदकाम करणे अन् यावर होणारा लाखो रुपयांचा खर्च पालिकेला न परवडणारा असाच आहे. पोलीस अधीक्षकांनी रिसालदार तलावाची परवानगी नाकारल्याने पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन याबाबत तोडगा काढण्याची मागणी केली आहे. या दृष्टीने सोमवार, दि. २० रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या बैठकीत योग्य तोडगा न निघल्यास मूर्ती विसर्जनाचा प्रश्न बिकट होणार आहे.... गोडोली तळे ठरू शकतो पर्यायशहरातील गोडोली तळ्यातही पालिकेच्या वतीने दरवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. सध्या या तळ्यात मुबलक पाणीसाठा आहे. मोठ्या मंडळांच्या गणेश मूर्ती व दुर्गादेवींचे विसर्जन करण्यासाठी पालिकेला हा तळे पर्याय ठरू शकतो. मात्र, प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेणे, मूर्ती विसर्जनानंतर गाळ काढणे, सीसीटीव्ही कॅमेरे, क्रेन आदींसाठी पालिकेला निधीची तरतूूद करावी लागणार आहे. गोडोली तळ्याचा पर्याय जरी पालिकेपुढे असला तरी हे तळे शहरापासून लांब असल्याने तसेच ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने मिरवणूक मार्गाची अडचण निर्माण होऊ शकते. मात्र, पालिका व पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून वाहतूक नियोजन केल्यास हा प्रश्नही मार्गी लागू शकतो, असे मत नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.